शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी वसुंधरा’ अभियान कामांचा आढाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा :   ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत येथे वृक्षलागवड व गाव स्वच्छतेसाठी शपथ देण्यात आली. जि.प.चे मुख्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा :   ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत येथे वृक्षलागवड व गाव स्वच्छतेसाठी शपथ देण्यात आली. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी भेट देऊन कामांचा आढावा घेतला.           ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत येथे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या कामांचा आढावा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी घेतला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, जि.प.चे माजी सदस्य रामचंद्र पाटील, सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, जि.प. सदस्या भारतीबाई भिल, पंचायत समिती सदस्य जंग्या भिल, ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील, तलाठी डी.एम. चौधरी, ग्रामपंचायत सदस्य अरुण भिल, महेंद्र भोई, दिलीप पाटील, नंदकिशोर पाटील, भावडू ठाकरे, गणेश पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी केदारेश्वर मंदिर व बॅरेजलगत वृक्षारोपण करून ज्याठिकाणी वृक्षलागवड केली आहे तेथे गावडे यांनी पाहणी केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच ‘माझी वसुंधरा’ अभियानाची शपथ देण्यात आली. रामचंद्र पाटील म्हणाले की, या अभियानात जर फंड मिळाला तर आम्हाला काम करताना अडचणी येणार नाहीत. तसेच अंगणवाड्यांना संरक्षक भिंतीची गरज आहे. जेणेकरून लावलेले वृक्ष आम्हाला जगवता येतील.           उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ म्हणाल्या की, ज्यांचे शौचालय बांधायचे राहिले असतील त्यांनी लागलीच दोन दिवसांत     प्रस्ताव पाठवा, आपण मंजूर करून    देऊ, ज्यांना नळकनेक्शन हवे असेल, शाळा, अंगणवाड्या, वैयक्तिक यांनाही पाणी परवानगी लवकर देण्यात येईल. ‘माझी वसुंधरा’ अभियानात सर्वांनी सहभाग नोंदवून गावाच्या विकासासाठी मदत करावी, असे आवाहन केले.            मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे म्हणाले की, वृक्षलागवड केल्यानंतर त्याच्या संवर्धनासाठी अडचणी येतात. परंतु लोकांच्या सहभागातून आपण ते काम पूर्ण केले पाहिजे. गावाच्या सहभागातून हे अभियान यशस्वी करावे. पृथ्वी, जल, आकाश, अग्नी, वायू या सर्व गोष्टींचा विचार करून प्रकाशा ग्रामपंचायतीने अद्यापपर्यंत चांगले गुण मिळवले आहेत. अजून थोडी मेहनत घेण्याची गरज आहे. असे झाल्यास गावाला बक्षीस मिळू शकते, असे     त्यांनी सांगितले. प्रास्ताविक  ग्रामविकास अधिकारी बी. जी. पाटील यांनी तर सूत्रसंचालन नरेंद्र गुरव यांनी केले.