शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या विकास निधीबाबत कार्यवाही ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : जिल्ह्यातील ग्रामपंचायती व नगरपालिकांना आपल्या उत्पन्नाच्या पाच टक्के निधी  गावातील दिव्यांगाच्या विकासावर खर्च करण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : जिल्ह्यातील ग्रामपंचायती व नगरपालिकांना आपल्या उत्पन्नाच्या पाच टक्के निधी  गावातील दिव्यांगाच्या विकासावर खर्च करण्याचा शासनाचा आदेश  असतांना याकडे कुठेही प्रशासन ठोस कार्यवाही न करता विकासापासून उपेक्षितच आहे. दरम्यान जिल्ह्यात साधारण 14 हजार दिव्यांग व्यक्ती आहेत.राज्य शासनाकडून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक योजना राबविल्या जात असतात. परंतु स्थानिक प्रशासनाकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात नसल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या एकूण  उत्पन्नांपैकी पाच टक्के निधी दिव्यांगाच्या विकासासाठी खर्च करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. या निधीतून त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी व्यवसायाची साधने उपलब्ध करून देण्याचे    आदेश आहेत. मात्र त्यावर कुठलेच प्रशासन कार्यवाही करीत नाही, अशी दिव्यांगांची व्यथा आहे.या उलट समाज कल्याण विभागाकडून गेल्या वर्षी रोजगाराकरीता दिव्यांग व्यक्तींना 100 टक्के सवलतीवर ङोरॉक्स मशीन देण्यात आले होते. त्यातही दुजाभावाचे धोरण अवलंबून मोजक्याच लोकांना देण्यात  आल्याचे दिव्यांगांनी सांगितले. वास्तविक नंदुरबार जिल्ह्यातून साधारण 14 हजार दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यातील 15 टक्के लोकांनादेखील शासनाच्या   विविध सवलतींबाबत दिव्यांगाची उपेक्षा होत असल्यामुये जिल्ह्यातील दिव्यांगाच्या संघटनेने मोर्चे व आंदोलने केली होती. त्या वेळी तत्कालीन जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन जिल्ह्यातल सर्व खाते प्रमुखांची बैठक घेतली होती.या वेळी दिव्यांगांच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी   करण्याची सक्त ताकीद संबंधीतांना दिली होती. मात्र त्याची कुठेही  प्रभावी अंमलबजावणी होत  नसल्याचे दिव्यांगांचा आरोप आहे. जिल्ह्यातील शहादा नगरपालिका वगळता नंदुरबार, तळोदा, नवापूर, धडगाव या नगरपालिकांनीदेखील दिव्यांगांच्या निधीची अंमलबजावणी केली नसल्याचे दिव्यांग सांगतात. शहादा नगरपालिकेने मात्र याबाबत एक मोहिम राबवून जनजागृती केली होती. त्यांनी अशा व्यक्तींना 10 हजारांचे व्यवसायासाठी अर्थसहाय्यक दिले होते.  याप्रकरणी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाने दखल  घेऊन नगरपालिका व ग्रामपंचायतींना तंबी द्यावी, अशी मागणी  जिल्ह्यातील दिव्यांगांनी केली आहे.