शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

बंधा-यातील पाण्यासह आसाणे ग्रामस्थांचेही डोळे पाण्याने डबडबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 12:38 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वर्षानुवर्ष अवर्षणप्रवण राहिलेल्या आसाणे गावाने यंदा श्रमदानातून घाम गाळला, त्याचे फळ पहिल्याच अर्थात मान्सूनपूर्व पावसात पहाण्यास मिळाले. भर उन्हात राब-राब राबून तयार केलेल्या बंधा:यांमध्ये पाणी साठल्याचे चित्र दिसताच ग्रामस्थांचे डोळेही पाण्याने डबडबले. निमित्त होते, वॉटर कपमध्ये श्रमदानातून करण्यात आलेल्या वन तलाव, सीसीटी आणि माती ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वर्षानुवर्ष अवर्षणप्रवण राहिलेल्या आसाणे गावाने यंदा श्रमदानातून घाम गाळला, त्याचे फळ पहिल्याच अर्थात मान्सूनपूर्व पावसात पहाण्यास मिळाले. भर उन्हात राब-राब राबून तयार केलेल्या बंधा:यांमध्ये पाणी साठल्याचे चित्र दिसताच ग्रामस्थांचे डोळेही पाण्याने डबडबले. निमित्त होते, वॉटर कपमध्ये श्रमदानातून करण्यात आलेल्या वन तलाव, सीसीटी आणि माती बांधांमध्ये साठलेल्या पाण्याचे.नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग अर्थात आसाणे, घोटाणे, न्याहली, रनाळे हा भाग नेहमीच अवर्षण प्रवण. तालुक्यातील एकुण पावसाच्या तुलनेत या भागात सरासरी केवळ 40 ते 45 टक्के पाऊस पडतो. परिणामी शेती उत्पन्न तर नाहीच, परंतु उन्हाळ्यात पाण्यासाठी दाहीदिशा पाचवीला पुजलेल्या. यंदा पाणी फाऊंडेशनअंतर्गत वॉटर कप स्पर्धेत याच भागातील आसाणे  गावाने भाग घेतला. श्रमदानाचे महत्व जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्यासह पाणी फाऊंडेशनच्या पदाधिका:यांनी पटवून दिले. तरुण सरपंच चंद्रकांत युवराज पाटील व गावक:यांनाही ते पटले आणि एका तुफान आल्यागत ग्रामस्थ श्रमदानात रमले. 40 ते 42 अंश तापमानात, घामाच्या धारांमध्ये ग्रामस्थांनी काम केले. त्याचे फळ मान्सूनपूर्व पावसातच पहायला मिळाले. गावक:यांच्या श्रमदानाला विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती यांचीही साथ मिळाली.वॉटर कप स्पर्धा गेल्या महिन्यात 24 मे रोजी संपली. त्याआधी गावाने  समतल चर, मातीनाला बांध, वनतलाव, जुने तलाव दुरूस्त करणे, नालाबंडींग आदी कामे केली. या कामांचे वॉटर कपअंतर्गत मोजमापास नुकतीच सुरुवात झाली. त्याआधीच या कामांमध्ये पावसाचे पाणी साठल्याने ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही.शनिवारी सायंकाळी पावसाचे वातावरण झाले. मान्सूनपूर्व पाऊस येणार की नाही ही शंका असतांनाच शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. साधारणत: एक ते दीड तास मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात पडला. या पाण्यामुळे आपल्या श्रमदानातील कामांमध्ये पाणी साठले की नाही हे पहाण्यासाठी रविवारचा सूर्योदय होताच ग्रामस्थांनी धाव घेतली. पहातात तर काय? डोंगर उतारावरून नेहमीच वाहून जाणारे पाणी समतल चा:यांमध्ये, माती नाल्यांमध्ये, वन तलावांमध्ये साठलले होते. समतल चरातील पाणी तर जमीनीत मुरले देखील होते. हे पाहून अनेक ग्रामस्थांच्या डोळ्यातून अश्रू निघाले. सरपंच चंद्रकांत पाटील, युवा कार्यकर्ते रवींद्र पाटील यांनी एकमेकांना साखर भरवून हा आनंद साजरा केला.पावसाळ्यात या भागात ब:यापैकी पाऊस झाल्यास या कामांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी साठवण होईल असा अंदाज आहे. परिणामी श्रमदान आणि मेहनतीला यंदा फळ येईल या आनंदात सध्या आसाणेकर आहेत.