शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींसाठी ३० हजार क्विंटल धान्य देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 12:20 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे राज्यातील बहुतांश आदिवासी कुटूंबांवर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी आदिवासी ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे राज्यातील बहुतांश आदिवासी कुटूंबांवर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी आदिवासी विकास विभागाने ३० हजार ३४५ क्विंटल धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.सध्या कोरोनामुळे रोजगारावरच उदरनिर्वाह असलेल्या आदिवासी कुटूंबांची अवस्था बिकट आहे. या संकट काळात सरकारच्या उपाययोजनां सदर्भात अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी सांगितले की, गेल्या तीन आठवड्यांपासून आपण सातत्याने या संदर्भात लक्ष केंद्रीत करून आहोत. विशेषत: नंदुरबार जिल्ह्यातील हजारो मजूर परराज्यात रोजगारासाठी गेल्याने त्यांची माहिती घेवून ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मदत कार्य पोहचविण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. सद्य स्थितीत गुजरातमध्ये सुमारे १२ ते १५ हजार मजूर अडकून असल्याने त्या मजुरांना महाराष्टÑात कसे आणले जाईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी नुकतीच चर्चा केली असून मुख्यमंत्री कार्यालयातर्फे या संदर्भात दिल्लीतही चर्चा झाली. मात्र, काही अडचणी असल्याने अद्याप तरी ते मजूर आणण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही. परंतु या सर्व मजुरांना शासनाचे सर्व नियम पाळत महाराष्टÑात आणावे आणि महाराष्टÑाच्या सिमेतच त्यांना कॉरंटाईन करून तेथेच सर्व सुविधा देण्याचा आपला प्रयत्न आहे.याशिवाय राज्यातील आदिम जमात तसेच स्थलांतरीत मजूर यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी धान्य देण्याची योजना आदिवासी विकास विभागाने मंजुर केली आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनीही मंजुरी दिल्याने लवकरच सुमारे ३० हजार ३४५ क्विंटल धान्य या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर राज्यातील सर्व आदिवासींना जे जे शक्य त्या सुविधा देण्यासाठी आदिवासी विकास विभागाचा प्रयत्न सुरू आहे. तसे निर्णयही घेण्यात आले आहेत.राज्यातील मनरेगात काम करणाऱ्या ११ लाख ५० हजार मजुरांसाठी आदिवासी विकास विभागाने नवीन योजना तयार केली आहे. त्यासाठी साधारणत: ६०० कोटी रुपये निधी लागणार आहे. त्यातील ५०० कोटी रुपये आदिवासी विकास विभाग देणार असून १०० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. किंवा हा निधी केंद्राकडून मिळावा यासाठीही मागणी करण्यात आली आहे. त्याचा निर्णय होताच साडे अकरा लाख मजुरांसाठी धान्य कोष योजनेच्या धर्तीवर नवी योजना लवकरच कार्यान्वीत करणार असल्याचे अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी सांगितले.