शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

रब्बीचे क्षेत्र यंदा 25 टक्क्यांनी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यात यंदा जवळपास दहा हजार हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रावर रब्बीची पेरणी होणार आहे. त्यादृष्टीने कृषी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यात यंदा जवळपास दहा हजार हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रावर रब्बीची पेरणी होणार आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. आवश्यक बियाण्यांची व खतांची उपलब्धतेच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, यंदा गहू पिकाचे क्षेत्र 20 ते 25 टक्क्यांनी वाढणार आहे. गेल्या तीन ते चार वर्षापासून पाण्याअभावी रब्बी हंगामात निम्मे उत्पादनही मिळत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे शेतक:यांचे आर्थिक गणित कोलमडले होते. गेल्या वर्षी तर दुष्काळामुळे पिण्यासाठी पाणी नसतांना शेतीसाठी पाणी आणणार कुठून हा प्रश्न होता. त्यामुळे गेल्या वर्षी रब्बी हंगाम देखील वाया गेला होता. मुख्य पीक असलेले गहू आणि हरभराचे उत्पादन निम्मे देखील आले नव्हते. यंदा मात्र, परिस्थिती वेगळी आहे. अतिवृष्टीमुळे आणि तब्बल 140 टक्के पावसामुळे अद्यापही नदी, नाले वाहत आहे. लहान, मोठे प्रकल्प आणि बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. यामुळे यंदा रब्बी हंगामासाठी पाण्याची चिंता नसल्यामुळे रब्बीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होण्याची अपेक्षा शेतक:यांना आहे. परिणामी रब्बीचे क्षेत्र 20 ते 25 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता देखील कृषी विभागाने व्यक्त केली आहे. 731.57 हेक्टर क्षेत्रजिल्ह्यात रब्बी व उन्हाळी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 731.57 हेक्टर इतके आहे. त्यापैकी जवळपा 491.56 हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी होत असते. यंदा मात्र सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधीक क्षेत्रावर पेरणीचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या पावसामुळे शेतांमध्ये अजूनही ओल कायम आहे. ब:याच शेतांमध्ये अजूनही पाणी साचलेले आहे. यामुळे रब्बीसाठी ही बाब दिलासादायक तेव्हढीच मदतीची देखील ठरणार आहे. अनेक शेतक:यांच्या शेतातील कुपनलिका, विहिरी या तुडूंब भरल्या आहेत. त्यामुळे रब्बी हंगामाला ते पोषक ठरणार आहे.विविध पिकांचे क्षेत्र जिल्ह्यात रब्बीच्या सर्वसाधारण क्षेत्रापैकी विविध पिकांचे क्षेत्र साधारणत: पुढील प्रमाणे आहे. ज्वारी 160.33 हेक्टर, गहू 211.23 हेक्टर, मका 33.82 हेक्टर, इतर तृणधान्य 1.93 हेक्टर, हरभरा 204.5 हेक्टर, इतर कडधान्य 10.34 हेक्टर, करडई 1.67 हेक्टर, सूर्यफूल 0.88 हेक्टर असे सर्वसाधारण रब्बी पिकांचे क्षेत्र जिल्ह्यात आहे. गहू, हरभरा वाढणार..यंदा गहू व हरभरा पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र हे वाढणार आहे. गहूचे एक ते दीड पट तर हरभराचे देखील क्षेत्र ब:यापैकी वाढणार आहे. या दोन्ही पिकांना थंडीची आवश्यकता असते यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार थंडीचे प्रमाण देखील सर्वधारणपेक्षा अधीक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच दृष्टीने यंदा रब्बीसाठी पोषक वातावरण राहणार आहे. खतांचीही उपलब्धतारब्बी हंगामासाठी रासायनिक खतांची देखील आवश्यक ती उपलब्धता करून देण्यात आली आहे.  रब्बी हंगामासाठी सर्वसाधरणत: 70 ते 75 मे.टन रासायनिक खतांची उपलब्धता लागते. तेव्हढी मागणी कृषी विभागातर्फे कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 72.563 मे.टन खत मागणी करण्यात आली होती. तेवढी उपलब्ध झाली होती. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे त्यातील निम्मेच खत शेतक:यांनी उचलले होते. रब्बीसह अनेक शेतकरी उन्हाळी हंगाम देखील घेत असतात. यंदा रब्बी प्रमाणेच उन्हाळी हंगामही चांगला राहण्याची शक्यता आहे. जमिनीतील वाढलेली पाण्याची पातळी आणि विहिर व कुपनलिकांना असलेले पाणी यामुळे उन्हाळी भुईमूग, बाजरी व इतर पिकांची स्थिती व क्षेत्र यंदा चांगले वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली.