शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

रासायनिक खतांचे दर परवडत नसल्याने शेणखताला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:29 IST

जयनगर : शहादा तालुक्यात काळी कसदार जमीन आहे. जमिनीत पाण्याचे प्रमाणही चांगले असल्याने निम्म्यापेक्षा अधिक जमीन ओलिताखाली आहे; पण ...

जयनगर : शहादा तालुक्यात काळी कसदार जमीन आहे. जमिनीत पाण्याचे प्रमाणही चांगले असल्याने निम्म्यापेक्षा अधिक जमीन ओलिताखाली आहे; पण वर्षानुवर्षांपासून रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची पोत खराब झाल्याने तसेच शेतमालाला मिळत असलेल्या दरामुळे रासायनिक खते न परवडणारे आहे. शिवाय उत्पादन घटत असल्यामुळे सध्या तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी आपल्या शेतामध्ये शेणखत टाकताना दिसून येत आहे.

शेतकरी वर्षानुवर्षांपासून शेणखताऐवजी रासायनिक खतांचा वापर करताना दिसून येत आहेत. रासायनिक खतामुळे जमिनीची पोत बिघडली असून, रासायनिक खताचे दर सध्या शेतीसाठी परवडत नाहीत. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खत, गांडूळ खत, जैविक खते वापरली जातात. जुने ते सोने या उक्तीनुसार सगळ्या शेतकऱ्यांना शेणखताचा वापर करावाच लागणार आहे.

शेणखत तयार करण्यासाठी चारा एका खड्ड्यात कुजण्यासाठी टाकला जातो. सोबत जनावरांचे शेणही त्या खड्ड्यात टाकले जाते. पावसाळ्यात चारा व शेणखत कुजून त्याचे उत्कृष्ट शेणखत खड्ड्यात तयार होत असते. हेच शेणखत मे महिन्यात शेतकरी आपल्या शेतात ज्यांच्याकडे बैलजोडी आहे ते शेतकरी बैलजोडीच्या साहाय्याने तसेच बहुतेक शेतकऱ्यांकडे बैलजोडी नसल्याकारणाने ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेणखत टाकताना दिसून येतात.

ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःचा शेणखताचा उकिरडा नाही ते शेतकरी ज्या व्यक्तींकडे जनावरांची संख्या अधिक आहे, त्यांच्याकडून शेणखत विकत घेताना दिसून येत आहेत. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडल्याने तसेच पिकांना विविध रोगांच्या प्रादुर्भावाला सामोरे जावे लागत असल्याने पारंपरिक शेणखताची शेतकऱ्यांना आठवण होत आहे; परंतु शेणखताचा तुटवडा ही मोठी समस्या सध्या शेतकऱ्यांना जाणवत आहे. कारण पूर्वी जवळ - जवळ सगळेच शेतकरी बैलजोडीचा वापर करत होते. तसेच प्रत्येकाकडे गायी, म्हशी, शेळी यासारखी जनावरे दिसत होती. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याकडे शेणखताचा उकिरडा हमखास असायचा. मात्र आता शेतीची मशागत करण्यासाठी आधुनिक यंत्रांची निर्मिती झाल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी बैलजोडी विकून ट्रॅक्टरला अधिक पसंती दिल्याचे दिसते. म्हणून शहादा तालुक्यातील अनेक शेतकरी परिसरात अनेक ठिकाणी काठेवाडी लोकांकडून शेणखताचा एका टॉलीला दोन हजार ते अडीच हजार रुपये असा दाम देऊन शेण खत विकत घेऊन आपल्या शेतात टाकताना दिसून येत आहे.

रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापराने मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. शेणखतामध्ये नत्र, स्फुरद, पालाश असते. मातीतील जैविक घटकांच्या वाढीसाठी चांगले कुजलेले शेणखत फायदेशीर असते. त्यामुळे जमिनीची पोत सुधारून उत्पादनात वाढ होते.

ग्रामीण भागात जनावरांची संख्या कमी झाल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रासायनिक खताचे दर परवडत नसल्याने तसेच रासायनिक खताच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शेणखतामुळे उत्पादन वाढून जमिनीची पोत सुधारण्यास मदत होत असते.

- चिंतामण धुडकुगीर गोसावी, शेतकरी, जयनगर, ता. शहादा