शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

प्रवाशांकडून वसूल केली जातेय खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 12:51 IST

रेल्वेतील ‘ग्राऊंड रिपोर्ट’ : हाताला लागले असल्याचे भासवण्यासाठी ‘स्टिकर्स’चा वापर

नंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम रेल्वे मार्गावरुन धावणा:या रेल्वे गाडय़ांमध्ये महिला व 10 ते 14 वर्ष वयोगटातील बालिकांची टोळी सक्रिय झाली आह़े त्यांच्याकडून रेल्वेतील प्रवाशांजवळ पैशांचा तगादा लावण्यात येत आह़े हाताला काही तरी भिषण लागले आहे, असे भासविण्यासाठी ‘स्टिकर्स’चादेखील वापर केला जात आह़े त्यामुळे या किळसवाण्या प्रकारामुळे प्रवासी चांगलेच त्रस्त झाले आहेत़चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसमध्ये काही दिवसांपासून दान ते तीन महिला व 10 ते 14 वयोगटातील बालिकांकडून भिक मागून पैसा जमा करण्याचा व्यवसाय करण्यात येत आह़े जास्तीत जास्त प्रवासी कशा प्रकारे पैसे देतील यासाठी महिलांकडून एक अनोखी शक्कल लढवली जात आह़े प्रवाशांना दया-मया यावी म्हणून संबंधित बालिकांच्या हाताला काही तरी गंभीर इजा झाली आहे, असे भासवण्यासाठी बनावट स्टिकर्स लावण्यात येत आहेत़ तसेच हाताला, पायाला गँगरीन झालाय, डोळ्यांनी दिसत नाही, गुडघ्यावर शस्त्रक्रिया करायची आहे आदी विविध बहाने सांगून प्रवाशांकडून पैशांची मागणी करण्यात येत आह़े प्रवाशांनी पैसे देण्यासाठी टाळाटाळ केल्यास दबरजस्ती पैशांचा तगादा लावला जात आह़े हाताला लावण्यात येणारे स्टिकर्स इतके खरेखुरे वाटतात की त्यामुळे अनेक प्रवाशांना हाताला खरच गंभीर इजा झाली असल्याचे खरेसुध्दा वाटत़े संबंधित बालिका हाताला लावण्यात आलेले स्टिकर्स मुद्दाम प्रवाशांच्या जवळ नेत असतात़ त्यामुळे नाईलाजास्तव किळस किंवा दया येऊन अनेक प्रवासी पैसे देवून मोकळे होत असतात़ हा अत्यंत भिषण प्रकार मुख्यत पश्चिम रेल्वे मार्गावर धावणा:या रेल्वे गाडय़ांमध्ये होत आहेत़ त्यामुळे याला कुठेतरी आळा बसावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़ेप्रवाशांना होतोय मनस्तापसंबंधित भिक्षुकी महिला व बालिका थेट आरक्षित रेल्वे बोग्यांमध्ये शिरुन प्रवाशांकडून एकप्रकारे पैशांची खंडणीच वसूल करीत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आह़े कमी अधिक सर्वच रेल्वे गाडय़ांमध्ये अशीच परिस्थिती आह़े एकीकडे प्रवासी भलामोठा पैसा मोजून रेल्वेचे आरक्षण करीत असतात़  अनेक प्रवासी सामान्य बोगींमधील धकाधकीपासून मुक्तता व्हावी म्हणून आरक्षण करुन आपला प्रवास सुकर व्हावा अशी अपेक्षा बाळगत असतात़ परंतु रेल्वेमधील भिका:यांमुळे त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले जात असल्याचे सांगण्यात येत आह़े रेल्वेत अशा प्रकारे त्रास सहन करावा लागत असल्याने अनेक प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आह़े दरम्यान, प्रवाशांना भिक्षुकांप्रमाणेच रेल्वेत फिरणा:या विनापरवाना फेरीवाल्यांचाही मोठय़ा प्रमाणात त्रास होत आह़े अनेक वेळा प्रवाशांना अरेरावीसुध्दा होत असत़े त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रवाशांनी सांगितल़े