शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भुलाणे ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 12:59 IST

पाचही विहिरी कोरडय़ा : प्रभावी उपाययोजनेअभावी दरवर्षी पाणीटंचाईशी सामना

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 28 : तालुक्यातील भुलाणे येथे असलेल्या पाचही विहिरी कोरडय़ा झाल्या असल्याने गावक:यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे विहीर अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव सूचविण्यात आला आहे. परंतु विहीर अधिग्रहण प्रस्तावाला मंजुरी मिळाली नसल्याची माहिती माजी सरपंच शांतीलाल खर्डे यांनी दिली.भुलाणे गावात गोरख गोसावी, मोहन शिंदे, बाजीराव पावरा, भोंगरा रस्त्यावर म्हैस नदीजवळ व रेशन दुकानदार यांच्या घराजवळ एकूण पाच विहिरी खोदण्यात आल्या आहेत. परंतु गावातील विहिरींचे पाणी आटले असल्याने व म्हैस नदीजवळील विहिरींच्या पाण्याचा वापर होत नसल्याने आणि शाळेसमोरील हातपंपास दूषित पाणी असल्याने गावक:यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. गावाजवळील राजाराम गण्या पावरा यांच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरीवरून पाणी भरावे लागते. विद्युत भारनियमनामुळे आबालवृद्धांना या विहिरीतून दोराच्या सहाय्याने जीव धोक्यात घालून पाणी काढून भरावे लागते. हीच विहीर मागीलवर्षीही अधिग्रहण करण्यात आली होती. आताही याच विहिरीचा अधिग्रहण प्रस्ताव पाठविल्याचे माजी सरपंच खर्डे यांनी सांगितले.म्हैस नदीजवळच 2011 मध्ये विहीर खोदण्यात आली असून, मलगाव फाटय़ाजवळ बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीर्पयत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. तसेच ‘हगणदरीमुक्त गाव’ या अटीवर गेल्या सात वर्षापासून पिण्याच्या पाण्याची योजना रखडली आहे. हे गाव आता 100 टक्के हगणदरीमुक्त झाले असून याठिकाणी कायमस्वरूपी  पिण्याच्या पाण्याची योजना दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामास गती देवून पाणी योजना सुरू करावी. जेणेकरून भुलाणे गावाचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ करीता पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत भुलाणे           गावही सक्रीय असून, टेकडय़ांवर भारतीय जैन संघटनेतर्फे देण्यात आलेल्या जेसीबी व पोकलॅण्डच्या सहाय्याने सीसीटी चा:यांसह  अमरधाम जवळील नाला खोलीकरणाचे काम करण्यात येत आहे. विहीर ते पाण्याच्या टाकीर्पयतच्या नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे, म्हैस नदीवर पाणी अडविण्यासाठी पाणी फाऊंडेशन, स्वयंसेवी संस्था व ग्रामस्थांच्या मदतीने गाव शिवारात उपाययोजना करण्यात येत असल्याने जमिनीत जास्तीत जास्त पाणी जिरवण्यासाठी प्रत्यन केले जात आहेत. त्यामुळे गाव पाणीदार होवून येथील पाणीटंचाई कायमस्वरूपी हद्दपार होणार असल्याची अपेक्षा ग्रामस्थांना लागून आहे.