लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खरीप हंगाम लवकर आटोपून रब्बीसाठी बहुतांश शेतकऱ्यांनी पिक पेरणी केली. त्यातील बहुतांश पिके परिपक्वतेच्या उंबरठ्यावर आले आहे. त्यात बाजरी, हरभरा यासह गहू पिकांचा समावेश आहे.अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीपातील कामे तातडीने आटोपून रब्बी हंगामाला सुरुवात केली. लवकर पेरणी झालेल्या पिकांना पाण्याच्या मुबलकतेमुळे अपेक्षेनुसार पाणी देता आले. या आधारे या पिकांची चांगली वाढ होऊ शकली, तर सद्यस्थितीत ही पिके परिपक्वदेखील झाली आहे. जिल्ह्यातील नोव्हेंबरनंतर अवकाळी पाऊस झाला नसल्याने ही पिके सुरक्षीत राहिली असल्याने ही पिके शेतकºयांना भरघोस उत्पन्नाची हमी देत आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे समाधान व्यक्त होत असतांनाच वातावरणाने अशीच साथ द्यावी, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे.
पोषक वातावरणामुळे रब्बी पिके तरारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:26 IST