शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

रिक्षाचालकांचे कधी राईट तर कधी लेफ्ट, पळवापळवीने प्रवाशांना वैताग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील मुख्य रस्ते व चौकाचौकांत थांबणाऱ्या ऑटो आणि इतर प्रवासी वाहनांमुळे शहादा शहरातील वाहतुकीचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शहादा : शहरातील मुख्य रस्ते व चौकाचौकांत थांबणाऱ्या ऑटो आणि इतर प्रवासी वाहनांमुळे शहादा शहरातील वाहतुकीचा प्रश्न कायम आहे. बसस्थानक परिसर, दोंडाईचा रोड, महात्मा फुले चौक, गांधी पुतळा, जनता चौक, चार रस्ता, खेतिया रोड, शिवसेना कार्यालय, न्यायालय परिसर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची समस्या आहे. विशेष करून या सर्व भागांमध्ये गोंधळाची स्थिती असून, याकडे संबंधित वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना कमालीचा मनस्ताप होत आहे.

शहादा शहरातील बस स्थानक परिसरात बेशिस्त वाहन थाब्याने प्रवाशांची हेळसांड होत आहे. परिणामी बसस्थानकात बस चालकांना ये-जा करण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. बसस्थानकाबाहेर वाढलेल्या गर्दीमुळे बसचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. वाहनधारकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे समोर आले आहे. कधी राईट कधी लेफ्ट बाजूला ऑटो रिक्षा व इतर प्रवासी वाहने थांबत आहेत. पोलिसांचा धाक न बाळगता म्हणेल तिथे वाहने थांबत असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे.

या ठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी

बसस्थानक

शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रिक्षाचालकांची मनमानी पहायला मिळत आहे. प्रवासी मिळविण्यासाठी ही स्पर्धा होत असल्याचे समोर आले आहे. प्रवासी वाहने थेट बसस्थानकात जाऊन प्रवासी मिळवत असल्याचे चित्र आहे. मात्र, प्रवाशांना व एसटी प्रशासनाला याचा त्रास सहन करावा लागत आहे.

शिवसेना कार्यालय - न्यायालय परिसरात -

शहरातील डोंगरगाव रोड भागात प्रवासी मिळविण्यासाठी प्रवासी वाहनधारकांमध्ये कमालीची स्पर्धा आहे. या भागात रस्त्याच्या मध्यभागात अस्ताव्यस्त वाहने लावत बेशिस्तपणे पार्किंग करण्याचा प्रकार पुढे आला आहे. वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत असले तरी यांच्याकडे वाहतूक विभागाचे लक्ष कसे जात नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते हॉटेल पटेल रेसिडेन्सीपर्यंतचा मुख्य रस्ता तर या अवैध प्रवासी वाहनांच्या अड्डा बनला आहे. कोणताही धाक न बाळगता या मुख्य रस्त्यावर रोज शेकडो वाहनांचा जमावडा असतो. या वाहनांमुळे रस्त्यावर प्रवास करणाऱ्या अनेक वाहनधारकांना रोजच अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मनमानी भाडेवाढ

टप्प्याटप्प्याने प्रवासी वाहतूक बदलली आहे. बसेस बंद असल्याने ग्रामीण भागात जाण्यासाठी प्रवाशी वाहनांनी प्रवास करावा लागत असल्याने मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात आहे.

त्यातच पेट्रोल, डिझेलची होत असलेली दरवाढ ही सामान्य वाहनधारकांच्या आवाक्याबाहेर आहे.

ऑटो रिक्षा व प्रवासी वाहनांमध्ये कोणत्याही प्रकारचे भाडे ठरलेले नाही. जो तो मनमानीनुसार भाडे आकारत असल्याचा संभ्रम आहे.

नियमानुसार जेवढे अंतर आहे. तेवढेच भाडे ठरले पाहिजे व शहरात फिरणारे ऑटो व इतर वाहने हे कुठले आहेत. पासिंग झाली आहेत का. त्यांचे वय किती ते रस्त्यावर चालण्यायोग्य आहेत का, या सर्व बाबी तपासल्या पाहिजेत.