शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

पाचव्या लॉकडाऊनचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 11:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाचव्या लॉकडाऊनच्या निर्देशानुसार केवळ प्रतिबंधीत क्षेत्रातच लॉकडाऊनची अंमलबजावणी राहणार आहे. इतर भागात टप्प्याटप्प्याने व्यवहार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाचव्या लॉकडाऊनच्या निर्देशानुसार केवळ प्रतिबंधीत क्षेत्रातच लॉकडाऊनची अंमलबजावणी राहणार आहे. इतर भागात टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरळीत होणार आहेत. जिल्ह्यात शहरी भागाचा विचार करता सद्य स्थितीत केवळ नंदुरबार व शहादा शहरातच प्रत्येकी एका भागात प्रतिबंधीत क्षेत्र आहे. तर रजाळे, हिंगणी गावात प्रतिबंधीत क्षेत्र आहे. त्यामुळे पाचव्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील अर्थचक्र गतीमान होण्याची शक्यता आहे.नंदुरबार जिल्हा पूर्वीपासून आॅरेंज झोनमध्ये आहे. त्यामुळे चौथ्या लॉकडाऊनपासून जिल्ह्यातील काही व्यवसाय सुरळीत सुरू झाले. यामुळे शेतकरी, कामगार, व्यावसायिक यांच्यादृष्टीने ते दिलासादायक ठरले. आता पाचव्या लॉकडाऊनमध्ये शासनाने बरेच निर्बंध उठविल्याने व्यवहाराचा गाडा रुळावर येण्यास मदत होणार आहे.नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी आहे. रुग्ण संख्या वाढीचा वेग देखील मर्यादीत व स्थिर आहे. त्यामुळे जिल्हा पूर्वी ग्रीन झोनमध्ये होता त्यानंतर तो आॅरेंज झोनमध्ये आला. त्यामुळे चौथ्या लॉकडाऊनच्या अनेक नियमांमधून जिल्ह्याची सुटका झाली होती. त्यात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यवसाय सुरू ठेवणे, जिल्हाअंतर्गत एस.टी.वाहतूक, कृषी मालाची वाहतूक व विक्री यासह इतर सवलतींचा समावेश होता. रुग्ण संख्या स्थिर राहिल्याने पाचव्या लॉकडाऊनच्या नियमांचा फायदा आता आणखी जास्त स्वरूपात जिल्ह्याला मिळणार आहे.दोन शहर आणि दोन गावात प्रतिबंधीत क्षेत्रसद्य स्थितीत नंदुरबारातील भोई गल्लीचा परिसर आणि शहादा येथील गरीब नवाज कॉलनीतील परिसर वगळता इतर क्षेत्रात प्रतिबंधीत क्षेत्र नाही. ग्रामिण भागात रजाळे, ता.नंदुरबार आणि हिंगणी, ता.शहादा येथे प्रतिबंधीत क्षेत्र आहे. पाचव्या लॉकडाऊनमध्ये केवळ प्रतिबंधीत क्षेत्रातच नियम लागू राहणार असल्यामुळे इतर भागातील व्यावसायिक, उद्योजक यांना दिलासा मिळाला आहे. आता राज्य शासनाच्या आदेशात काय आणि कसे नियम घालून दिले जातात त्याकडे लक्ष लागून आहे.संचारबंदी केवळ रात्रीचआतापर्यंत संचारबंदीची वेळ ही सायंकाळी सात ते सकाळी सात अशी होती. पाचव्या लॉकडाऊनमध्ये संचारबंदीची वेळ ही रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे देखील दिलासा मिळणार आहे. त्यामुळे पेट्रोलपंपासह इतर व्यावसायिकांना रात्री नऊ वाजेपर्यंत आपले व्यवसाय सुरू ठेवता येणार आहेत.मात्र शाळा, महाविद्यालये, लग्न समारंभ, सार्वजनिक समारंभ यांच्यावर बंदी कायम राहणार असून उपस्थितांच्या संख्येची मर्यादा राहणार आहे.

पाचव्या लॉकडाऊनमध्ये जिल्हाअंतर्गतसह जिल्हाबाहेरील वाहतुकीला व प्रवासाला मुबा राहण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे आता आंतरजिल्हा एस.टी.सेवा सुरू होईल का याकडे लक्ष आहे.

केंद्र शासनाने पाचवा लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्य शासनाकडून अद्याप त्यावर मार्गदर्शक सुचना बाकी आहेत. त्या येताच जिल्हा संदर्भातही निर्णय घेतला जाणार आहे.-डॉ.राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी.

पाचव्या लॉकडाऊनमध्ये अनेक बांबींची शिथीलता मिळणार आहे. यामुळे व्यवहार आणि उद्योगाची गती आणि चक्रे वेगवान होणार आहेत. त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होऊन बेरोजगार हातांना काम मिळणार आहे.आता राज्य शासनाच्या निर्देशांकडे लक्ष लागून आहे.-मनोज रघुवंशी, उद्योजक, नंदुरबार.गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून व्यवसाय, उद्योग ठप्प आहेत. आता खरीपाच्या हंगामत तरी लॉकडाऊनमधून सूट मिळावी व अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर यावा अशी अपेक्षा होती. पाचव्या लॉकडाऊनमधून बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे. याचा अर्थ कोरोनाचे संकट टळले असा नाही, त्यामुळे काळजी घ्यावीच लागेल.-ललीतकुमार रमणलाल छाजेड, व्यावसायीक, शहादा.