शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

टोलेबाजीविना रंगला सर्वपक्षीय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:31 IST

नंदुरबार : एखाद्या समारंभाला राज्यातील सत्ताधारी तीन पक्षांतील तीन मंत्री, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते, अर्धा डझन आमदार आणि ...

नंदुरबार : एखाद्या समारंभाला राज्यातील सत्ताधारी तीन पक्षांतील तीन मंत्री, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते, अर्धा डझन आमदार आणि विविध पक्षांचे पदाधिकारी एका व्यासपीठावर उपस्थित राहिले आणि कुठलेही राजकीय भाष्य अथवा टोलेबाजी झाली नाही असे कुणी सांगितल्यास कुणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र, याचा चक्क अनुभव घेतला तो शहादावासीयांनी. स्व. पी.के. अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात हा प्रत्यय आला.

स्वातंत्र्यसेनानी व सहकारमहर्षी स्व. पी.के. अण्णा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने शनिवारी पी.के. अण्णा फाउंडेशनतर्फे लोणखेडा, ता. शहादा येथे उभारण्यात आलेल्या पी.के. अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी. पाडवी, खासदार रक्षा खडसे, माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, आमदार सुधीर तांबे, आमदार राजेश पाडवी, आमदार काशीराम पावरा यांच्यासह सर्व पक्षांतील पदाधिकारी उपस्थित होते. हा समारंभ म्हणजे जणू सर्वपक्षीय मेळावाच होता. कार्यक्रम तसा पूर्वनियोजित होता; पण मध्येच जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाची स्थगिती उठविण्यात आली आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली. विशेष म्हणजे ज्या लोणखेडा येथे हा कार्यक्रम होता त्याच गटाची पोटनिवडणूकही होत असून, तेथे खुद्द पी.के. अण्णा पाटील यांच्या स्नुषा जयश्री पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, आचारसंहिता आणि कार्यक्रमाचे औचित्याचे भान सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ठेवल्याने खूप वर्षांनंतर प्रथमच ‘मॅच्युअर पॉलिटिकल इव्हेंट’ जिल्ह्यातील जनतेला पाहायला मिळाला. समारंभात नेत्यांची भाषणेही झाली. या भाषणात कुणीही कुठल्या पक्षावर अथवा वैयक्तिक टीकाटिपणी पूर्णपणे टाळून पी.के. अण्णा पाटील यांचे कर्तृत्व केंद्रबिंदू मानून सर्वांची भाषणे झाली. व्यासपीठावरदेखील सर्वच पक्षांतील नेत्यांमध्ये राजकीय खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमानंतरदेखील नेत्यांना पत्रकारांनी वैयक्तिक गाठून राज्यातील राजकारणाबाबत प्रश्नांची सरबत्ती केली; परंतु त्यावेळीदेखील नेत्यांनी भान ठेवले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वारंवार राज्यातील सहकाराच्या स्थितीबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी वैयक्तिक आरोप करणे टाळून सहकाराचे स्वाहाकार होऊ नये, अशी सूचक प्रतिक्रिया दिली. रस्त्यांबाबतदेखील त्यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. नुकतेच औरंगाबाद येथील समारंभात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाजपच्या नेत्यांना उद्देशून ‘भावी सहकारी’ या वक्तव्याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनीही सावध प्रतिक्रिया दिली. नेत्यांनी भूमिका मांडायची असते आणि कार्यकर्त्यांनी आदेशाचे पालन करायचे असते, अशी सावध प्रतिक्रिया नेहमीच आक्रमक भूमिका मांडणाऱ्या मंत्री पाटील यांनी घेतली. जयंत पाटील यांनीदेखील कुठलेही राजकीय वक्तव्य केले नाही. जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांचा प्रश्न गंभीर असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे या योजना मार्गी लावण्याची मागणी केली. मात्र, त्यावरदेखील आचारसंहिता असल्याने आज आपण काहीही सांगू शकत नाही; पण आचारसंहिता संपताच या भागात पुन्हा येऊन शेतकऱ्यांचे ऐकून घेऊ व चांगले करता येईल ते करू, असे सांगितले. पूर्ण कार्यक्रमात जयंत पाटील यांनी मात्र मुख्य आयोजक व पी.के. अण्णा फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांना वैयक्तिक टोला लगावला. पी.के. अण्णांशी कौटुंबिक संबंधाचा दाखला देत त्यांनी दीपक पाटील यांना ‘तुम्ही कधी आमच्या पक्षात आले आणि आमच्या पक्षातून कधी दुसऱ्या पक्षात गेले, हे मला तुम्ही सांगितले नाही याची खंत आहे...’ त्यांचे हे वक्तव्य मात्र संपूर्ण कार्यक्रमाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी निश्चितच राहिले.

देवेंद्र फडणवीस यांनी यापुढील काळात पी.के. अण्णांचे राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी सर्व नेते प्रयत्न करू, असे सांगून शहादावासीयांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या सहानुभूतीपूर्वक वक्तव्याने मात्र शहादा परिसरातील नागरिकांच्या आशा पल्लवित केल्या आहेत.