शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

आदिवासींसाठी ३० हजार क्विंटल धान्य देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 12:20 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे राज्यातील बहुतांश आदिवासी कुटूंबांवर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी आदिवासी ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे राज्यातील बहुतांश आदिवासी कुटूंबांवर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी आदिवासी विकास विभागाने ३० हजार ३४५ क्विंटल धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.सध्या कोरोनामुळे रोजगारावरच उदरनिर्वाह असलेल्या आदिवासी कुटूंबांची अवस्था बिकट आहे. या संकट काळात सरकारच्या उपाययोजनां सदर्भात अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी सांगितले की, गेल्या तीन आठवड्यांपासून आपण सातत्याने या संदर्भात लक्ष केंद्रीत करून आहोत. विशेषत: नंदुरबार जिल्ह्यातील हजारो मजूर परराज्यात रोजगारासाठी गेल्याने त्यांची माहिती घेवून ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मदत कार्य पोहचविण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. सद्य स्थितीत गुजरातमध्ये सुमारे १२ ते १५ हजार मजूर अडकून असल्याने त्या मजुरांना महाराष्टÑात कसे आणले जाईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी नुकतीच चर्चा केली असून मुख्यमंत्री कार्यालयातर्फे या संदर्भात दिल्लीतही चर्चा झाली. मात्र, काही अडचणी असल्याने अद्याप तरी ते मजूर आणण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही. परंतु या सर्व मजुरांना शासनाचे सर्व नियम पाळत महाराष्टÑात आणावे आणि महाराष्टÑाच्या सिमेतच त्यांना कॉरंटाईन करून तेथेच सर्व सुविधा देण्याचा आपला प्रयत्न आहे.याशिवाय राज्यातील आदिम जमात तसेच स्थलांतरीत मजूर यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी धान्य देण्याची योजना आदिवासी विकास विभागाने मंजुर केली आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनीही मंजुरी दिल्याने लवकरच सुमारे ३० हजार ३४५ क्विंटल धान्य या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर राज्यातील सर्व आदिवासींना जे जे शक्य त्या सुविधा देण्यासाठी आदिवासी विकास विभागाचा प्रयत्न सुरू आहे. तसे निर्णयही घेण्यात आले आहेत.राज्यातील मनरेगात काम करणाऱ्या ११ लाख ५० हजार मजुरांसाठी आदिवासी विकास विभागाने नवीन योजना तयार केली आहे. त्यासाठी साधारणत: ६०० कोटी रुपये निधी लागणार आहे. त्यातील ५०० कोटी रुपये आदिवासी विकास विभाग देणार असून १०० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. किंवा हा निधी केंद्राकडून मिळावा यासाठीही मागणी करण्यात आली आहे. त्याचा निर्णय होताच साडे अकरा लाख मजुरांसाठी धान्य कोष योजनेच्या धर्तीवर नवी योजना लवकरच कार्यान्वीत करणार असल्याचे अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी सांगितले.