शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्याची उत्पादकता ३० टक्क्यांनी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 11:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पावसाची नोंद झाली आहे. परंतु आॅगस्टच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात संततधार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पावसाची नोंद झाली आहे. परंतु आॅगस्टच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात संततधार पावसामुळे कडधान्य पिकाला मोठा फटका बसला आहे. उडीद, मूग, चवळी यासह सोयाबीन व काही प्रमाणात कापसाचा समावेश आहे. अती पावसामुळे ही पिके सडली, काही ठिकाणी पिवळी पडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी यंदा पर्जन्यमान चांगले, पीक स्थिती चांगली असतांनाही या पिकांची उत्पादकता २५ ते ३० टक्के कमी होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.जिल्ह्यात यंदा वेळेवर पाऊस झाला. मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने अनेक शेतकºयांनी कापूस लागवड केली होती. बागायतदार शेतकºयांनी देखील कडधान्य व तृणधान्याची पेरणी केली होती. परंतु मध्यंतरी पावसाने ताण दिल्याने आणि सरासरी इतका देखील पाऊस न झाल्याने पिकांची अवस्था वाईट झाली होती. शेतकºयांनी जेमतेम अर्थात पुर्ण जुलै महिना पीक वाचविण्याची धडपड केली. आॅगस्ट महिन्यात मात्र समाधानकारक पाऊस झाला. तिसºया व चौथ्या आठवड्यातील पावसाने मात्र पिकांवर परिणाम केल्याचे चित्र आहे.तूट काढली भरूनआॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाची तूट ही ३५ टक्केपर्यंत वाढली होती. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा देखील सरासरीचा ४० टक्के देखील झालेला नव्हता. विहिरी व कुपनलिकांच्या पाणी पातळीवर परिणाम झाला होता.नदी, नाले कोरडेच होते. परंतु आॅगस्टच्या दुसºया आठवड्यापासून पावसाने बºयापैकी हजेरी लावली. तिसºया व चौथ्या आठवड्यात संततधार आणि मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाने दैना उडवून दिली. तूट देखील आॅगस्टच्या अखेर अवघी चार टक्क्यावर आली. जुलैच्या सुरुवातीपर्यंत तूट भरून निघाली आहे. आता सरासरीचा ९२ टक्केपर्यंत पावसाची नोंद झाली आहे.पिकांना मात्र फटकापावसाची तूट भरून निघाली असली तरी या संततधार पावसाने पिकांना मात्र फटका बसला. शेतातील पाण्याचा निचरा न होणे सतत ओलावा राहणे यामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. किडीचाही प्रादुर्भाव झाला. पिकं पिवळी पडली.मूग, उडीद, चवळी व सोयाबीनचे पीक तर अनेक ठिकाणी सडले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याचे चित्र नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग, शहादा, तळोदा तालुक्यात दिसून आले. जी पिकं थोडीफार वाचली आहेत त्यांची उत्पादकता २५ ते ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. यामुळे शेतकºयांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे.प्रशासनाकडून दखल नाहीपावसामुळे खबार झालेली पिकं, झालेले नुकसान याबाबत मात्र प्रशासनाकडून दखल घेतली गेली नसल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधींनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे शेतकºयांमध्ये नाराजीची भावना आहे.गेल्या वर्षी देखील सरासरीचा अधीक पाऊस झाला होता. पिकं परिपक्वहोण्याच्या कालावधीतच पावसाची संततधार कायम राहिल्याने नुकसान झाले होते.यंदा देखील पाऊस सरासरी ओलांडणार अशी शक्यता आहे. पावसाचे आणखी तीन आठवडे शिल्लक आहे. परतीचा पाऊस हा मुसळधार स्वरूपाचा असतो. त्यामुळे पावसाच्या आकडेवारीत भर पडणार आहे.त्याचा फायदा मात्र रब्बी पिकाला होणार आहे.