शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

नंदुरबारात 29 जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव वर्षभरापासून पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 12:10 IST

हद्दपारीचे प्रकरण : एमपीडीएचाही एक प्रस्ताव, पोलीस प्रशासन हतबल

नंदुरबार : जिल्हा जातीयदृष्टया संवेदनशील असल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करण्यासाठी, त्यांच्यावर वचक बसविण्यासाठी पोलीस विभागातर्फे एमपीडीएच्या एका प्रस्तावासह एकुण 29 हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिका:यांकडे देण्यात आलेले आहेत. या प्रस्तावांना सव्वा वर्ष लोटले गेले तरी त्यावर अद्याप कुठलीही कार्यवाही न झाल्याने पोलीस विभागही हतबल झाला आहे. हे प्रस्तावांवर नोटीसा दिल्या गेल्या असत्या तर किमान गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात प्रशासनाला थोडेफार यश आले असते.जिल्हा कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासन दरबारी जातीयदृष्टया संवेदनशील म्हणून नोंद आहे. याशिवाय गुजरात व मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या सिमा जिल्ह्याला लागून आहेत. परिणामी कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. ही बाब लक्षात घेता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी कसरत करावी लागते. ही बाब लक्षात पोलिसांनी तब्बल 29 जणांवर हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. ते प्रस्ताव गेल्या वर्षी जून महिन्यात महिन्यात प्रांताधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले होते. त्यावर निर्णय होणे अपेक्षीत असतांना सव्वा वर्ष उलटले तरी अद्याप त्यावर काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तत्कालीन प्रांताधिकारी यांची बदली झाल्यानंतर आता दुसरे प्रांताधिकारी तिन्ही ठिकाणी आले आहेत. त्यांनीही याला महत्त दिलेले नाही. याशिवाय एमपीडीएचे दोन प्रस्ताव देखील जिल्हा पोलिसांनी पाठविले आहेत. पैकी एका प्रस्तावावर कारवाई करण्यात आली तर दुसरा प्रस्ताव पडून आहे. यापैकी निम्मे प्रस्तावांवर देखील कारवाई झाली असती तर गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले असते.दुसरीकडे जिल्हा पोलीस प्रमुखांनी गेल्या आठवडय़ात दहा जणांवर तडीपारची कारवाई करीत त्यांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. आता प्रांताधिकारी यांनी देखील त्यांच्याकडे असलेल्या प्रस्तावांवर नजर फिरवून जे प्रस्ताव तातडीने पारीत करणे आवश्यक आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून व्यक्त होत आहे.प्रतिबंधात्मक कारवाईगणेशोत्सवाच्या पाश्र्वभुमीवर जिल्ह्यात गेल्या वर्षी  सीआरपीसी 110 (ई)(ग) प्रमाणे 71, सीआरपीसी 107 प्रमाणे 99 तसेच सीआरपीसी 144 (2) प्रमाणे आठ, सीआरपीसी 151 (1) व मुंबई पोलीस कायदा कलम 68, 69 अन्वये 69 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 204 जणांना सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.यंदा सीआरपीसी कलम 110 अन्वये 55, कलम 109 प्रमाणे सात, 149 प्रमाणे 634 अशा एकुण 1319 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय दारुबंदी कायदा कलमान्वये 40 जणांवर कारवाई करण्यात आली. 144 प्रमाणे 77 जणांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. 23 सराईत गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई सुरू करण्यात आली आहे.दरम्यान, पोलीस अधीक्षकांना असलेल्या अधिकारात मंगळवारी 27 जणांना तातडीने शहराच्या हद्दीत येण्यास 23 सप्टेंबर्पयत प्रतिबंध करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पाश्र्वभुमीवर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 27 जणांना नंदुरबार शहर हद्दीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसे तातडीने आदेश जिल्हा पोलीस दलाने बजावले आहेत. 23 सप्टेंबर्पयत हे आदेश कायम राहणार आहेत. गणेशोत्सव व मोहर्रमसणाच्या पाश्र्वभुमीवर सर्व संबधितांना नोटीस देवून त्यांचे म्हणने ऐकुण घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्यामुळे एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.27 जणांमध्ये केतन दिलीपसिंग रघुवंशी, एजाज इस्माईल बागवान, कुणाल जगन्नाथ मराठे, कृष्णा लक्ष्मण पाडवी, निहाल अहमद शेख फिरोज, पिटर उर्फ प्रविण शामराव पाटील, अल्ताफ इसाक पिंजारी, मजिदखान सलिमखान पठाण, नूर महेमूद कुरेशी, ईस्माईलशहा शकुरशहा फकिर, नरेंद्र परशुराम पाटील, बोका उर्फ मोहमंद रईस शेख रज्जाक, मनिष सुरेश चौधरी, अझहरूल इस्लाम मजहरुल इस्लाम सैय्यद, संभाजी आप्पा माळी, सिराजोद्दीन एनोद्दीन शेख, गणेश तुकाराम सोनवणे, कृष्णा आप्पा पेंढारकर, भैय्या उर्फ सूर्यकांत सुधाकर मराठे, सचिन भिका मराठे, धर्मेद्र उर्फ धरमदास केशव जव्हेरी, मयुर वामन चौधरी, नयन दिलीप चौधरी, कैलास आप्पा पेंढारकर, फिरोज शेख अल्लाऊद्दीन मन्यार, बाबुशेख महेबूब कुरेशी यांचा समावेश आहे.