शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

बाधितांनी वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सरदार सरोवर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांची मोड, वडछील, चिखली, काथर्दे या तीन वसाहतींना मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांची मोड, वडछील, चिखली, काथर्दे या तीन वसाहतींना मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी संबंधित विभागांच्या अधिका:यांसह भेट दिली. या वेळी त्यांनी बाधितांच्या पुनर्वसनाबाबतच्या समस्या पाहून तीव्र नाराजी व्यक्त करून पुढील पावसाळ्यापूर्वी सुविधा उपलब्ध होण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, बाधितांनी अनेक समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.सरदार सरोवर प्रकल्प बाधित झालेल्या अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील साधारण 300 कुटुंबांसाठी प्रशासनाने तळोदा व शहादा तालुक्यातील मोड, वडछील, चिखली व काथर्दे या तीन ठिकाणी दोन ते अडीच वर्षापूर्वी नवीनच स्थलांतर केले आहे. तथापि, या वसाहतींमध्ये अजूनही प्रशासन व संबंधीत विभागाने पुरेशा प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. त्यामुळे येथील बाधितांना आजही अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. याच पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी संबंधित यंत्रणांच्या प्रमुख अधिका:यांसोबत मंगळवारी प्रत्यक्ष या तिन्ही वसाहतींना भेट दिली. या वेळी शहाद्याचे प्रांताधिकारी चेतन गिरासे, तळोद्याचे अविशांत पांडा, नर्मदा विकास विभागाचे कार्यकारी अभियंता एस.व्ही. गावीत, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, पंकज लोखंडे, नर्मदा बचाव आंदोलनाचे चेतन साळवे, लतिका राजपूत, ओरसिंग पटले, नुरजी वसावे, लालसिंग वसावे, सुनील पावरा, तिरसिंग वसावे, पिंजारीबाई पावरा आदींसह तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते. प्रारंभी त्यांनी शहादा तालुक्यातील वडछील व काथर्दे या वसाहतींना भेट दिली. त्यांनी प्रत्यक्ष बाधितांशी संवाद साधला. चिखली येथे अजूनही 70 घर, प्लॉटची आवश्यकता असून, तातडीने उपलब्ध करून द्यावे. याशिवाय तेथे नागरिक सुविधांचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. दवाखाना, शाळा इमारतींना तडे गेले आहेत. शिक्षकांअभावी तेथील मुले जवळच्या शाळेत जातात. त्यामुळे त्यांनी येथेच शाळा चालू करून शिक्षक उपलब्ध करून देण्याची सूचना गटशिक्षणाधिका:यांना    दिली. तेथील सुविधांबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.  त्यानंतर ते काथर्दे दिगर वसाहतीत आले. तेथेही बाधितांनी           त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. दोन वर्षे होऊनही 27 जणांना प्लॉटची जागा उपलब्ध करण्यात आलेली नाही. रस्ते, गटारी, दवाखाना, ग्रामपंचायत, समाज मंदिर आदी सुविधा नाही. या सर्व  बाबींसाठी तातडीने इस्टीमेट तयार करून प्रस्ताव पाठवा. तसेच प्लॉटस्, दवाखाना, समाज मंदिरासाठी खाजगी शेतक:यांची जमीन त्यांना तयार करून विकत घेण्याची सूचना संबंधितांना दिली. शेवटी त्यांनी मोड पुनर्वसन वसाहतीस भेट दिली. येथेही प्लॉटस्ची मागणी बाधितांनी केली. याशिवाय नदीच्या पुढील बंद प्रवाहामुळे पावसाळ्यात संपूर्ण संसारच वाहून गेल्याची व्यथा विस्थापितांनी बोलून दाखविली. त्या वेळी त्यांनी या अतिक्रमण करणा:या तत्काळ नोटीसा बजावून प्रवाह मोकळा करा. त्याचबरोबर नाल्यांचे खोलीकरण करुन वसाहतींस सरक्षण भिंत बांधण्याच्या सूचना देऊन येत्या पावसाळ्यापूर्वी या प्रकरणी ठोस कारवाई करण्याचे आवाहन अधिका:यांना केले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष वसाहतींना भेटी देऊन विस्थापितांच्या समस्यांना फुंकर घातली असली तरी त्यावर पुढील कार्यवाहीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची बाधितांची अपेक्षा आहे. अन्यथा या भेटी औपचारिकता ठरू नये.