शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

टोलेबाजीविना रंगला सर्वपक्षीय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:31 IST

नंदुरबार : एखाद्या समारंभाला राज्यातील सत्ताधारी तीन पक्षांतील तीन मंत्री, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते, अर्धा डझन आमदार आणि ...

नंदुरबार : एखाद्या समारंभाला राज्यातील सत्ताधारी तीन पक्षांतील तीन मंत्री, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते, अर्धा डझन आमदार आणि विविध पक्षांचे पदाधिकारी एका व्यासपीठावर उपस्थित राहिले आणि कुठलेही राजकीय भाष्य अथवा टोलेबाजी झाली नाही असे कुणी सांगितल्यास कुणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र, याचा चक्क अनुभव घेतला तो शहादावासीयांनी. स्व. पी.के. अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात हा प्रत्यय आला.

स्वातंत्र्यसेनानी व सहकारमहर्षी स्व. पी.के. अण्णा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने शनिवारी पी.के. अण्णा फाउंडेशनतर्फे लोणखेडा, ता. शहादा येथे उभारण्यात आलेल्या पी.के. अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी. पाडवी, खासदार रक्षा खडसे, माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, आमदार सुधीर तांबे, आमदार राजेश पाडवी, आमदार काशीराम पावरा यांच्यासह सर्व पक्षांतील पदाधिकारी उपस्थित होते. हा समारंभ म्हणजे जणू सर्वपक्षीय मेळावाच होता. कार्यक्रम तसा पूर्वनियोजित होता; पण मध्येच जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाची स्थगिती उठविण्यात आली आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली. विशेष म्हणजे ज्या लोणखेडा येथे हा कार्यक्रम होता त्याच गटाची पोटनिवडणूकही होत असून, तेथे खुद्द पी.के. अण्णा पाटील यांच्या स्नुषा जयश्री पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, आचारसंहिता आणि कार्यक्रमाचे औचित्याचे भान सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ठेवल्याने खूप वर्षांनंतर प्रथमच ‘मॅच्युअर पॉलिटिकल इव्हेंट’ जिल्ह्यातील जनतेला पाहायला मिळाला. समारंभात नेत्यांची भाषणेही झाली. या भाषणात कुणीही कुठल्या पक्षावर अथवा वैयक्तिक टीकाटिपणी पूर्णपणे टाळून पी.के. अण्णा पाटील यांचे कर्तृत्व केंद्रबिंदू मानून सर्वांची भाषणे झाली. व्यासपीठावरदेखील सर्वच पक्षांतील नेत्यांमध्ये राजकीय खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमानंतरदेखील नेत्यांना पत्रकारांनी वैयक्तिक गाठून राज्यातील राजकारणाबाबत प्रश्नांची सरबत्ती केली; परंतु त्यावेळीदेखील नेत्यांनी भान ठेवले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वारंवार राज्यातील सहकाराच्या स्थितीबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी वैयक्तिक आरोप करणे टाळून सहकाराचे स्वाहाकार होऊ नये, अशी सूचक प्रतिक्रिया दिली. रस्त्यांबाबतदेखील त्यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. नुकतेच औरंगाबाद येथील समारंभात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाजपच्या नेत्यांना उद्देशून ‘भावी सहकारी’ या वक्तव्याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनीही सावध प्रतिक्रिया दिली. नेत्यांनी भूमिका मांडायची असते आणि कार्यकर्त्यांनी आदेशाचे पालन करायचे असते, अशी सावध प्रतिक्रिया नेहमीच आक्रमक भूमिका मांडणाऱ्या मंत्री पाटील यांनी घेतली. जयंत पाटील यांनीदेखील कुठलेही राजकीय वक्तव्य केले नाही. जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांचा प्रश्न गंभीर असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे या योजना मार्गी लावण्याची मागणी केली. मात्र, त्यावरदेखील आचारसंहिता असल्याने आज आपण काहीही सांगू शकत नाही; पण आचारसंहिता संपताच या भागात पुन्हा येऊन शेतकऱ्यांचे ऐकून घेऊ व चांगले करता येईल ते करू, असे सांगितले. पूर्ण कार्यक्रमात जयंत पाटील यांनी मात्र मुख्य आयोजक व पी.के. अण्णा फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांना वैयक्तिक टोला लगावला. पी.के. अण्णांशी कौटुंबिक संबंधाचा दाखला देत त्यांनी दीपक पाटील यांना ‘तुम्ही कधी आमच्या पक्षात आले आणि आमच्या पक्षातून कधी दुसऱ्या पक्षात गेले, हे मला तुम्ही सांगितले नाही याची खंत आहे...’ त्यांचे हे वक्तव्य मात्र संपूर्ण कार्यक्रमाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी निश्चितच राहिले.

देवेंद्र फडणवीस यांनी यापुढील काळात पी.के. अण्णांचे राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी सर्व नेते प्रयत्न करू, असे सांगून शहादावासीयांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या सहानुभूतीपूर्वक वक्तव्याने मात्र शहादा परिसरातील नागरिकांच्या आशा पल्लवित केल्या आहेत.