शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बाधितांनी वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सरदार सरोवर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांची मोड, वडछील, चिखली, काथर्दे या तीन वसाहतींना मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांची मोड, वडछील, चिखली, काथर्दे या तीन वसाहतींना मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी संबंधित विभागांच्या अधिका:यांसह भेट दिली. या वेळी त्यांनी बाधितांच्या पुनर्वसनाबाबतच्या समस्या पाहून तीव्र नाराजी व्यक्त करून पुढील पावसाळ्यापूर्वी सुविधा उपलब्ध होण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, बाधितांनी अनेक समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.सरदार सरोवर प्रकल्प बाधित झालेल्या अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील साधारण 300 कुटुंबांसाठी प्रशासनाने तळोदा व शहादा तालुक्यातील मोड, वडछील, चिखली व काथर्दे या तीन ठिकाणी दोन ते अडीच वर्षापूर्वी नवीनच स्थलांतर केले आहे. तथापि, या वसाहतींमध्ये अजूनही प्रशासन व संबंधीत विभागाने पुरेशा प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. त्यामुळे येथील बाधितांना आजही अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. याच पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी संबंधित यंत्रणांच्या प्रमुख अधिका:यांसोबत मंगळवारी प्रत्यक्ष या तिन्ही वसाहतींना भेट दिली. या वेळी शहाद्याचे प्रांताधिकारी चेतन गिरासे, तळोद्याचे अविशांत पांडा, नर्मदा विकास विभागाचे कार्यकारी अभियंता एस.व्ही. गावीत, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, पंकज लोखंडे, नर्मदा बचाव आंदोलनाचे चेतन साळवे, लतिका राजपूत, ओरसिंग पटले, नुरजी वसावे, लालसिंग वसावे, सुनील पावरा, तिरसिंग वसावे, पिंजारीबाई पावरा आदींसह तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते. प्रारंभी त्यांनी शहादा तालुक्यातील वडछील व काथर्दे या वसाहतींना भेट दिली. त्यांनी प्रत्यक्ष बाधितांशी संवाद साधला. चिखली येथे अजूनही 70 घर, प्लॉटची आवश्यकता असून, तातडीने उपलब्ध करून द्यावे. याशिवाय तेथे नागरिक सुविधांचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. दवाखाना, शाळा इमारतींना तडे गेले आहेत. शिक्षकांअभावी तेथील मुले जवळच्या शाळेत जातात. त्यामुळे त्यांनी येथेच शाळा चालू करून शिक्षक उपलब्ध करून देण्याची सूचना गटशिक्षणाधिका:यांना    दिली. तेथील सुविधांबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.  त्यानंतर ते काथर्दे दिगर वसाहतीत आले. तेथेही बाधितांनी           त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. दोन वर्षे होऊनही 27 जणांना प्लॉटची जागा उपलब्ध करण्यात आलेली नाही. रस्ते, गटारी, दवाखाना, ग्रामपंचायत, समाज मंदिर आदी सुविधा नाही. या सर्व  बाबींसाठी तातडीने इस्टीमेट तयार करून प्रस्ताव पाठवा. तसेच प्लॉटस्, दवाखाना, समाज मंदिरासाठी खाजगी शेतक:यांची जमीन त्यांना तयार करून विकत घेण्याची सूचना संबंधितांना दिली. शेवटी त्यांनी मोड पुनर्वसन वसाहतीस भेट दिली. येथेही प्लॉटस्ची मागणी बाधितांनी केली. याशिवाय नदीच्या पुढील बंद प्रवाहामुळे पावसाळ्यात संपूर्ण संसारच वाहून गेल्याची व्यथा विस्थापितांनी बोलून दाखविली. त्या वेळी त्यांनी या अतिक्रमण करणा:या तत्काळ नोटीसा बजावून प्रवाह मोकळा करा. त्याचबरोबर नाल्यांचे खोलीकरण करुन वसाहतींस सरक्षण भिंत बांधण्याच्या सूचना देऊन येत्या पावसाळ्यापूर्वी या प्रकरणी ठोस कारवाई करण्याचे आवाहन अधिका:यांना केले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष वसाहतींना भेटी देऊन विस्थापितांच्या समस्यांना फुंकर घातली असली तरी त्यावर पुढील कार्यवाहीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची बाधितांची अपेक्षा आहे. अन्यथा या भेटी औपचारिकता ठरू नये.