शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव, १७ दिवसांत आढळले सात बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:33 IST

नंदुरबार : कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात गेल्या १७ दिवसांत सात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गणेशोत्सवात झालेली गर्दी आणि विविध ...

नंदुरबार : कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात गेल्या १७ दिवसांत सात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गणेशोत्सवात झालेली गर्दी आणि विविध निर्बंध शिथिल झाल्याने रुग्ण संख्या वाढू लागली आहे. गेल्या तीन दिवसात चार रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यादृष्टीने आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. जिल्हा रुग्णालयात देखील कोरोना उपचार कक्ष सुसज्ज करण्यात येत आहे.

कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. ऑगस्ट महिना थोडाफार दिलासादायक ठरला होता. सलग १५ दिवस या महिन्यात रुग्ण आढळून आले नव्हते. मात्र सप्टेंबर महिन्यात विविध सण उत्सव आणि शासनाने निर्बंध शिथिल केल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा सक्रिय झाला आहे. वास्तविक या काळात सर्वाधिक व्हायरल इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी आदी प्रकारचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. नेमके त्याचवेळी कोरोना चाचण्या अवघ्या १०० ते १५० करण्यात येत होत्या.

१७ दिवसांत सात रुग्ण

जिल्ह्यात गेल्या १७ दिवसांत सात रुग्ण आढळून आले आहेत. त्यात केवळ नंदुरबारातील पाच रुग्णांचा समावेश असून इतर दोन रुग्ण हे तळोदा व नवापूर तालुक्यातील आहेत. यामुळे नंदुरबार शहर व तालुक्यात विशेष दक्षता घेणे गरजेेचे ठरणार आहे. एकूण सात रुग्णांमध्ये तीन रुग्ण हे ग्रामीण भागातील तर चार रुग्ण शहरी भागातील आहेत.

रुग्ण साखळी शोधावी

कोरोना रुग्ण आढळून आलेल्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे गरजेचे आहे. परंतु रुग्ण साखळी शोधण्याबाबत फारशी दक्षता घेतली जात नसल्याचे चित्र आहे. तसे झाल्यास कोरोनाचा फैलाव झपाट्याने होऊन पुन्हा कोरोनाचा विळखा वाढेल असे बोलले जात आहे. याबाबत आरोग्य विभागाने दक्षता घेऊन उपाययोजना कराव्या अशी मागणी करण्यात येत आहे.

सण-उत्सवांमधील बेफिकिरपणा

सण व उत्सवांमधील बेफिकिरीने आता नागरिकांच्या जिवावर उठला आहे. गणेशोत्सव काळात गर्दी करू नये, साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा, घरच्या घरी विसर्जन करावे असे आवाहन प्रशासनाने केले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून नागरिकांनी नियम आणि सूचनांना केराची टोपली दाखवली होती. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे यापुढील काळात तरी किमान नियम व सूचनांचे पालन करून नागरिकांनी स्वत: खबरदारी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

n गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कोरोना चाचण्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण देखील कमी आहे. जर चाचण्या वाढविल्या तर रुग्ण संख्या देखील वाढू शकते. सद्य स्थितीत दोनच ठिकाणी स्वॅब संकलन सुरू असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

n सद्यस्थितीत आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. रॅपिड ॲंटिजन चाचण्या होत नसल्याची स्थिती आहे. पूर्वीप्रमाणे रॅपिड चाचण्यांची सोय नंदुरबार, शहादा, नवापूर या शहरांमध्ये काही ठिकाणी केली तर ते नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे ठरणार आहे.

n जिल्हा रुग्णालयात असलेल्या कोविड उपचार कक्षात देखील रुग्ण नसल्याने त्या ठिकाणचे कर्मचारी इतर ठिकाणी वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे आता हा कक्ष देखील आवश्यक त्या सुविधांसह सज्ज ठेवणे आवश्यक असून डाॅक्टर व कर्मचारी यांची देखील नियुक्ती करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.