शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
7
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
8
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
9
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
10
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
11
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
12
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
13
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
14
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
15
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
16
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
17
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
18
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

भुलाणे ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 12:59 IST

पाचही विहिरी कोरडय़ा : प्रभावी उपाययोजनेअभावी दरवर्षी पाणीटंचाईशी सामना

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 28 : तालुक्यातील भुलाणे येथे असलेल्या पाचही विहिरी कोरडय़ा झाल्या असल्याने गावक:यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे विहीर अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव सूचविण्यात आला आहे. परंतु विहीर अधिग्रहण प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याची माहिती माजी सरपंच शांतीलाल खर्डे यांनी दिली.भुलाणे गावात गोरख गोसावी, मोहन शिंदे, बाजीराव पावरा, भोंगरा रस्त्यावर म्हैस नदीजवळ व रेशन दुकानदार यांच्या घराजवळ एकूण पाच विहिरी खोदण्यात आल्या आहेत. परंतु गावातील विहिरींचे पाणी आटले असल्याने व म्हैस नदीजवळील विहिरींच्या पाण्याचा वापर होत नसल्याने आणि शाळेसमोरील हातपंपास दूषित पाणी असल्याने गावक:यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. गावाजवळील राजाराम गण्या पावरा यांच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरीवरून पाणी भरावे लागते. विद्युत भारनियमनामुळे आबालवृद्धांना या विहिरीतून दोराच्या सहाय्याने जीव धोक्यात घालून पाणी काढून भरावे लागते. हीच विहीर मागीलवर्षीही अधिग्रहण करण्यात आली होती. आताही याच विहिरीचा अधिग्रहण प्रस्ताव पाठविल्याचे माजी सरपंच खर्डे यांनी सांगितले.म्हैस नदीजवळच 2011 मध्ये विहीर खोदण्यात आली असून, मलगाव फाटय़ाजवळ बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीर्पयत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. तसेच ‘हगणदरीमुक्त गाव’ या अटीवर गेल्या सात वर्षापासून पिण्याच्या पाण्याची योजना रखडली आहे. हे गाव आता 100 टक्के हगणदरीमुक्त झाले असून याठिकाणी कायमस्वरूपी  पिण्याच्या पाण्याची योजना दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामास गती देवून पाणी योजना सुरू करावी. जेणेकरून भुलाणे गावाचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ करीता पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत भुलाणे           गावही सक्रीय असून, टेकडय़ांवर भारतीय जैन संघटनेतर्फे देण्यात आलेल्या जेसीबी व पोकलॅण्डच्या सहाय्याने सीसीटी चा:यांसह  अमरधाम जवळील नाला खोलीकरणाचे काम करण्यात येत आहे. विहीर ते पाण्याच्या टाकीर्पयतच्या नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे, म्हैस नदीवर पाणी अडविण्यासाठी पाणी फाऊंडेशन, स्वयंसेवी संस्था व ग्रामस्थांच्या मदतीने गाव शिवारात उपाययोजना करण्यात येत असल्याने जमिनीत जास्तीत जास्त पाणी जिरवण्यासाठी प्रत्यन केले जात आहेत. त्यामुळे गाव पाणीदार होवून येथील पाणीटंचाई कायमस्वरूपी हद्दपार होणार असल्याची अपेक्षा ग्रामस्थांना लागून आहे.