शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित मुलांचे टळले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऊसतोड कामासाठी समशेरपूर ता.नंदुरबार भागात आलेल्या कन्नड, चाळीसगाव व मालेगाव येथील कामगारांच्या ३५ पाल्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऊसतोड कामासाठी समशेरपूर ता.नंदुरबार भागात आलेल्या कन्नड, चाळीसगाव व मालेगाव येथील कामगारांच्या ३५ पाल्यांच्या शिक्षणाची सुविधा आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखानामार्फत करण्यात आली आहे. त्यामुळे या मुलांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे.समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एलएलपी कारखाना परिक्षेत्रातील ऊस कापणीसाठी चाळीसगाव, धुळे, कन्नड, साक्री व मालेगाव भागातून ऊसतोड कामगार दाखल झाले आहे. काही कौटुंबिक अडचणींमुळे या कामगारांनी शालेय शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या पाल्यांनाही सोबत आणले आहे. या मजुरांनी समशेरपूर साखर कारखान्याजवळ वसाहत निर्माण केली आहे. तेथे पौढ व्यक्तींसह काही सहा ते १४ वर्ष वयोगटातील मुलेही दिसून येत होते. त्यामुळे ही मुले शाळाबाह्य अथवा शालेय शिक्षण घेणारे असू शकतात, अशी शंका काही घटकांमधून उपस्थित करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम व गट शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने सर्व्हेक्षण केले. त्यात तेथे २८ मुले आढळून आले होते. ही मुले शालेय शिक्षण घेणारे असल्याचे देखील सिद्ध झाले.शिक्षण विभागामार्फत या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून त्यांना समशेरपूर येथील शाळांमध्ये शिक्षणासाठी दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली. परंतु तांड्यापासून समशेरपूरची लांब असल्यामुळे हे मुले शाळेत येणार नाही. ही बाब देखील शिक्षण विभागाने विचारात घेतली. उपाययोजना करुनही मुलांचे शैक्षणिक नुकसान अटळ असल्याचेही शिक्षण विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखाना व्यवस्थापनाकडे या मुलांसाठी साखर शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने पाठपुरावा सुरू करण्यात आला. त्याची दखल घेत कारखान्यामार्फत साखर शाळाही सुरु करण्यात आल्या आहेत.या शाळेत सर्व्हेक्षणात आढळून आलेल्या २८ विद्यार्थ्यांसह नंतर आलेल्या चार विद्यार्थ्यांची देखील शिक्षणासाठी सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे या शाखर शाळेत एकुण ३२ विद्यार्थी दाखल झाले आहे, त्यात १७ मुली व १५ मुलांचा समावेश आहे. कारखाना व्यवस्थापनामार्फत करण्यात आलेल्या साखर शाळेमुळे या मुलांचे शैक्षणिक नुकसान टळल्याचे त्यांच्या पालकांकडून सांगण्यात येत आहे. शिवाय कारखाना व्यवस्थापनाच्या भूमिकेचेही पालकांनी कौतुक केले.साखर शाळेला शिक्षण विभागाच्या प्रतिनिधींनी भेट देत गट शिक्षणाधिकारी डॉ. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विदार्थ्यांचा शैक्षणिक आढावा घेतला. यावेळी केंद्रप्रमुख एस.बी. वानखेडे, पी.बी. पाटील, डी.ए. पाटील, वैशाली बोरसे, नंदलाल गिरासे, कांतिलाल मराठे, शेतकी अधिकारी अरविंद पाटील साखर शाळेचे शिक्षक विशाल पाटील, कृष्णराव आदी उपस्थित होते.