शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

टंचाईयुक्त भागात जलयुक्तला प्राधान्य

By admin | Updated: February 23, 2017 00:39 IST

कार्यशाळा : गेल्या वर्षाच्या कामांचाही घेतला आढावा

नंदुरबार : ज्या गावांना पुढील काळात पाणी टंचाई जाणवेल, ज्या परिसरात भुगर्भातील पाणी पातळी खोल     गेली असेल अशा गावांना जलयुक्त अंतर्गत लाभ दिला गेला पाहिजे अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी जलयुक्तच्या तालुकास्तरीय आढावा बैठकीत दिल्या.जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तालुकास्तरीय बैठक व कार्यशाळा रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी बोलत होते. जिल्हा परिषेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष नागरे, तहसीलदार नितीन पाटील, पी.टी.बडगुजर, महेश पोतदार  आदी उपस्थित होते.सुरुवातीला गावनिहाय कामांचा आढावा घेण्यात आला. अपुर्ण असलेली कामे तातडीने पुर्ण करण्यासाठी सुचना देण्यात आल्या. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी म्हणाले, यंदा काही भागात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे अशा भागातील गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.  अनेक गावातील सरपंचांकडून     अनेक सुचना आल्या होत्या. त्यामुळे टंचाई कृती आराखडा तयार करतांना त्या बाबींचा,  सुचनांचा आढावा घेण्यास देखील सांगण्यात आले   होते. सर्वांनी वृक्ष संवर्धन, पाणी आडवा-पाणी जिरवा, जल पुनर्रभरण यासारखे प्रयोग राबविले तर परिसराचे नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही. ज्या ठिकाणी टंचाई आहे अशा ठिकाणी कुपनलिका न करता विहिरीच खोदली पाहिजेत असेही मत त्यांनी व्यक्त केले. शिवारफेरी गावातीलच लोकांनी आयोजित केली पाहिजे. ज्या गावांना पाणी टंचाई जाणवणार अशा गावांना आपण   स्वत: भेट देणार असून  उपाययोजनांचा आढावा देखील घेणार आहोत. सुरुवातीला तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांनी तालुक्यात निवडलेल्या गावांविषयी माहिती देत कामे, राबविण्यात येणारी यंत्रणा याविषयी देखील त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. प्रास्ताविक करणसिंग गिरासे यांनी केले.कार्यशाळेत जलयुक्त शिवार योजनेत निवडलेल्या गावांचे सरपंच, उपसरपंच, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी व तालुक्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.