शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

तळोदा तालुक्यात थंडीअभावी रब्बीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 11:57 IST

तळोदा तालुका : यंदा गहु, हरभरा पेरणी लांबण्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथा परिसरात थंडीअभावी रब्बीची पेरणी खोळंबली आह़े परिसरातील पाडळपूर, रोझवा पुनर्वसन, गढीकोठडा, वरपाडा, गोपाळपूर पुनर्वसन आदी परिसरात अद्यापही गहू, हरभरा पिकांची समाधानकारक पेरणी झालेली नाही़नोव्हेंबर महिना अध्र्यावर आला असला तरी वातावरणात पिकांना पोषक असलेला गारठा अद्याप निर्माण झालेला नाही़ त्यामुळे शेतक:यांकडून गहू, हरभरा पेरणीला विलंब होत आह़े दरम्यान शेतक:यांकडून ज्यारी, सोयाबीन, मकासह इतर खरीप पिके घेतलेली शेते मशागत करुन तयार आह़े परंतु अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात गारठा जाणवत नसल्याने शेतक:यांना कडाक्याच्या थंडीची प्रतिक्षा लागून आल़े रोझवा लघुप्रकल्पाची गळती सुरुच असल्याने गहुसारखे पिके पेरल्यास पाच ते सहा वेळा पाणी देणे शक्य होणार नसल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े कमी पाण्यात लवकर येणारे हरभरा पिक पेरणीस शेतकरी प्राधान्य देणार असल्याचे परिसरातून सांगण्यात येत आह़े त्यामुळे साहजीकच यंदा हरभरा पिकाचे क्षेत्र वाढणार असल्याचे स्पष्ट आह़े मागील हंगामाच्या तुलने यंदाच्या हंगामात गहु व हरभरा पेरणी उशिराने होणार असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आह़े मागील वर्षी पावसानेदेखील दमदार हजेरी लावली होती़ त्यामुळे साहजिकच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच कडाक्याची थंडी जाणवायला लागली होती़ त्यामुळे थंडी पडायला लागल्यावर लागलीच शेतक:यांनी सुमारे 70 ते 80 टक्के पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ातच केल्याची माहिती परिसरातील जाणकार शेतक:यांनी दिली़ परंतु यंदा त्याच्या विपरित स्थिती निर्माण झाली आह़े परिसरात इतर तालुक्याच्या दृष्टीने समाधानकारक पाऊस झाला असला तरी लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतील इतका पाऊस झालेला नाही़ तुरळक झालेल्या पावसाने पाण्याची पातळीदेखील वाढली नसल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे साहजिकच अद्याप थंडीलाही सुरुवात झालेली नाही़ नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ परिसरात नेहमीच पाण्याची टंचाई जाणवत असत़े यंदा विहिरींसह, नद्या, लघुप्रकल्प आदींमध्येही पाणी नसल्याने यंदाचा रब्बी हंगाम लांबण्याची शक्यता आह़े मागील वर्षी येथील शेतक:यांनी कांदा हे पिक मोठय़ा प्रमाणात लावले होत़े