शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

सौर उर्जेचा प्रस्ताव धूळखात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन हजार अंगणवाड्यांना वीज पुरवठा नसल्याने त्या ठिकाणी सौर उर्जेचा पर्याय देण्यात आला होता. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोन हजार अंगणवाड्यांना वीज पुरवठा नसल्याने त्या ठिकाणी सौर उर्जेचा पर्याय देण्यात आला होता. परंतु दोन वर्षांपासून हा प्रस्ताव रखडला असून विजेअभावी अंगणवाड्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, अशीच स्थिती जिल्हा परिषदेच्या जवळपास साडेतीनशे शाळांची देखील आहे.  चार वर्षांपूर्वी तत्कालीन उर्जामंत्री  यांनी नंदुरबारात आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी बैठकीत अंगणवाडींना वीज पुरवठा करण्याचा प्रश्न प्राधान्यक्रमाने पुढे आला होता. परंतु अनेक अंगणवाड्या या दुर्गम भागात,  डोंगराळ भागात चालतात. अशा ठिकाणी वीज पुरवठा शक्य नसल्यास सौर उर्जेद्वारा अशा अंगणवाडींना वीज पुरवठा करावा असे ठरले होते. त्यानुसार तत्कालीन उर्जामंत्र्यांनी तसे आदेशही दिले होते. परंतु मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेकडूनच तसा प्रस्ताव गेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जवळपास दोन हजार अंगणवाड्या अंधाराचा सामना करीत आहेत. जिल्ह्यात दोन हजार ४३४ अंगणवाडी आहेत. त्यापैकी काही अंगणवाडींना वीज पुरवठा केला जातो. काहींनी तो घेतला देखील आहे. चार वर्षापूर्वी  १७ अंगणवाड्यांनी वीज पुरवठ्यासाठी कोटेशन भरलेले होते.  सद्य स्थितीत जवळपास दोन हजार अंगणवाडींना वीज पुरवठा करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली आहेत. या अंगणवाडींना सौर उर्जेवर आधारीत वीज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी डीपीआर तयार करण्यात आला होता. परंतु नंतर त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. विविध कामे रखडतातअंगणवाड्यांना सध्या अमृत आहार योजना, कुपोषीत बालकांची काळजी, त्यांची नोंदणी, वेळोवेळी वजन घेणे, पोषण आहार योजना यासह इतर विविध योजनांसाठी काम करावे लागते. ही बाब लक्षात घेता अंगणवाडींचा सर्व रेकॉर्ड ठेवण्यासाठी त्यांना संगणक पुरवठा करणे आणि त्या अनुषंगाने वीज जोडणी देणे आवश्यक आहे. परंतु अंगणवाडींकडे एवढा व्याप असतांनाही संगणकही दिले गेले नाहीत किंवा वीज जोडणी देखील अद्यापपर्यंत दिली गेली नाही. आता सौर उर्जेद्वारे वीज पुरवठा झाल्यानंतर किमान संगणक तरी भेटतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अंगणवाडी संघटनेने गेल्या अनेक वर्षांपासून वीज जोडणीची मागणी केलेली आहे.शाळांचीही तीच गतनंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यात एकुण एक हजार ३९३ शाळा चालविल्या जातात. यापैकी एक हजार ५३ शाळांना वीज पुरवठा जोडणी देण्यात आलेली आहे. परंतु त्यातही अनेक शाळांची वीज थकबाकी किंवा इतर कारणांनी वीज पुरवठा खंडित झालेला आहे. पुन्हा नव्याने त्यांना वीज जोडणी मिळू शकलेली नाही. अशा शाळांची संख्या देखील १०० पेक्षा अधीक आहे. त्यामुळे वीज नसलेल्या अशा एकुण जवळपास साडेचारशे शाळा असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक शाळेला वीज जोडणी आवश्यक आहे. त्याआधारे संगणकावरील कामकाज, विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण देणे, विविध प्रयोगांसाठी देखील वीज आवश्यक असते.

वीज न पोहचलेल्या गाव व पाड्यांची अडचण...वीज जोडणी नसलेल्या सर्वाधिक शाळा या दुर्गम भागातील आहेत.  अशा शाळांच्या गावाच्या ठिकाणीच वीज पोहचलेली नाही तेथे शाळेला  कुठून वीज मिळेल असा प्रश्न आहे. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील सर्वाधिक शाळा आहेत. या दोन्ही तालुक्यातील ३०० तर इतर तालुक्यातील    ४० शाळांचा समावेश आहे. सध्या शासनाचा सौर उर्जेवर सर्वाधिक भर     आहे. अनेक गाव व पाड्यांवर सौर दिवे, पथदिवे, सौर पंप पुरविण्यात आले आहेत. त्यामुळे अंगणवाड्यांनाही सौर उर्जाद्वारे वीज पुरवठा झाल्यास   कर्मचार्यांना संगणकावर अनेक कामे करता येणार आहे. सध्या अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनिस यांच्यावर नियमित कामांपेक्षा इतर कामांचाही       बोजा वाढला आहे. शिवाय दैनंदिन रिपोर्ट मोबाईल किंवा टॅबद्वारे वरिष्ठांना पाठविण्याची सक्ती आहे. त्यामुळे अडचणी येतात.