शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

शिल्लक असलेल्या कापसाचा पंचनामा करून भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कापूस खरेदी केंद्रात कापूस विक्रीसाठी चार हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जवळपास दीड लाख ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कापूस खरेदी केंद्रात कापूस विक्रीसाठी चार हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जवळपास दीड लाख क्विंटलपर्यंत कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडलेला आहे. पावसाळ्यापूर्वी हा कापूस खरेदी झाला नाही तर शेतकºयांना बाजार भाव प्रमाणे मिळालेला भाव आणि खरेदी केंद्राचा भाव यातील फरकाची रक्कम शेतकºयांना मिळावी अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व बाजार समितीचे सभापती किशोर पाटील यांनी केली आहे.याबाबत सहकार व पणन मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार तालुक्यासह जिल्ह्यात जवळपास ४० टक्के कापूस उत्पादकांचा कापूस अद्याप घरातच पडून आहे. कापूस घरात भरून ठेवला आहे. खरीप हंगामाच्या लागवडीकरीता बळीराजाला मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासणार आहे. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे कापूस विक्री होऊ शकला नाही. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लाागणार आहे. सीसीआयतर्फे कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. नंदुरबारात बाजार समितीअंतर्गत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.जवळपास चार हजार शेतकºयांनी नोंदणी केली आहे. एक लाख ते दीड लाख क्विंटल कापूस विक्रीचा बाकी आहे. शासनाने सर्व शेतकºयांचा सर्व कापूस खरेदी करावा, खरेदी न झाल्यास शेतकºयांनी खुल्या बाजारात कापूस विक्री केल्यास बाजारातील भाव आणि आधारभूूत भाव यातील फरकाची रक्कम शेतकºयांना अदा करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. ज्या शेतकºयांचा कापूस विक्री करणे बाकी असेल अशा शेतकºयांच्या घरोघरी जावून पंचनामा करावा अशी मागणीही माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व बाजार समिती सभापती किशोर पाटील यांच्यातर्फे करण्यात आली आहे.