शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

पाचव्या लॉकडाऊनचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 11:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाचव्या लॉकडाऊनच्या निर्देशानुसार केवळ प्रतिबंधीत क्षेत्रातच लॉकडाऊनची अंमलबजावणी राहणार आहे. इतर भागात टप्प्याटप्प्याने व्यवहार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाचव्या लॉकडाऊनच्या निर्देशानुसार केवळ प्रतिबंधीत क्षेत्रातच लॉकडाऊनची अंमलबजावणी राहणार आहे. इतर भागात टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरळीत होणार आहेत. जिल्ह्यात शहरी भागाचा विचार करता सद्य स्थितीत केवळ नंदुरबार व शहादा शहरातच प्रत्येकी एका भागात प्रतिबंधीत क्षेत्र आहे. तर रजाळे, हिंगणी गावात प्रतिबंधीत क्षेत्र आहे. त्यामुळे पाचव्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील अर्थचक्र गतीमान होण्याची शक्यता आहे.नंदुरबार जिल्हा पूर्वीपासून आॅरेंज झोनमध्ये आहे. त्यामुळे चौथ्या लॉकडाऊनपासून जिल्ह्यातील काही व्यवसाय सुरळीत सुरू झाले. यामुळे शेतकरी, कामगार, व्यावसायिक यांच्यादृष्टीने ते दिलासादायक ठरले. आता पाचव्या लॉकडाऊनमध्ये शासनाने बरेच निर्बंध उठविल्याने व्यवहाराचा गाडा रुळावर येण्यास मदत होणार आहे.नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी आहे. रुग्ण संख्या वाढीचा वेग देखील मर्यादीत व स्थिर आहे. त्यामुळे जिल्हा पूर्वी ग्रीन झोनमध्ये होता त्यानंतर तो आॅरेंज झोनमध्ये आला. त्यामुळे चौथ्या लॉकडाऊनच्या अनेक नियमांमधून जिल्ह्याची सुटका झाली होती. त्यात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यवसाय सुरू ठेवणे, जिल्हाअंतर्गत एस.टी.वाहतूक, कृषी मालाची वाहतूक व विक्री यासह इतर सवलतींचा समावेश होता. रुग्ण संख्या स्थिर राहिल्याने पाचव्या लॉकडाऊनच्या नियमांचा फायदा आता आणखी जास्त स्वरूपात जिल्ह्याला मिळणार आहे.दोन शहर आणि दोन गावात प्रतिबंधीत क्षेत्रसद्य स्थितीत नंदुरबारातील भोई गल्लीचा परिसर आणि शहादा येथील गरीब नवाज कॉलनीतील परिसर वगळता इतर क्षेत्रात प्रतिबंधीत क्षेत्र नाही. ग्रामिण भागात रजाळे, ता.नंदुरबार आणि हिंगणी, ता.शहादा येथे प्रतिबंधीत क्षेत्र आहे. पाचव्या लॉकडाऊनमध्ये केवळ प्रतिबंधीत क्षेत्रातच नियम लागू राहणार असल्यामुळे इतर भागातील व्यावसायिक, उद्योजक यांना दिलासा मिळाला आहे. आता राज्य शासनाच्या आदेशात काय आणि कसे नियम घालून दिले जातात त्याकडे लक्ष लागून आहे.संचारबंदी केवळ रात्रीचआतापर्यंत संचारबंदीची वेळ ही सायंकाळी सात ते सकाळी सात अशी होती. पाचव्या लॉकडाऊनमध्ये संचारबंदीची वेळ ही रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे देखील दिलासा मिळणार आहे. त्यामुळे पेट्रोलपंपासह इतर व्यावसायिकांना रात्री नऊ वाजेपर्यंत आपले व्यवसाय सुरू ठेवता येणार आहेत.मात्र शाळा, महाविद्यालये, लग्न समारंभ, सार्वजनिक समारंभ यांच्यावर बंदी कायम राहणार असून उपस्थितांच्या संख्येची मर्यादा राहणार आहे.

पाचव्या लॉकडाऊनमध्ये जिल्हाअंतर्गतसह जिल्हाबाहेरील वाहतुकीला व प्रवासाला मुबा राहण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे आता आंतरजिल्हा एस.टी.सेवा सुरू होईल का याकडे लक्ष आहे.

केंद्र शासनाने पाचवा लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्य शासनाकडून अद्याप त्यावर मार्गदर्शक सुचना बाकी आहेत. त्या येताच जिल्हा संदर्भातही निर्णय घेतला जाणार आहे.-डॉ.राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी.

पाचव्या लॉकडाऊनमध्ये अनेक बांबींची शिथीलता मिळणार आहे. यामुळे व्यवहार आणि उद्योगाची गती आणि चक्रे वेगवान होणार आहेत. त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होऊन बेरोजगार हातांना काम मिळणार आहे.आता राज्य शासनाच्या निर्देशांकडे लक्ष लागून आहे.-मनोज रघुवंशी, उद्योजक, नंदुरबार.गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून व्यवसाय, उद्योग ठप्प आहेत. आता खरीपाच्या हंगामत तरी लॉकडाऊनमधून सूट मिळावी व अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर यावा अशी अपेक्षा होती. पाचव्या लॉकडाऊनमधून बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे. याचा अर्थ कोरोनाचे संकट टळले असा नाही, त्यामुळे काळजी घ्यावीच लागेल.-ललीतकुमार रमणलाल छाजेड, व्यावसायीक, शहादा.