शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणपुरी येथे नदी नांगरटी उपक्रमाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST

सुसरी नदीचे उगमस्थान सातपुडा पर्वतरांगेतून जवळपास ६० ते ७० किलोमीटर अंतरावर असल्याने नदीला पाण्याचा पूर वेगात येतो. एकेकाळी बाराही ...

सुसरी नदीचे उगमस्थान सातपुडा पर्वतरांगेतून जवळपास ६० ते ७० किलोमीटर अंतरावर असल्याने नदीला पाण्याचा पूर वेगात येतो. एकेकाळी बाराही महिने सुसरी नदी वाहत असायची. नदीचे पात्रही मोठे असून, सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांतून वाहणारी सुसरी व सुखनाई नदीचे पात्र सद्य:स्थितीत कोरडे ठणठणीत झाले आहे. या नदीपात्रातून वाळूचा उपसा झाल्यामुळे नदीतील पाणी जमिनीत न मुरता वाहून जाते. त्यामुळे नदी परिसरातील कूपनलिकांची पाण्याची पातळी कमी झाली आहे. अनेक कूपनलिकांची पाणीपातळी खालावत चालली आहे. त्यामुळे नदी परिसरातील गावांमध्येदेखील पाणीटंचाईची समस्या गंभीर होताना दिसून येते. पावसाळा सुरू होऊन महिना लोटला तरीही नदीपात्रात ठणठणाट आहे. येणाऱ्या काही दिवसांत पावसाची हजेरी लागेल या आशेने नदीतील पाणी वाहून जाऊ नये व मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरावे यासाठी ब्राह्मणपुरी येथील ग्रामस्थांनी नदी नांगरटीचा उपक्रम हाती घेतला आहे. ब्राह्मणपुरी ते सुलवाडेपर्यंत नांगरटीला सुरुवात करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी स्वखर्चाने डिझेल व ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले. या ठिकाणी युवराज दत्तात्रय पाटील, दिगबंर पाटील, संदीप पाटील, प्रमोद मुरलीधर पाटील, प्रदीप रतिलाल पाटील, सुनील मुरलीधर पाटील, कैलास दशरथ पाटील, दीपक रघुनाथ पाटील, राजेंद्र रमेश पाटील, गोपाळ पाटील, माधव पाटील, अविनाश पाटील, शशिकांत पाटील, अनिल पाटील, रवींद्र पाटील, आदी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ब्राह्मणपुरी परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून नदी नांगरटी उपक्रमात सहभागी करून घेतले.

दोन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार

ब्राह्मणपुरी येथील सुसरी व सुखनाई नदीपात्रात नदी नांगरटीमुळे सुमारे दोन हजार क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली असून, याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होणार असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

ब्राह्मणपुरी येथील सुसरी व सुखनाई नदीपात्रात शेतकऱ्यांच्या मदतीने स्वखर्चाने नदी नांगरटी करण्याचा निर्णय घेऊन नदी नांगरटी करण्यात येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.

- युवराज दत्तात्रय पाटील, ब्राह्मणपुरी, ता. शहादा