शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

गैरप्रकारासंदर्भात समितीपुढे पुरावे सादर

By admin | Updated: February 2, 2017 00:56 IST

शहादा पाणीपुरवठा योजना : तक्रारदारांनी सादर केली कागदपत्रे

शहादा : शहादा नगरपरिषदेतील विविध शासकीय योजना आणि तापी पाणीपुरवठा योजनेतील गैरप्रकारां- संदर्भात माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केलेली होती. या तक्रारींची नगरविकास विभागाने गांभीर्याने दखल घेतली असून, 31 जानेवारी रोजी त्रिसदस्यीय समितीसमोर तक्रारदारांनी आपली भूमिका स्पष्ट करून भ्रष्टाचाराबाबत ठोस पुरावे समितीसमोर सादर केले.या संदर्भात असे की, माजी नगराध्यक्ष अशोक बागुल, नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, प्रा. दत्ता वाघ,         विनोद नारायण चौधरी, सुनीता अशोक बागुल, सुनंदाबाई अरुण चौधरी आदींनी तापी पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहार व अनियमितता या संदर्भात तक्रार केली होती.मंगळवारी वरील सदस्यांसह माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अरुण चौधरी हे समितीसमोर उपस्थित राहिले. त्यांनी या योजनेतील गैरप्रकारासंदर्भात तपशीलवार चर्चा करून भ्रष्टाचारातील उदाहरणे देऊन सक्षम पुराव्यांची फाईल समितीला सादर केली.शहादा नगरपरिषदेच्या तापी पाणीपुरवठा योजनेचे काम 2008 पासून सुरू झाले असून, सदरची योजना 2011 र्पयत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित व्हायला हवी होती. परंतु ती 2017 उजाडल्यावरही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकलेली नाही. उलट सत्ताधा:यांनी केवळ श्रेय उपटण्यासाठी जून 2016 मध्ये घाईघाईने योजनेचे उद्घाटन करून लोकार्पण सोहळा साजरा करून घेतला.जलशुद्धीकरण केंद्रात आजही व्यवस्थित जलशुद्धीकरण होत नाही. हे पाणी शहरातील सहा जलकुंभांपैकी फक्त तीन जलकुंभांनाच जोडले गेलेले आहे. पूर्ण शहरात अजूनही अनेक वसाहतीत व जुन्या वस्तीत नवीन जी.आय. पाईप टाकले गेलेले नाहीत. परिणामी संपूर्ण शहराला जलशुद्धीकरण केंद्राचे पाणी उपलब्ध होत नाही, त्यामुळे त्यांना कूपनलिकेचे पाणी प्यावे लागते. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. जलशुद्धीकरण केंद्राचा उद्देश   अजूनही सफल झालेला नाही. योजनेतील भ्रष्टाचार, गैरकारभार या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.माजी नगराध्यक्ष अशोक बागुल यांनी केलेल्या तक्रारीचीही गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. शहादा नगरपालिका बरखास्तीसह सहा गंभीर मुद्यांवरही चर्चा करण्यात आली. गांडूळ खत प्रकल्प, त्यात शासकीय निधीचे झालेले नुकसान, कर्मचा:यांच्या भविष्य निर्वाह निधीची 14 लाख रुपयांची रक्कम नियमबाह्यरित्या जनता सहकारी बँकेत गुंतवणे, घरकूल योजना त्याचप्रमाणे आय.एस.एच.डी.पी. योजनेंतर्गत मंजूर झालेली घरकूल योजना ही गरिबांना स्वत:च्या हक्काची घरे मिळावी यासाठी होती. या योजनेचे 11 कोटी रुपये आजही नगरपालिकेच्या तिजोरित पडलेले आहेत. ही योजना सुरू करण्यासाठी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, प्रा.दत्ता वाघ यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती.औरंगाबाद खंडपीठाचा आदेश असूनही ही योजना सत्ताधा:यांनी विविध लंगडय़ा सबबी पुढे करून कार्यान्वित केली नाही. गरिबांना हक्काच्या घरापासून वंचित          करण्याचे पाप सत्ताधा:यांनी केलेले आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी लागली असून, त्या संदर्भातही समितीसमोर तपशीलवार निवेदन करण्यात आले.जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. त्यात जिल्हा प्रशासन अधिकारी  नगरविकास शांताराम गोसावी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता कोळंबे व सहायक लेखाधिकारी मनोज मोरे यांचा समावेश आहे. समितीसमोर दोन तास चर्चा होऊन समितीने पुराव्यांचे अवलोकन करून लवकरच चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.    (वार्ताहर)