शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

विषबाधा टाळण्यासाठी प्रबोधनाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 12:35 IST

आढावा बैठक : बोगस पंप विक्रेत्यांवर कारवाई होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : किटकनाशके हाताळताना विषबाधा होऊन शेतक:यांचे मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत़ या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील खते आणि किटकनाशक विक्रेत्यांनी शेतक:यांचे प्रबोधन करण्याचे आदेश आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी दिल़े  जिल्हाधिकारी कार्यालयातील या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे , तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, किटकनाशक कंपनी आणि विक्रेते उपस्थित होत़े बैठकीत यवतमाळ व धुळे येथे शेतक:यांचा फवारणी करताना मृत्यू झाल्याच्या घटनांवर चर्चा करण्यात आली़ जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात बहुतांश शेतकरी हे गरीब व अशिक्षित आहेत़ त्यामुळे त्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठांची विक्री झाली पाहिज़े औषधांची तांत्रिक माहिती समजावून सांगावी, मान्यता नसलेले बनावट औषधांची विक्र करून नये, अन्यथा विक्री करणा:या कंपन्या, विक्रेते आणि प्रतिनिधी यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितल़े कृषी विकास अधिकारी लाटे यांनी अती व सौम्य विषारी  किटकनाशकांची लेबलनुसार विक्री करून माहिती फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेश दिल़े 4बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी चिनी बनावटीच्या पंपांची बाजारात होणारी विक्री थांबवून हे पंप विक्री करू नये असेही विक्रेत्यांना सुचवल़े विषबाधेच्या सर्व घटना चिनी बनावटीच्या पंपांमुळे घडल्याचे याबैठकीत सांगण्यात आल़े बैठकीत विविध 26 अशा उपायांवर चर्चा करण्यात आली़  शहादा तालुक्यातील कळंबू येथील शेतकरी अशोक गोरख पाटील यांचा आठ रोजी कापूस पिकावर फवारणी करताना विषबाधा झाल्याने मृत्यू झाला होता़ या घटनेवरही बैठकीत चर्चा करण्यात आली होती़