शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

शहाद्यात 50 स्टॉलद्वारे योजनांची जनजागृती : महाराजस्व अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 12:36 IST

ऑनलाईन लोकमतशहादा, दि़ 24 : जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी येथे महाराजस्व अभियानांतर्गत शासकीय सेवा व रोजगार महामेळावा घेण्यात आला. येथील बाजार समितीच्या आवारात झालेल्या या महामेळाव्यात विविध शासकीय विभागांतर्फे योजनांची माहिती देण्यासाठी सुमारे 50 स्टॉल लावण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा ...

ऑनलाईन लोकमतशहादा, दि़ 24 : जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी येथे महाराजस्व अभियानांतर्गत शासकीय सेवा व रोजगार महामेळावा घेण्यात आला. येथील बाजार समितीच्या आवारात झालेल्या या महामेळाव्यात विविध शासकीय विभागांतर्फे योजनांची माहिती देण्यासाठी सुमारे 50 स्टॉल लावण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, ए.ए. शेख, जिल्हा न्यायधीश पी.बी. गायवाड, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जिल्हा सरकारी वकील सुशील पंडित, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील, तहसीलदार मनोज खैरनार, गटविकास अधिकारी श्रीराम कागणे, नायब तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, वाय.डी. पटेल, वकील संघाचे अध्यक्ष एम.एन. पाटील आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महामेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.या वेळी जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी म्हणाले की, न्याय मिळविण्यासाठी न्यायालये आहेत. सद्यस्थितीत न्यायालयांमध्ये अनेक खटले प्रलंबित आहेत. या खटल्यांची संख्या वाढू नये म्हणून लहान तंटे गावपातळीवर मिटवले गेले पाहिजे. त्यासाठी शासनाने गाव पातळीवर तंटामुक्त समिती स्थापन केल्या आहेत. शासकीय योजनांची गाव पातळीर्पयत माहिती नसल्याने या योजना प्रभावीपणे राबविण्यास अडचण येते. मात्र शासकीय योजनांची माहिती जनतेर्पयत पोहोचविण्यासाठी वृत्तपत्रे मोठी भूमिका बजावत आहेत. शासनाच्या सर्वच योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सामाजिक संस्था व लोकांचा सहभाग असावा. जलयुक्त शिवार, पाणी अडवा-पाणी जिरवा योजनांसाठी ग्रामपंचायतींची मोठी जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.केंद्र व राज्य शासनाने आखून दिलेल्या विविध योजनांची माहिती पात्र लाभार्थीर्पयत पोहोचली पाहिजे हा मूळ उद्देश कार्यशाळेचा असल्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश वाघवसे यांनी सांगितले. प्रास्ताविक तहसीलदार मनोज खैरनार यांनी केले. सूत्रसंचालन आशा सोनवणे यांनी तर आभार अ‍ॅड.सुशील पंडित यांनी मानले.