शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

रासायनिक खतांचे दर परवडत नसल्याने शेणखताला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:29 IST

जयनगर : शहादा तालुक्यात काळी कसदार जमीन आहे. जमिनीत पाण्याचे प्रमाणही चांगले असल्याने निम्म्यापेक्षा अधिक जमीन ओलिताखाली आहे; पण ...

जयनगर : शहादा तालुक्यात काळी कसदार जमीन आहे. जमिनीत पाण्याचे प्रमाणही चांगले असल्याने निम्म्यापेक्षा अधिक जमीन ओलिताखाली आहे; पण वर्षानुवर्षांपासून रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची पोत खराब झाल्याने तसेच शेतमालाला मिळत असलेल्या दरामुळे रासायनिक खते न परवडणारे आहे. शिवाय उत्पादन घटत असल्यामुळे सध्या तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी आपल्या शेतामध्ये शेणखत टाकताना दिसून येत आहे.

शेतकरी वर्षानुवर्षांपासून शेणखताऐवजी रासायनिक खतांचा वापर करताना दिसून येत आहेत. रासायनिक खतामुळे जमिनीची पोत बिघडली असून, रासायनिक खताचे दर सध्या शेतीसाठी परवडत नाहीत. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खत, गांडूळ खत, जैविक खते वापरली जातात. जुने ते सोने या उक्तीनुसार सगळ्या शेतकऱ्यांना शेणखताचा वापर करावाच लागणार आहे.

शेणखत तयार करण्यासाठी चारा एका खड्ड्यात कुजण्यासाठी टाकला जातो. सोबत जनावरांचे शेणही त्या खड्ड्यात टाकले जाते. पावसाळ्यात चारा व शेणखत कुजून त्याचे उत्कृष्ट शेणखत खड्ड्यात तयार होत असते. हेच शेणखत मे महिन्यात शेतकरी आपल्या शेतात ज्यांच्याकडे बैलजोडी आहे ते शेतकरी बैलजोडीच्या साहाय्याने तसेच बहुतेक शेतकऱ्यांकडे बैलजोडी नसल्याकारणाने ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेणखत टाकताना दिसून येतात.

ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःचा शेणखताचा उकिरडा नाही ते शेतकरी ज्या व्यक्तींकडे जनावरांची संख्या अधिक आहे, त्यांच्याकडून शेणखत विकत घेताना दिसून येत आहेत. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडल्याने तसेच पिकांना विविध रोगांच्या प्रादुर्भावाला सामोरे जावे लागत असल्याने पारंपरिक शेणखताची शेतकऱ्यांना आठवण होत आहे; परंतु शेणखताचा तुटवडा ही मोठी समस्या सध्या शेतकऱ्यांना जाणवत आहे. कारण पूर्वी जवळ - जवळ सगळेच शेतकरी बैलजोडीचा वापर करत होते. तसेच प्रत्येकाकडे गायी, म्हशी, शेळी यासारखी जनावरे दिसत होती. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याकडे शेणखताचा उकिरडा हमखास असायचा. मात्र आता शेतीची मशागत करण्यासाठी आधुनिक यंत्रांची निर्मिती झाल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी बैलजोडी विकून ट्रॅक्टरला अधिक पसंती दिल्याचे दिसते. म्हणून शहादा तालुक्यातील अनेक शेतकरी परिसरात अनेक ठिकाणी काठेवाडी लोकांकडून शेणखताचा एका टॉलीला दोन हजार ते अडीच हजार रुपये असा दाम देऊन शेण खत विकत घेऊन आपल्या शेतात टाकताना दिसून येत आहे.

रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापराने मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. शेणखतामध्ये नत्र, स्फुरद, पालाश असते. मातीतील जैविक घटकांच्या वाढीसाठी चांगले कुजलेले शेणखत फायदेशीर असते. त्यामुळे जमिनीची पोत सुधारून उत्पादनात वाढ होते.

ग्रामीण भागात जनावरांची संख्या कमी झाल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रासायनिक खताचे दर परवडत नसल्याने तसेच रासायनिक खताच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शेणखतामुळे उत्पादन वाढून जमिनीची पोत सुधारण्यास मदत होत असते.

- चिंतामण धुडकुगीर गोसावी, शेतकरी, जयनगर, ता. शहादा