शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

दिव्यांगांच्या विकास निधीबाबत कार्यवाही ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : जिल्ह्यातील ग्रामपंचायती व नगरपालिकांना आपल्या उत्पन्नाच्या पाच टक्के निधी  गावातील दिव्यांगाच्या विकासावर खर्च करण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : जिल्ह्यातील ग्रामपंचायती व नगरपालिकांना आपल्या उत्पन्नाच्या पाच टक्के निधी  गावातील दिव्यांगाच्या विकासावर खर्च करण्याचा शासनाचा आदेश  असतांना याकडे कुठेही प्रशासन ठोस कार्यवाही न करता विकासापासून उपेक्षितच आहे. दरम्यान जिल्ह्यात साधारण 14 हजार दिव्यांग व्यक्ती आहेत.राज्य शासनाकडून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक योजना राबविल्या जात असतात. परंतु स्थानिक प्रशासनाकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात नसल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या एकूण  उत्पन्नांपैकी पाच टक्के निधी दिव्यांगाच्या विकासासाठी खर्च करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. या निधीतून त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी व्यवसायाची साधने उपलब्ध करून देण्याचे    आदेश आहेत. मात्र त्यावर कुठलेच प्रशासन कार्यवाही करीत नाही, अशी दिव्यांगांची व्यथा आहे.या उलट समाज कल्याण विभागाकडून गेल्या वर्षी रोजगाराकरीता दिव्यांग व्यक्तींना 100 टक्के सवलतीवर ङोरॉक्स मशीन देण्यात आले होते. त्यातही दुजाभावाचे धोरण अवलंबून मोजक्याच लोकांना देण्यात  आल्याचे दिव्यांगांनी सांगितले. वास्तविक नंदुरबार जिल्ह्यातून साधारण 14 हजार दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यातील 15 टक्के लोकांनादेखील शासनाच्या   विविध सवलतींबाबत दिव्यांगाची उपेक्षा होत असल्यामुये जिल्ह्यातील दिव्यांगाच्या संघटनेने मोर्चे व आंदोलने केली होती. त्या वेळी तत्कालीन जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन जिल्ह्यातल सर्व खाते प्रमुखांची बैठक घेतली होती.या वेळी दिव्यांगांच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी   करण्याची सक्त ताकीद संबंधीतांना दिली होती. मात्र त्याची कुठेही  प्रभावी अंमलबजावणी होत  नसल्याचे दिव्यांगांचा आरोप आहे. जिल्ह्यातील शहादा नगरपालिका वगळता नंदुरबार, तळोदा, नवापूर, धडगाव या नगरपालिकांनीदेखील दिव्यांगांच्या निधीची अंमलबजावणी केली नसल्याचे दिव्यांग सांगतात. शहादा नगरपालिकेने मात्र याबाबत एक मोहिम राबवून जनजागृती केली होती. त्यांनी अशा व्यक्तींना 10 हजारांचे व्यवसायासाठी अर्थसहाय्यक दिले होते.  याप्रकरणी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाने दखल  घेऊन नगरपालिका व ग्रामपंचायतींना तंबी द्यावी, अशी मागणी  जिल्ह्यातील दिव्यांगांनी केली आहे.