शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी नातेवाईकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहादा शहर व तालुक्यात पहिल्या लाटेपेक्षा जास्त गंभीर रुप घेतले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने सर्वत्र ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहादा शहर व तालुक्यात पहिल्या लाटेपेक्षा जास्त गंभीर रुप घेतले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. शहरातील सर्व कोविड सेंटर फुल्ल झाल्याने रूग्णांना सुरतला पाठविण्यात येत आहे. त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वेळेवर रुग्णवाहिका देखील मिळत नसल्याने खासगी वाहनातून जास्तीचे पैसे देऊन रुग्णांची सोय करावी लागत आहे. शहाद्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा ही तुटवडा असल्याने ऑक्सिजन मिळवण्यासाठी, बेड मिळवण्यासाठी नातेवाईकांना भटकंती करावी लागत आहे. कोविड रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन आवश्यक असून ते मिळणे देखील दुरापास्त झाले आहे. चांगली आर्थिक परिस्थिती असलेले नातेवाईक पैशांची तमा न बाळगता आपल्या माणसाचा जीव वाचावा म्हणून जास्तीचा खर्च करण्याची तयारी ठेवतात. मात्र सामान्य रुग्णांचे काय, रोजंदारी करणारा माणूस कसा सुरतला जाईल, गेला तरी तेथील हाॅस्पिटलचे दीड-दोन लाख रूपयांचे बिल कसे भरेल, येथेच उपचार करायचे म्हटले तर बेड नाही, ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन नाही मग त्याने कसे जगायचे, की जगूच नये, असा संतप्त सवाल सामान्य माणसातून केला जात आहे. याबाबत प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी ही गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. सामाजिक संस्थांनी ही अशावेळी पुढे आले पाहिजे. शेजारील गुजरात राज्यात सरकार आणि सामाजिक संस्थांनी लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. लसीकरणासाठी वार्डा वार्डात लसीकरण केंद्र उघडण्यात आले आहेत. लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना चहा-कॉफी बिस्किटे दिली जातात. आपल्याकडे लसीकरणासाठी तासन्‌तास थांबूनही साधे पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था होत नाही हे दुर्दैव आहे. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी लसीकरण सेंटरची संख्या वाढविणे आवश्यक आहे. रेमडेसिवीर अभावी कोणाही रुग्णाचा जीव जाऊ नये? यासाठी रेमडेसिवीरचा पुरवठा वाढवणे आवश्यक आहे. बेड अभावी रुग्णांवर तालुक्याबाहेर जाण्याची पाळी येऊ नये? यासाठी सर्व कोविड रूग्णालयात बेडची, व्हेंटिलेटरची संख्या वाढविणे ही आवश्यक आहे. अशाप्रसंगी लोकप्रतिनिधींनी देखील या सर्व सोयी पुरवून नागरिकांना आश्वस्त करणे आवश्यक आहे.