लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील रायपूर व बोकळझर येथे चक्रीवादळ सदृश्य वा:यामुळे तीन घरांची पडझड झाल्याने नुकसान झाले. नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. नवापूर तालुक्यात जून व जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस नाही. रोज आकाश भरुन येते व पावसाचे वातावरणही तयार होते. पाऊस मात्र येत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. ग्रामीण भागात कुठे पाऊस आहे तर कुठे अजिबात पाऊस नाही अशी अजब स्थिती प्रथमच अनुभवास येत आहे. मात्र तालुक्यातील रायपूर येथे 23 जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चक्रीवादळ सदृश्य वारा अचानक सुरु झाला. त्यात यशोदा अजरुन गावीत यांच्या घरावर चिंचेचे मोठे झाड उन्मळून पडले. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र घराचा पुढचा भाग क्षतिग्रस्त होऊन मोठे नुकसान झाले. दुलीबाई हुरजी गावीत यांचे घराचे छतावरील सिमेंटचे पत्रे उडून नुकसान झाले. बोकळझर येथेही असाच प्रकार घडून सुकलाल लिमजी गावीत यांचे पूर्ण घर पडून गेले. घटनेची माहिती मिळताच आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, रायपूरचे सरपंच ईश्वर गावीत, बोकळझरचे सरपंच राहुल गावीत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तहसीलदार सुनीता ज:हाड यांना घटनेची माहिती देऊन नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शिरीष नाईक यांनी केली.
नवापूर तालुक्यात मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. शहरालगत वाकीपा गावात वीज पडून पाच बक:या व तीन मेंढय़ा ठार झाल्याची घटना घडली. गेल्या दोन दिवसांपासून नवापूर तालुक्यात विजांचा कडकडाट व वादळी वा:यासह पावसाने चांगलेच झोडपले आहे. वाकीपाडा गावात वीज कोसळून पाच बक:या व तीन मेंढय़ांचा मृत्यू झाला असून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वाकीपाडाचे पोलीस पाटील व सरपंचांनी तात्काळ दखल घेत प्रशासनाला माहिती कळविली असून नायब तहसीलदार राजेंद्र नजन यांनी घटनेचा पंचनामा करण्यासाठी संबंधित तलाठय़ांना आदेश दिले आहेत.