शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

सौर उर्जेचा प्रस्ताव धूळखात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन हजार अंगणवाड्यांना वीज पुरवठा नसल्याने त्या ठिकाणी सौर उर्जेचा पर्याय देण्यात आला होता. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोन हजार अंगणवाड्यांना वीज पुरवठा नसल्याने त्या ठिकाणी सौर उर्जेचा पर्याय देण्यात आला होता. परंतु दोन वर्षांपासून हा प्रस्ताव रखडला असून विजेअभावी अंगणवाड्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, अशीच स्थिती जिल्हा परिषदेच्या जवळपास साडेतीनशे शाळांची देखील आहे.  चार वर्षांपूर्वी तत्कालीन उर्जामंत्री  यांनी नंदुरबारात आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी बैठकीत अंगणवाडींना वीज पुरवठा करण्याचा प्रश्न प्राधान्यक्रमाने पुढे आला होता. परंतु अनेक अंगणवाड्या या दुर्गम भागात,  डोंगराळ भागात चालतात. अशा ठिकाणी वीज पुरवठा शक्य नसल्यास सौर उर्जेद्वारा अशा अंगणवाडींना वीज पुरवठा करावा असे ठरले होते. त्यानुसार तत्कालीन उर्जामंत्र्यांनी तसे आदेशही दिले होते. परंतु मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेकडूनच तसा प्रस्ताव गेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जवळपास दोन हजार अंगणवाड्या अंधाराचा सामना करीत आहेत. जिल्ह्यात दोन हजार ४३४ अंगणवाडी आहेत. त्यापैकी काही अंगणवाडींना वीज पुरवठा केला जातो. काहींनी तो घेतला देखील आहे. चार वर्षापूर्वी  १७ अंगणवाड्यांनी वीज पुरवठ्यासाठी कोटेशन भरलेले होते.  सद्य स्थितीत जवळपास दोन हजार अंगणवाडींना वीज पुरवठा करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली आहेत. या अंगणवाडींना सौर उर्जेवर आधारीत वीज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी डीपीआर तयार करण्यात आला होता. परंतु नंतर त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. विविध कामे रखडतातअंगणवाड्यांना सध्या अमृत आहार योजना, कुपोषीत बालकांची काळजी, त्यांची नोंदणी, वेळोवेळी वजन घेणे, पोषण आहार योजना यासह इतर विविध योजनांसाठी काम करावे लागते. ही बाब लक्षात घेता अंगणवाडींचा सर्व रेकॉर्ड ठेवण्यासाठी त्यांना संगणक पुरवठा करणे आणि त्या अनुषंगाने वीज जोडणी देणे आवश्यक आहे. परंतु अंगणवाडींकडे एवढा व्याप असतांनाही संगणकही दिले गेले नाहीत किंवा वीज जोडणी देखील अद्यापपर्यंत दिली गेली नाही. आता सौर उर्जेद्वारे वीज पुरवठा झाल्यानंतर किमान संगणक तरी भेटतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अंगणवाडी संघटनेने गेल्या अनेक वर्षांपासून वीज जोडणीची मागणी केलेली आहे.शाळांचीही तीच गतनंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यात एकुण एक हजार ३९३ शाळा चालविल्या जातात. यापैकी एक हजार ५३ शाळांना वीज पुरवठा जोडणी देण्यात आलेली आहे. परंतु त्यातही अनेक शाळांची वीज थकबाकी किंवा इतर कारणांनी वीज पुरवठा खंडित झालेला आहे. पुन्हा नव्याने त्यांना वीज जोडणी मिळू शकलेली नाही. अशा शाळांची संख्या देखील १०० पेक्षा अधीक आहे. त्यामुळे वीज नसलेल्या अशा एकुण जवळपास साडेचारशे शाळा असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक शाळेला वीज जोडणी आवश्यक आहे. त्याआधारे संगणकावरील कामकाज, विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण देणे, विविध प्रयोगांसाठी देखील वीज आवश्यक असते.

वीज न पोहचलेल्या गाव व पाड्यांची अडचण...वीज जोडणी नसलेल्या सर्वाधिक शाळा या दुर्गम भागातील आहेत.  अशा शाळांच्या गावाच्या ठिकाणीच वीज पोहचलेली नाही तेथे शाळेला  कुठून वीज मिळेल असा प्रश्न आहे. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील सर्वाधिक शाळा आहेत. या दोन्ही तालुक्यातील ३०० तर इतर तालुक्यातील    ४० शाळांचा समावेश आहे. सध्या शासनाचा सौर उर्जेवर सर्वाधिक भर     आहे. अनेक गाव व पाड्यांवर सौर दिवे, पथदिवे, सौर पंप पुरविण्यात आले आहेत. त्यामुळे अंगणवाड्यांनाही सौर उर्जाद्वारे वीज पुरवठा झाल्यास   कर्मचार्यांना संगणकावर अनेक कामे करता येणार आहे. सध्या अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनिस यांच्यावर नियमित कामांपेक्षा इतर कामांचाही       बोजा वाढला आहे. शिवाय दैनंदिन रिपोर्ट मोबाईल किंवा टॅबद्वारे वरिष्ठांना पाठविण्याची सक्ती आहे. त्यामुळे अडचणी येतात.