शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

बंधा-यातील पाण्यासह आसाणे ग्रामस्थांचेही डोळे पाण्याने डबडबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 12:38 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वर्षानुवर्ष अवर्षणप्रवण राहिलेल्या आसाणे गावाने यंदा श्रमदानातून घाम गाळला, त्याचे फळ पहिल्याच अर्थात मान्सूनपूर्व पावसात पहाण्यास मिळाले. भर उन्हात राब-राब राबून तयार केलेल्या बंधा:यांमध्ये पाणी साठल्याचे चित्र दिसताच ग्रामस्थांचे डोळेही पाण्याने डबडबले. निमित्त होते, वॉटर कपमध्ये श्रमदानातून करण्यात आलेल्या वन तलाव, सीसीटी आणि माती ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वर्षानुवर्ष अवर्षणप्रवण राहिलेल्या आसाणे गावाने यंदा श्रमदानातून घाम गाळला, त्याचे फळ पहिल्याच अर्थात मान्सूनपूर्व पावसात पहाण्यास मिळाले. भर उन्हात राब-राब राबून तयार केलेल्या बंधा:यांमध्ये पाणी साठल्याचे चित्र दिसताच ग्रामस्थांचे डोळेही पाण्याने डबडबले. निमित्त होते, वॉटर कपमध्ये श्रमदानातून करण्यात आलेल्या वन तलाव, सीसीटी आणि माती बांधांमध्ये साठलेल्या पाण्याचे.नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग अर्थात आसाणे, घोटाणे, न्याहली, रनाळे हा भाग नेहमीच अवर्षण प्रवण. तालुक्यातील एकुण पावसाच्या तुलनेत या भागात सरासरी केवळ 40 ते 45 टक्के पाऊस पडतो. परिणामी शेती उत्पन्न तर नाहीच, परंतु उन्हाळ्यात पाण्यासाठी दाहीदिशा पाचवीला पुजलेल्या. यंदा पाणी फाऊंडेशनअंतर्गत वॉटर कप स्पर्धेत याच भागातील आसाणे  गावाने भाग घेतला. श्रमदानाचे महत्व जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्यासह पाणी फाऊंडेशनच्या पदाधिका:यांनी पटवून दिले. तरुण सरपंच चंद्रकांत युवराज पाटील व गावक:यांनाही ते पटले आणि एका तुफान आल्यागत ग्रामस्थ श्रमदानात रमले. 40 ते 42 अंश तापमानात, घामाच्या धारांमध्ये ग्रामस्थांनी काम केले. त्याचे फळ मान्सूनपूर्व पावसातच पहायला मिळाले. गावक:यांच्या श्रमदानाला विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती यांचीही साथ मिळाली.वॉटर कप स्पर्धा गेल्या महिन्यात 24 मे रोजी संपली. त्याआधी गावाने  समतल चर, मातीनाला बांध, वनतलाव, जुने तलाव दुरूस्त करणे, नालाबंडींग आदी कामे केली. या कामांचे वॉटर कपअंतर्गत मोजमापास नुकतीच सुरुवात झाली. त्याआधीच या कामांमध्ये पावसाचे पाणी साठल्याने ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही.शनिवारी सायंकाळी पावसाचे वातावरण झाले. मान्सूनपूर्व पाऊस येणार की नाही ही शंका असतांनाच शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. साधारणत: एक ते दीड तास मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात पडला. या पाण्यामुळे आपल्या श्रमदानातील कामांमध्ये पाणी साठले की नाही हे पहाण्यासाठी रविवारचा सूर्योदय होताच ग्रामस्थांनी धाव घेतली. पहातात तर काय? डोंगर उतारावरून नेहमीच वाहून जाणारे पाणी समतल चा:यांमध्ये, माती नाल्यांमध्ये, वन तलावांमध्ये साठलले होते. समतल चरातील पाणी तर जमीनीत मुरले देखील होते. हे पाहून अनेक ग्रामस्थांच्या डोळ्यातून अश्रू निघाले. सरपंच चंद्रकांत पाटील, युवा कार्यकर्ते रवींद्र पाटील यांनी एकमेकांना साखर भरवून हा आनंद साजरा केला.पावसाळ्यात या भागात ब:यापैकी पाऊस झाल्यास या कामांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी साठवण होईल असा अंदाज आहे. परिणामी श्रमदान आणि मेहनतीला यंदा फळ येईल या आनंदात सध्या आसाणेकर आहेत.