शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

जलयुक्तचा निधी वाढविण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 18:31 IST

नंदुरबार :  जलयुक्तसाठी यंदा 180 गावांची निवड करण्यात आली आहे. परंतु या गावांमध्ये कामासाठी अपु:या निधीची तरतूद करण्यात आल्याची ...

नंदुरबार :  जलयुक्तसाठी यंदा 180 गावांची निवड करण्यात आली आहे. परंतु या गावांमध्ये कामासाठी अपु:या निधीची तरतूद करण्यात आल्याची बाब स्थायी समिती सभेत स्पष्ट करण्यात आली. त्यामुळे वाढीव निधीची मागणी करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत करण्यात आला. दरम्यान, बैठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी घेण्यात आली. उपाध्यक्ष सुहास नाईक, सभापती दत्तू चौरे, हिराबाई पाडवी, लताबाई पाडवी, सदस्य रतन पाडवी, सागर धामणे, मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे व खातेप्रमुख उपस्थित होते. बैठकीत सुरुवातीला भुषा येथील घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीत जलयुक्त कामांचा विषय निघाला. जास्तीत जास्त गावांचा समावेश करावा यासाठी प्रय} व्हावा अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी येत्या वर्षासाठी जलयुक्तकरीता 180 गावांची निवड करण्यात आली असल्याचे सांगितले. या गावांमध्ये कामे करण्यासाठी मंजुर करण्यात आलेला निधी कमी आहे. त्यामुळे निधी वाढून मिळावा यासाठी प्रय} करण्यात येणार असल्याची माहिती सोमवंशी यांनी दिली. यंदा दुष्काळी स्थिती आहे. नदी, नाले, बंधारे कोरडे झाले आहेत. अशा ठिकाणी जलयुक्तची कामे करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे यंदा जास्तीत जास्त कामे घेण्यासाठी प्रयत्न राहावा अशी अपेक्षा देखील यावेळी सदस्यांनी व्यक्त केली.डामळदा, ता.शहादा येथील पाणी टंचाईचा विषयय उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी उपस्थित केला. या गावाला नेहमीच पाणी टंचाई असते. त्यावर कायम स्वरूपी काय उपाययोजना करता येईल याची चाचपणी करावी. टीएसपीमध्ये प्रस्ताव पाठवावा अशा सुचना नाईक यांनी दिल्या. जिल्ह्यातील पाणी टंचाईवर देखील यावेळी चर्चा करण्यात आली. तापीतून पाईपलाईनद्वारे उमर्देर्पयत पाणी आणले जाणार आहे. तेथून पुढे चौपाळेर्पयत ने न्यावे. आधीच उमर्दे ते चौपाळे पाईपलाईन तयार असल्याचे सदस्य सागर धामणे यांनी सांगितले. त्यावर पाणी पुरवठा विभागाचे अभियंता बडगुजर यांनी याची व्यवहार्यता आणि  तांत्रिकबाजू तपासून घेवूनच निर्णय घेता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. धडगाव तालुक्यातील बांधकाम विभागाचे प्रोजेक्ट ऑफीसर नेहमीच गैरहजर राहत असल्याची तक्रार रतन पाडवी यांनी केली. तातडीने आदेश देत त्यांना नियमित हजर राहण्याची तंबी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.बैठकीत आयत्या वेळेच्या विषयांनाही मंजुरी देण्यात आली. त्यात जलयुक्त अभियानाअंतर्गत टप्पा क्रमांक चार अंतर्गत सुसरी नदीवरील होळ व उंटावद, ता.शहादा येथील साघवण बंधा:यांच्या कामासाठी अनुक्रमे 33 लाख 31 हजार व 38 लाख 23 हजार रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली.