लोकमत न्यूज नेटवर्कबलवंड : शासनाने कापूस खरेदी केंद्र बंद केल्यामुळे पांढऱ्या सोन्याची अवकळा अजूनही थांबता थांबत नाही. या हतबल शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून बलवंड येथे खरेदी न केलेल्या कापसाचा कृषी विभागामार्फत पंचनामा करण्यात आला.बलवंडसह परिसरातील बहुसंख्य शेतकºयांचा कापूस विक्रीसाठी पडून होता. कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातल्यामुळे राज्यातील खरेदी केंद्रेही बंद करण्यात आली. म्हणून कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला होता. परंतु शासनाने कापूस खरेदी बाकी असलेल्या शेतकºयांची नोंदणी करून खरेदी पुन्हा सुरू केली. पूर्ण खरेदीविनाच पुन्हा केंद्र ३ जूनपासून बंद केली. त्यामुळे बहुसंख्य नोंदणी केलेल्या शेतकºयांचा कापूस घरातच पडून राहिला. २० मे पासून नवीन हंगामाचा कापूस लागवडीत शेतकरी व्यस्त असतानाच घरातील कापसाची अवहेलना बघवेना. अखेर सोमवारी कृषी अधिकारी व्ही.व्ही. गोसावी यांनी कापूस उत्पादक शेतकºयांच्या भेटी घेऊन कापसाचा पंचनामा केला. आता पावसाळ्याचे दिवस आहेत. शासानाने लवकरच आमचा कापूस खरेदी करावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली.शासनाने केवळ पंचनामा करून वेळ न घालवता लवकरच राहिलेल्या शेतकºयांचा कापूस खरेदी करावा व एकरी २० हजार मदत कापूस उत्पादक शेतकºयांना द्यावी.-बन्सीलाल पाटील,शेतकरी, बलवंड, ता.नंदुरबार.
खरेदी न केलेल्या कापसाचा पंचनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:56 IST