शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी तीन पिढ्यांची पायपीट तरीही रस्ता मातीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 11:26 IST

शहादा : स्वातंत्र्यानंतर तीन पिढ्यांनी तीन किलोमीटर पायी चालून शिक्षण घेत इतरत्र मार्ग धरला परंतू शासनाने रस्ता तयार करणे ...

शहादा : स्वातंत्र्यानंतर तीन पिढ्यांनी तीन किलोमीटर पायी चालून शिक्षण घेत इतरत्र मार्ग धरला परंतू शासनाने रस्ता तयार करणे मनावरच घेतले नाही़ आता चौथी पिढीही त्याच खाचखळग्यातून शिक्षण घेण्यासाठी जाण्याची चिन्हे असल्याने ‘रस्ता नाही, तर मतदान नाही’ असा पवित्रा वडछील ता़ शहादा येथील ग्रामस्थांनी घेतला आहे़शहादा तालुक्याच्या पूर्व भागात साधारण १ हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या वडछील येथून माध्यमिक आणि उच्च शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थी प्राथमिक शिक्षणानंतर कहाटूळ येथे दाखल होतात़ वडछील गावापासून अवघ्या तीन किलोमीटरवर कहाटूळ असले तरी येथेपर्यंत पोहोचणे विद्यार्थ्यांसाठी मोठे दिव्यच समजले जाते़ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वत्र विकासाचा बोलबाला असताना मात्र हा तीन किलोमीटरचा रस्ता अद्यापही स्वातंत्र्यपूर्व काळातीलच आहे़ डबर आणि माती मिश्रित या रस्त्यावरुन चालताना ठेचकाळून पडणे नित्याचे होऊनही विद्यार्थी फक्त शिक्षण घेण्यासाठी मार्गावरुन चालत आहेत़ विशेष म्हणजे त्यांच्या यापूर्वीच्या तीन पिढ्यांनी याचप्रकारे शिक्षण घेतल्याने हा रस्ता त्यांच्याही अंगवळणी पडला आहे़ याबाबत पाठपुरावा करणाऱ्या ग्रामस्थांना शासनाचे विविध विभाग चमत्कारीक अशा उत्तरांची खैरात देऊन बोळवण करत आहेत़आज ना उद्या रस्ता होणार म्हणून ग्रामस्थही ‘खाचखळगे पार करत का, होईना, मुलगा-मुलगी शाळेत तर जातात ना’ अशी समजूत घालून मन शांत करत होते़ परंतू येत्या काळातही रस्ता तयार होण्याची कोणतीही कार्यवाही होणे शक्य नसल्याचे सांगण्यात आल्याने येत्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सारख्या कोणत्याही निवडणूकीत मतदान न करण्याचा पवित्रा आता ग्रामस्थांनी घेतला असून येत्या १५ मार्च पर्यंत याबाबत प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास ग्रामस्थ शहादा प्रांतधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दाद मागणार आहेत़ यानंतरही कार्यवाही न झाल्यास मतदान बहिष्काराला तयार रहा, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे़