शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

पालिकेच्या सभेत अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : बसस्थानक ते दोंडाईचा रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण झाल्याने हा रस्ता गायब झाला आहे. त्यामुळे रस्ता ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : बसस्थानक ते दोंडाईचा रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण झाल्याने हा रस्ता गायब झाला आहे. त्यामुळे रस्ता की, अतिक्रमण अशी परिस्थिती शहराची निर्माण झाली आहे. पालिका कार्यालयाभोवतीदेखील अतिक्रमण झाले असल्यामुळे प्रशासन करते तरी काय असा प्रश्न प्रा.मकरंद पाटील यांनी उपस्थित केल्याने अतिक्रमनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात स्वच्छतेचा अभाव, आरोग्याचा प्रश्न, मोकाट कुत्रे व वराहांचा उपद्रव आदीं प्रश्नांवर शनिवारी पालिकेची सर्वसाधारण सभा गाजली.नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. याप्रसंगी उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, मुख्याधिकारी राहुल वाघ, प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी गायकवाड आदी उपस्थित होते. या सभेत 15 विषय होते. त्यातील वाढीव पाणीपुरवठा योजनेची सुरक्षा अनामत व बँक गॅरंटी ठेकेदाराला परत करण्याच्या विषयाला नगरसेविका विद्या जमडाळे यांच्यासह नगरसेवकांनी  विरोध केला. घनकचरा ठेक्यास तात्पुरती मुदत वाढ  देण्याच्या विषयावर मकरंद पाटील यांनी आक्षेप घेत तीन वर्षापासून मुदतवाढ दिली जात असून, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना का केली जात नाही या दिरंगाईस जबाबदार असणा:यांवर कारवाई करण्यात यावी तसेच दोंडाईचा रस्त्यालगत बनविलेल्या फूटपाथवर अतिक्रमणे झाली असून, फुटपाथपुढेच हातगाडय़ा लागतात मग रस्ता आहे तरी कुठे, या जागेवर लहान दुकाने बनविली असती तर पालिकेलाही उत्पन्न मिळू शकले असते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात अतिक्रमण वाढले असून, रस्ते गायब तर अतिक्रमणाचा सुळसुळाट अशी स्थिती शहराची असल्याचे सांगत पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले.प्रशांत निकुंभ यांनी प्रभाग 12 मधील समस्यांचा पाढा वाचताना समस्या दूर होत नसतील तर मी राजीनामा देऊ का असा उद्विगA प्रश्न केला. तसेच वाहिद पिंजारी,  लक्ष्मण बढे यांच्यासह नगरसेवकांनी शहरात पथदिवे बंद राहतात, स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे, डेंग्यूची साथ सुरू असून, मोकाट कुत्रे व वराहांचा उपद्रव शहरात वाढला आहे.  रस्त्यावर साफसफाई होत नसल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे. शहरात 271 दिव्यांगांची नोंदणी झाली असून, त्यांना शासन नियमानुसार डीबीटीद्वारे अनुदान दिल्याची  माहितीही देण्यात आली. रियाज कुरेशी, इकबाल शेख, संदीप पाटील यांनीही अनेक प्रश्नांना हात घालीत आरोग्यविभागाला धारेवर धरले.