शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

टंचाईच्या पाश्र्वभुमीवर नंदुरबारात 57 कुपनलिकांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  आगामी काळात पाणी टंचाईची शक्यता गृहीत धरता शहरातील प्रत्येक प्रभागात किमान तीन कुपनलिका करण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  आगामी काळात पाणी टंचाईची शक्यता गृहीत धरता शहरातील प्रत्येक प्रभागात किमान तीन कुपनलिका करण्याचा प्रस्ताव पालिकेने जिल्हा प्रशासनाकडे दिला आहे. याशिवाय शहरालगतच्या परंतु ग्रामिण भागात येणा:या वसाहतींमध्ये पाणी पुरवठा व्हाव यासाठी शहरी भागात कुपनलिका करून ते पाणी संबधीत वसाहतींना पुरविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पातात यंदा अपु:या पजर्न्यमानामुळे अपेक्षीत पाणीसाठा होऊ शकला नाही. त्यामुळे पाणी पुरवठय़ावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी काळातील संकट लक्षात घेता पालिकेने आतापासूनच पाणी पुरवठय़ाचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने प्रत्येक प्रभागात कुपनलिका करून मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. सध्या पूर्वीप्रमाणेच पाणीपुरवठासद्य स्थितीत शहरात पूर्वीप्रमाणेच एक दिवसाआड व किमान 45 ते 55 मिनिटे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात कुठलीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे सद्यातरी शहरवासीयांना पाणी टंचाईचे संकट फारसे नाही. परंतु येत्या काळात ते जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीपुरवठय़ाचा वेळेत कपात होणे शक्य आहे. अद्याप पालिकेने त्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही.विरचकमध्ये 40 टक्के साठाविरचक प्रकल्पात सद्यस्थिती 40 टक्के पाणीसाठा आहे. हाच पाणीसाठा काटकसरीने आणि योग्यरित्या वापरल्यास सात ते आठ महिने हे पाणी पुरेल इतके आहे. याशिवाय पालिकेने आंबेबारा धरणातील पाणीसाठा देखील आरक्षीत केला आहे. आंबेबारा धरणातील पाणी चारीद्वारे आष्टे येथील पंपींग स्टेशनमध्ये आणून तेथून शहराच्या  25 ते 30 टक्के भागाला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी टंचाई फारशी जाणवणार नाही अशी एकुणच शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी येणा:या कुठल्याही परिस्थितीला आणि संकटाला सामोरे जाण्यासाठी पालिकेने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.कुपनलिकांचा प्रस्तावशहरातील प्रत्येक प्रभागात किमान तीन कुपनलिका करून देण्याची मागणी पालिकेने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जेणेकरून विरचकमधील पाणी पुरवठय़ावर मर्यादा आलीच तर या कुपनलिकांच्या माध्यमातून संबधीत प्रभागांमध्ये पाणीपुरवठा करता येईल. शहरात 19 प्रभाग असून प्रत्येकी तीन कुपनलिका केल्यास त्यांची संख्या तब्बल 57 र्पयत जाणार आहे. शहरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कुपनलिका करून देण्यास प्रशासन तयार होईल किंवा कसे याबाबत मात्र संभ्रमच राहणार आहे. शहराबाहेरील वसाहती तहानलेल्याशहराबाहेरील परंतु लगतच्या गावांच्या हद्दीतील वसाहतींमध्ये सद्य स्थितीत मोठय़ा प्रमाणावर पाणी टंचाई आहे. संबधीत गावांची पाणी पुरवठा योजना मर्यादीत आहे. त्यामुळे नवीन वसाहतींमध्ये पाणी पुरवठा करण्याची क्षमता अशा ग्रामपंचायतींची नाही. परिणामी नागरिकांना खाजगी कुपनलिका कराव्या लागत आहेत. परंतु त्यांनाही अपेक्षीत पाणी लागत नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत जमिनीची पाणी पातळी खोल गेली आहे. तर शहर हद्दीत पाणी पातळी ब:यापैकी आहे. त्यामुळे शहरी हद्दीत कुपनलिका करून अशा वसाहतींना पाणी पुरवठा करावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे.