शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

शहाद्यात कोरोना चाचणीसाठी प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST

मार्च महिन्यात शहरासह तालुक्यात कोरोना संक्रमणाचा विस्फोट झाल्याने तसेच मृत्यूदर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संक्रमणाची ...

मार्च महिन्यात शहरासह तालुक्यात कोरोना संक्रमणाचा विस्फोट झाल्याने तसेच मृत्यूदर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील पाच ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये चाचणी करण्याबाबत स्वयंस्फूर्तीने उत्साह निर्माण झाला असून या पाचही केंद्रांवर दिवसभरात मोठ्या संख्येने नागरिक स्वतःची चाचणी करून घेत आहेत.

या चाचणी केंद्रांवर नमुने दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच अहवाल प्राप्त होत आहे. ज्या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशांना चाचणी केंद्रावरच औषधीचा पुरवठा करण्यात येत असला तरी अशा रुग्णांना होमक्वारंटाईनचा शिक्का मारण्यात यावा, त्यानंतरच त्यांना घरी उपचाराची परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनातर्फे चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा. या चाचणी केंद्रांवर ज्या नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशांच्या संपर्कातील इतरांची चाचणी करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जे बाधित रुग्ण शासकीय नियमांचे पालन करणार नाही अशांना सक्तीने क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी उद्‌भवलेल्या कोरोना संक्रमणाच्या तुलनेत यंदाचे संक्रमण अत्यंत घातक असल्याचे गेल्या महिन्यात सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय होती तर यंदा मार्च महिन्यात अचानक मृत्यूदर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये या चाचणी केंद्रांवर बालकांची तपासणी केली जात आहे. १० ते २० वर्षीय बालकांचा अहवाल हा पॉझिटिव्ह येत असल्याने शहर व परिसरात कोरोनाच्या नेमक्या कुठल्या स्ट्रेनचे संक्रमण सुरू आहे याबाबत उच्चस्तरीय विशेष तपासणी करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.