शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेकडून ११ गावांतील विकासकामांचा निधी मागविला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST

जिल्हातील या ११ ग्रामपंचायंतीची विकासकामे प्रगतपथावर असताना मध्येच या विभागाच्या प्रमुखांनी सबंधित ग्रामपंचायतींना उर्वरीत रक्कम परत करण्याचे आदेश देण्यात ...

जिल्हातील या ११ ग्रामपंचायंतीची विकासकामे प्रगतपथावर असताना मध्येच या विभागाच्या प्रमुखांनी सबंधित ग्रामपंचायतींना उर्वरीत रक्कम परत करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ११ पैकी ५ ग्रामपंचायतींकडे सुसज्ज कार्यालय नसल्याने याठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय उभारणी करण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, या विकासकामांचा निधीच परत मागितल्याने विकासकामे रद्द करावी लागली आहे. जिल्हा परिषेदेने विकासकामेच रद्द करण्याचे आदेश दिल्यामुळे खर्च केलेला पैसा वाया जाणार आहे. ग्रामपंचायतीचे विकासकामांवर जवळपास तीन लाख रुपये खर्च केले आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ही विकासकामे का रद्द केली, याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये कुतूहल व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेने जनसुविधा योजनेअंतर्गत दिलेल्या निधीत तळोदा तालुक्यातील तळवे, चिनोदा, नवापूर तालुक्यातील चिखली, धडगाव तालुक्यातील राडिकलम, चोंदवाडे या पाच ग्रामपंचायतीने गावात स्मशानभूमीची कामे हाती घेतली होती. कारण तेथे स्मशानभूमी नसल्याने मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी इतर ठिकाणी जावे लागत आहे. तळवे व चिनोदा येथील गावकऱ्यांना गावापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या तळोदा येथील स्मशानभूमीत जावे लागत आहे. साहजिकच शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्या प्रश्न मार्गी लागणार होता. शासनाकडून ज्या गावात स्मशानभूमी नाहीत त्या ठिकाणी उभारणीसाठी प्राधान्य दिले जात असताना, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने थेट कामच रद्द करण्याचा आदेश दिल्यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत असून सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.