शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना तातडीने जमिनी द्याव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 18:32 IST

तळोदा : अक्कलकुवा तालुक्यातील देहली सिंचन प्रकल्पात शेत जमिन बुडालेल्या 129 शेतकरी आणि 64 भूमिहिनांना जमिन देण्याबाबत तातडीने प्रस्ताव ...

तळोदा : अक्कलकुवा तालुक्यातील देहली सिंचन प्रकल्पात शेत जमिन बुडालेल्या 129 शेतकरी आणि 64 भूमिहिनांना जमिन देण्याबाबत तातडीने प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत घेण्यात आला़ या धरणातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर शासनाने ठोस कार्यवाही केली नाही़ तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रकल्पग्रस्तांनी दिली आह़े अक्कलकुवा तालुक्यातील आंबाबारी जवळील देहली सिंचन प्रकल्पास शासनाने सन 1976 साली मंजुरी दिली आह़े प्रत्यक्षात 1984 साली प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आह़े तब्बल 32 वर्षे पूर्ण होऊनदेखील आजपावेतो हा प्रकल्प शासनाकडून मार्गी लागला नाही़ तेव्हाचा अडीच कोटींचा हा प्रकल्प शंभर कोटींच्या वर गेला आह़े या धरणामुळे विस्थापित झालेल्या आंबाबारीवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आह़े अक्कलकुवा तालुक्यातील साधारणत: साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र या प्रकल्पात ओलीताखाली येणार आह़े तथापि धरणाचा बुडीत क्षेत्रातील 129 शेतक:यांना व 64 भुमिहिनांना अजूनही शासनाकडून जमिनी देण्यात आलेल्या नाहीत़ त्याच बरोबर अनेक प्रश्न आजही कायम आहेत़ या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी गुरुवारी येथील उपविभागीय कार्यालयात लोक संघर्ष मोर्चाच्या पदाधिका:यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती़ या वेळी उपविीागीय अधिकारी विनय गौडा, जिल्हा पुर्नवसन अधिकारी प्रसाद मते, तापी विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता सुनील जोशी, लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतीभा शिंदे, अक्कलकुवाचे तहसीलदार नितीन देवरे, सुकलाल तडवी, रामदास तडवी, संजय महाजन आदी उपस्थित होत़े या वेळी प्रकलपग्रस्तांच्या प्रस्तावाबाबत सविस्तर आढावा घेऊन त्यावर सखोल चर्चा करण्यात आली़ या प्रकल्पग्रस्तांच्या गावात पुनर्वसनाचे काम चालू असताना शासकीय कर्मचारी प्रत्यक्ष गावक:यांना भेटत नाहीत़ त्यामुळे आमच्या समस्या सुटत नाहीत़ कर्मचारी परस्पर निघून जातात़ त्याच बरोबर तहसीलदारांनादेखील याबाबत निवेदन देण्यात आले आह़े त्यावर अजूनही कार्यवाही करण्यात आलेली नाही़ अशा अनेक समस्यांचे पाढे बैठकीत वाचण्यात आल़े या प्रकल्पात 129 शेतकरी 64 भुमिहिनांना तत्काळ जमिन उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णयदेखील या वेळी घेण्यात आला़ त्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा करावा असेही ठरल़े शिवाय सर्व प्रकल्पबाधितांना पुनर्वसन स्थळी दहा हजार निर्वाह भत्ता मिळण्याचा प्रस्तावही मान्य करण्यात आला़ या बैठकीत काथ्याभाऊ  वसावे, कांतीलाल तडवी, हरचंद तडवी, विलास वसावे आदी उपस्थित होत़े