शहरं
Join us  
Trending Stories
1
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
2
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
3
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
4
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
5
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
6
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
7
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
8
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
9
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
10
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
11
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
12
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
13
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
14
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
15
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
16
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
17
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
18
घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
19
WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी
20
याला म्हणतात ढासू शेअर...! 5 वर्षांत 2 रुपयांच्या स्टॉकनं केलं करोडपती, दिला 93806.67% चा बंपर परतावा
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील अडीच लाख हेक्टरवरील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 15:11 IST

पावसाअभावी फटका : कापूस हातातून जाण्याचा धोका, शेतकरी चिंताग्रस्त

नंदुरबार : नंदुरबारात साधारणत 15 ते 20 दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने यामुळे खरिप हंगामातील 2 लाख 41 हजार 761 हेक्टरावरील पिकं धोक्यात आलेली आहेत़ त्यात कापूस पिकाची स्थिती चिंताजनक आह़े  एकूण 1 लाख 6 हजार क्षेत्रापैकी खरिप हंगामात 1 लाख 4 हजार 649 हेक्टरावर कापसाची पेरणी करण्यात आलेली आह़े जिल्ह्यात सुमारे 89 टक्के खरिप पेरण्या आटोपल्या आहेत़ यंदाच्या पावसाळ्यात 29 मे रोजी मान्सून राज्यात दाखल होणार असल्याने आनंदाचे वातावरण होत़े  जुन महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने बहुतेक शेतक:यांनी खरिपाच्या पेरण्या आवरुन घेतल्या होत्या़ परंतु त्यानंतर साधारणत दोन आठवडे पावसाने दडी मारली होती़  त्यानंतर पावसाची रिपरिप सुरु झाल्याने पिकांची स्थिती ब:यापैकी होती़ परंतु त्यानंतर जुलै महिन्यातील बहुतेक दिवस कोरडे गेल्याने पिकांना धोका निर्माण झाला होता़ तसेच ऑगस्ट महिनादेखील कोरडाच जाणार असल्याने खरिप पिके हातून जाताय की काय? अशी परिस्थिती निर्माण झालेली आह़े जिल्ह्यातील एकूण 1 लाख 6 हजार क्षेत्रापैकी खरिप हंगामात 1 लाख 4 हजार 649 हेक्टरावर कापसाची लागवड करण्यात आलेली आह़े  तालुकानिहाय पाहिले असता, नंदुरबार 39 हजार 480 हेक्टर, नवापूर 5 हजार 121 हेक्टर, शहादा 47 हजार 488, तळोदा 8 हजार 420 हेक्टर, अक्राणी 480 हेक्टर, अक्कलकुवा 3 हजार 660 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आह़े तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, रोझवा पूनर्वसन आदी परिसरात पिकपाणी बरे असले तरी, नंदुरबार तालुका, शहाद्यातील काही भाग वगळता इतर बहुतांश ठिकाणावरील पिक धोक्यात आलेली आहेत़ अशीच परिस्थिती अक्कलकुवा, धडगाव आदी परिसराचीसुध्दा आह़े शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक गणित हे खरिप हंगामावरच अवलंबून असत़े गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरडय़ा दिवसांची संख्या वाढली असल्याने साहजिकच याचा परिणाम उत्पन्नावर जाणवनार आह़े पुढील आठ ते दहा दिवस पाऊस न परतल्यास जिल्ह्यातील खरिप हंगाम धोक्यात येणार असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े पावसाअभावी अनेक शेतांमध्ये जमिन ओसाड झाल्याने जमिनीस तडे गेले असल्याची भिषण स्थिती निर्माण झालेली आह़े राज्यभरातील जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबारात सर्वात कमी पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आलेली आह़े कापूस सध्या वाढीच्या अवस्थेत आह़े परंतु नंदुरबार तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असल्याने साहजिकच कापसाची वाढ खुंटली असल्याची स्थिती दिसून येत आह़े मागील वर्षी कापसाला बोंडअळीने खाल्ले होत़े त्यातून शेतक:यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होत़े कापूस फुलावर असताना अशा प्रकारे पाण्याअभावी वाढ खुंटली असल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत़ केळी, पपई पिकही धोक्यातशहादा, तळोदा तालुक्यासह  नंदुरबार तालुक्यातीलही काही भागात केळी व पपई पिक घेण्यात येत असत़े परंतु पाउसपाणी नसल्याने ही पिकही धोक्यात आलेली आहेत़ हमखास उत्पन्न मिळवून देणारे पिक म्हणून केळी तसेच पपईकडे पाहिले जात असत़े परंतु पावसाने गेल्या तीन आठवडय़ांपासून दडी मारली असल्याने शेतकरी संकटात सापडलेले आहेत़ ऑगस्ट महिन्यात तरी किमान पाऊस परतावा अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े नंदुरबार तालुक्यात पावसाअभावी पाणी पातळीत अधिकच घट होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत़