शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वर्गणीतून स्थापीत वस्तीला संरक्षण भिंतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 13:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सोमावल : प्रतिकुल परिस्थितीमुळे दळणवळण व अन्य सुविधा पोहोचू शकत नसलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील खुर्चीमाळ व माळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कसोमावल : प्रतिकुल परिस्थितीमुळे दळणवळण व अन्य सुविधा पोहोचू शकत नसलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील खुर्चीमाळ व माळ येथील काही नागरिकांनी स्थलांतर केले. वर्गणी करीत घेतलेल्या जमिनीवर त्यांनी ‘रामगड’ ही नवीन वसाहतही स्थापन केली, परंतु या गावातून वाहणाऱ्या ‘बेनू हेजाहा’ या नदीमुळे वसाहतीच्या जागेला पोखरले. नदीपात्र विस्तारत असल्याने पुराचे पाणी थेट वसाहतीत शिरत आहे. त्यामुळे तेथे संरक्षण भिंतीची नितांत गरज आहे.केंद्र सातपुड्याच्या दुर्गम भागात विरळ लोकवस्ती असलेल्या खुर्चीमाळ व माळ येथे माळमाथा शिवाय उंचसखोल भागामुळे दळणवळण व अन्य सुविधा झाल्या नाही. सुविधांचा आभाव, पोटखराब शेती, आरोग्याच्या समस्या, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, शिक्षणाची समस्या, रोजगाराचा प्रश्न पाचवीला पुजलेला, उपासमारी यामुळे तेथी आदिवासी बांधवांना उपजीविका करणे कठिण झाले आहे. परिणामी ते स्थलांतरही करीत आहे.उमरागव्हाण ता. अक्कलकुवा या ग्रुप ग्रामपंचायतीत येणारे खुर्चीमाळ व माळ येथील ज्येष्ठांनी भोगलेले दिवस मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून तेथील काही नागरिकांनी स्थलांतराचा मार्ग अवलंबला. त्यात त्यांनी सातपुडा पायथ्यालगत असलेल्या मौजे मौलीपाडा शिवारात जमीन वर्गणी करून विकत घेतली अन् तेथेच रामगड नावाची नवीन वसाहत स्थापन केली. रामगड हे आलीविहिर व मौलीपाडा या दोन गावांदरम्यान असून ते बºहाणपूर - अंकलेश्वर महामार्गावरील शिर्वे गावाच्या उत्तरेस सात किलो मिटर अंतरावर आहे. या नव्या वसाहतीत नऊ घरे असून त्याच्या लोकसंख्या १०० आहे.सातपुड्याच्या पायथ्याशी दळणवळण सुविधेच्या दृष्टीने सोयीच्या रामगड गावातून ‘बेनू हेजाहा’ ही नदी वाहते. पावसाळ्यात वेगाने वाहणाºया प्रवाहात जमिनीची क्षती झाली. त्यामुळे ‘बेनू हेजाहा’ या नदीच्या पुराचे पाणी थेट गावात शिरत आहे. मागील पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उचळी घेत वाहणाºया प्रवाहामुळे ग्रामस्थांमध्ये भिती निर्माण झाली. त्यामुळे त्यांना शेजारील गावात आसरा घ्यावा लागला. काही घरांची पडझड होऊन अन्नधान्यासह संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. नदी पात्राच्या विस्तारामुळे गावाची जागा अपुरी पडू लागली, त्यामुळे तेथे संरक्षण भिंतीची नितांत आवश्यकता भासत आहे. हे संरक्षण भिंत बांधण्याची मागणी तेथील नागरिकांमार्फत करण्यात येत आहे.

ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी दोन हातपंप स्वखर्चाने बसवले. त्यामुळे घरगुती व गुरांसाठी पाण्याची सोय झाली.अन्य समस्यांप्रमाणेच तेथे मुलांना शिक्षणाच्या सुविधा नसल्यामुळे तेथील काही पालक मुलांना शिक्षणासाठी शेजारील गावांमध्ये पाठवत आहे.आरोग्य, रोजगार व उपासमारीसह अनेक गंभीर समस्याला सामोरे जात येथील नागरिक आपले जीवन जगत आहे. वयस्कांनी पाल्याचे जीवनमान उंचवावे, भेडसावणाऱ्या अनेक समस्या सुटाव्या म्हणून दुर्गम भागातून आपल्या पाल्यासह स्थलांतर केले. या स्थलांतराने भोगोलिक परिस्थिती बदलली असली तरी समस्या मात्र कायम आहे.

नवीन वसाहत स्थापन करणारे ग्रामस्थ वनपट्टे कसत असून हे वनपट्टे रामगड या नव्या वसाहतीपासून जवळच आहे. यामुळे सोयीचे ठिकाण निवडत त्यांनी तेथे वसाहत स्थापन केल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु तेथेही काही समस्या निर्माण झाल्याने हे सुविधा देण्याची मागणी करीत आहे.