शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

नंदुरबारातील दुष्काळ मुल्यांकन अहवालाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 12:47 IST

नंदुरबार :  शासनाच्या निकषानुसार आणि शास्त्रीय निर्देशानुसार सप्टेंबर अखेरची परिस्थिती लक्षात घेवून दुष्काळ मुल्यांकन अहवाल तयार करण्यास सुरुवात झाली ...

नंदुरबार :  शासनाच्या निकषानुसार आणि शास्त्रीय निर्देशानुसार सप्टेंबर अखेरची परिस्थिती लक्षात घेवून दुष्काळ मुल्यांकन अहवाल तयार करण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात जिल्हाधिका:यांनी नुकतीच एक आढावा बैठक घेवून संबधीत सर्व विभागांना सुचना केल्या.टंचाई आणि दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पाणी टंचाईसह रोजगार आणि इतर समस्यांनाही ग्रामिण जनता सामोरे जावू लागली आहे. राज्य शासनाने ऑक्टोबर अखेर दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात आणि केंद्र सरकारचे पथक त्यासाठी पहाणी करण्यासाठी येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा स्तरावर दुष्काळ मुल्यांकन अहवाल तयार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात अधिकारी व कर्मचा:यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिका:यांनी नुकतीच बैठक घेवून मार्गदर्शन केले.दुष्काळ अहवाल सादर करण्यासंदर्भात शासनाने काही मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. त्या परिपत्रकातील दिलेल्या निकषानुसार व शास्त्रीय निर्देशाच्या अधीन राहूनच अहवाल तयार करण्याचे यावेळी सांगण्यात आले. टंचाई कृती आराखडासुरुवातीला टंचाई कृती आराखडा तातडीने तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी दिल्या. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळातील पहिल्या टप्प्यातील आराखडा तयार करण्यात येणार आहे, अर्थात हा आराखडा ऑक्टोबर संपल्यानंतर पुर्ण होईल हे स्पष्टच आहे. सध्या ज्या गावांना पाणी टंचाई जाणवत आहे त्या गावांना तातडीने उपाययोजना कराव्या, आराखडय़ाची वाट पाहू नये असेही जिल्हाधिका:यांनी स्पष्ट केले. रोजगार उपलब्ध करून देणारदुष्काळाच्या पाश्र्वभुमीवर अनेक गावातून मजुरांचे स्थलांतर होत आहे. ही बाब लक्षात घेता स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या विविध यंत्रणांनी कामे तयारी ठेवावी. कामाची मागणी होताच तातडीने स्थानिक स्तरावर कामे उपलब्ध करून द्यावी. कामांची मजुरी आठवडा भराच्या आत मजुरांना मिळेल यादृष्टीनेही नियोजन करण्यात यावे. यासाठीचे नियोजन रोहयो उपजिल्हाधिकारी, सर्व तहसीलदार यांनी करावे असेही त्यांनी सांगितले.चारा वाहतूक बंदीचा अध्यादेशजिल्ह्यातून इतर जिल्ह्यात चारा वाहतुकीला बंदी आणण्याचा अध्यादेशही जिल्हाधिका:यांनी काढला आहे. या आदेशात म्हटले आहे की, अपु:या पजर्न्यमानामुळे जिल्ह्यात जनावरांसाठीच्या चा:याची टंचाई आगामी काळात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चा:याची पळवापळवी होऊन त्यातून मोठय़ा प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देAील निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा आणिबाणीच्या परिस्थितीत सर्व संबधीतांना नोटीस देवून त्यांचे म्हणणे एकुण घेण्यासारखी परिस्थिती नाही. सद्य स्थितीत ते शक्य नसल्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार एकतर्फी आदेश काढणे आवश्क असल्यामुळे हा आदेश काढण्यात येत असल्याचे म्हटले आहे. यानुसार जिल्ह्यातील उत्पादीत चारा जिल्ह्यातील पशुधनास पुरेसा उपलब्ध व्हावा या दृष्टीने जिल्ह्यातून परराज्यात होणारी चारा वाहतुकीस तात्पुरती मनाई करण्यात आल्याचे यात नमुद करण्यात आले आहे.