शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी नातेवाईकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहादा शहर व तालुक्यात पहिल्या लाटेपेक्षा जास्त गंभीर रुप घेतले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने सर्वत्र ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहादा शहर व तालुक्यात पहिल्या लाटेपेक्षा जास्त गंभीर रुप घेतले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. शहरातील सर्व कोविड सेंटर फुल्ल झाल्याने रूग्णांना सुरतला पाठविण्यात येत आहे. त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वेळेवर रुग्णवाहिका देखील मिळत नसल्याने खासगी वाहनातून जास्तीचे पैसे देऊन रुग्णांची सोय करावी लागत आहे. शहाद्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा ही तुटवडा असल्याने ऑक्सिजन मिळवण्यासाठी, बेड मिळवण्यासाठी नातेवाईकांना भटकंती करावी लागत आहे. कोविड रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन आवश्यक असून ते मिळणे देखील दुरापास्त झाले आहे. चांगली आर्थिक परिस्थिती असलेले नातेवाईक पैशांची तमा न बाळगता आपल्या माणसाचा जीव वाचावा म्हणून जास्तीचा खर्च करण्याची तयारी ठेवतात. मात्र सामान्य रुग्णांचे काय, रोजंदारी करणारा माणूस कसा सुरतला जाईल, गेला तरी तेथील हाॅस्पिटलचे दीड-दोन लाख रूपयांचे बिल कसे भरेल, येथेच उपचार करायचे म्हटले तर बेड नाही, ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन नाही मग त्याने कसे जगायचे, की जगूच नये, असा संतप्त सवाल सामान्य माणसातून केला जात आहे. याबाबत प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी ही गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. सामाजिक संस्थांनी ही अशावेळी पुढे आले पाहिजे. शेजारील गुजरात राज्यात सरकार आणि सामाजिक संस्थांनी लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. लसीकरणासाठी वार्डा वार्डात लसीकरण केंद्र उघडण्यात आले आहेत. लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना चहा-कॉफी बिस्किटे दिली जातात. आपल्याकडे लसीकरणासाठी तासन्‌तास थांबूनही साधे पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था होत नाही हे दुर्दैव आहे. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी लसीकरण सेंटरची संख्या वाढविणे आवश्यक आहे. रेमडेसिवीर अभावी कोणाही रुग्णाचा जीव जाऊ नये? यासाठी रेमडेसिवीरचा पुरवठा वाढवणे आवश्यक आहे. बेड अभावी रुग्णांवर तालुक्याबाहेर जाण्याची पाळी येऊ नये? यासाठी सर्व कोविड रूग्णालयात बेडची, व्हेंटिलेटरची संख्या वाढविणे ही आवश्यक आहे. अशाप्रसंगी लोकप्रतिनिधींनी देखील या सर्व सोयी पुरवून नागरिकांना आश्वस्त करणे आवश्यक आहे.