शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

शहादा तालुक्यातील उजळोद येथे तीव्र पाणीटंचाईची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 12:12 IST

शहादा : तालुक्यातील ४१ गावे आणि १५ पाड्यांचा जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखड्यात समावेश केला आहे़ यातील बहुतांश गावांमध्ये ...

शहादा : तालुक्यातील ४१ गावे आणि १५ पाड्यांचा जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखड्यात समावेश केला आहे़ यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे़ यातील उजळोद येथे भीषण स्थिती असून गावाच्या मधोमध असलेल्या नाल्यात केलेल्या बोअरवेल निरुपयोगी ठरत असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरु आहे़शहादा शहरापासून साधारण १५ किलोमीटर पूर्वेला असलेल्या उजळोद गावाची लोकसंख्या ही एक हजार ३३३ एवढी आहे़ गावात एकूण २७३ घरे आहेत़ बहुतांश शेतकरी आणि मजूर कुटूंबांचा रहिवास असलेल्या या गावात गेल्या १५ वर्षात पाणीटंचाईने ग्रासले आहे़ गावासोबत शेतकऱ्यांनी खोदलेल्या बोअरवेल ह्या ७०० फूटापर्यंत आहेत़ ५०० फूटाच्या पुढेच पाणी लागत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़ गावाच्या मध्यभागातून नैसर्गिकरित्या उत्तरेकडून वाहत येणारा नाला आहे़ या नाल्यामुळे गावाचे दोन भाग पडले आहेत़ बारमाही नसला तरी पावसाळा आणि नंतरचे दोन महिने पाणी रहात असल्याने १५ वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने येथेच कूपनलिका केली होती़ तत्पूर्वी याच नाल्यात खोदलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा होत होता़ कूपनलिकेतून साधारण १० वर्षे पाणी मिळाल्यानंतर दूषित आणि क्षारयुक्त पाणी येण्यास सुरुवात झाल्याने ही योजना बंद करुन त्यालगतच दुसरी योजना सुरु करण्यात आली़ यातूनही दूषित पाणी आल्याने दोन्ही योजना बंद करण्यात आल्या आहे़ यातून सातत्याने पाणीटंचाई निर्माण होत असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरु होती़ एप्रिल २०१८ मध्ये ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या सहभागातून गावात तिसरी योजना खोदण्यात आली़ तब्बल ७०० फूट खोल अशा या योजनेतून आता पाणी पुरवठा होत असला तरी तो कधी बंद होईल याची शाश्वती नसल्याने ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ पर्यायी स्त्रोतांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत़