शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

दोघांच्या जन्माने ‘हिरावलेले ते’ परतल्याचा आभास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 18:51 IST

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सव्वा वर्षापूर्वी नियतीने एकाचवेळी दोघा भावांना हिरावून घेतल्यानंतर उन्मळून पडलेल्या माता-पित्याने वैद्यकीय आधार घेत पुन्हा मुलांना जन्म देण्याचा निर्णय घेतला़  पन्नाशीनंतर घेतलेल्या निणर्यात मातेच्या पोटी जुळेच जन्माला आल्याने हिरावलेले ते दोघे परत आल्याची भावना तळोदा शहरातून व्यक्त होत आह़े  तळोदा येथील शनि गल्लीतील राजेंद्र ...

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सव्वा वर्षापूर्वी नियतीने एकाचवेळी दोघा भावांना हिरावून घेतल्यानंतर उन्मळून पडलेल्या माता-पित्याने वैद्यकीय आधार घेत पुन्हा मुलांना जन्म देण्याचा निर्णय घेतला़  पन्नाशीनंतर घेतलेल्या निणर्यात मातेच्या पोटी जुळेच जन्माला आल्याने हिरावलेले ते दोघे परत आल्याची भावना तळोदा शहरातून व्यक्त होत आह़े  तळोदा येथील शनि गल्लीतील राजेंद्र पुंजू पाटील (55) यांची दोघे मुले राहूल (28) व विशाल (23) हे दोघे जुलै 2016 मध्ये मित्रांसह धडगाव तालुक्यातील बिलगाव येथे निसर्ग पर्यटनासाठी गेले होते. त्यात तेथील नयनरम्य धबधब्याच्या मोह न आवरता आल्याने ही दोघे भावंडे धबधब्यात आंघोळीसाठी उतरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. यात त्यांचा जागीच अंत झाला़ दोघांच्या अकाली मृत्यूमूळे राजेंद्र व उषाबाई पाटील या दोघांना मोठा धक्का बसला़ यातून सावरण्याचा प्रय} ते करत असले तरी  तरूण मुले गेल्याचे दु:ख ते विसरू शकत नव्हते. नातेवाईकांनी वेळावेळी साथ देऊनही त्यांचे दु:ख मात्र कमी झालेले नव्हत़े त्यातच उषाबाई ह्यांची 22 वर्षापूर्वी संतती नियमन शस्त्रक्रिया झाल्यामुळे दाम्पत्याला अधिकच दु:खी होते. तथापि एका नातेवाईकाने  सल्लानुसार पूर्वी केलेल्या शस्त्रक्रियेबाबत नाशिक येथील डॉक्टरांच्या सल्ला घेतला होता़ यात शस्त्रक्रियेनंतर पुन्हा मातृत्व शक्य असल्याचा निर्वाळा देण्यात आला होता़   त्यामुळे पाटील दाम्पत्याने खाजगी रुग्णालयात जावून शस्त्रक्रिया करून घेतली होती़ त्यांनर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी उपचार करून घेतल़े गेल्या 9 महिन्यांपासून त्यांनी घेतलेल्या उपचाराचे फलित म्हणजे गेल्या तीन दिवसांपूर्वीच उषाबाई यांनी नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात दोघा जुळ्यांना जन्म दिला. साधारण तीन किलो वजनाची ही बालके असून, दोघांची प्रकृती ही सुदृढ असल्याची माहिती देण्यात आली आह़े सोबत बरोबर मातेची प्रकृतीही चांगली आहे. दुर्देवी घटनेत वंशाचे दिवे हरपल्यानंतर पन्नाशी नंतर पाटील दाम्पत्यांना पुन्हा दोन जुळे जन्माला आली आहेत़ जन्माले आलेले दोघेही हुबेहूब राहूल अन् विशाल या दीड वर्षापूर्वी मयत झालेल्या मुलांसारखेच दिसत असल्याने त्यांनीच पुर्नजन्म घेतला असल्याचे बोलले जात आह़े