शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईयुक्त भागात जलयुक्तला प्राधान्य

By admin | Updated: February 23, 2017 00:39 IST

कार्यशाळा : गेल्या वर्षाच्या कामांचाही घेतला आढावा

नंदुरबार : ज्या गावांना पुढील काळात पाणी टंचाई जाणवेल, ज्या परिसरात भुगर्भातील पाणी पातळी खोल     गेली असेल अशा गावांना जलयुक्त अंतर्गत लाभ दिला गेला पाहिजे अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी जलयुक्तच्या तालुकास्तरीय आढावा बैठकीत दिल्या.जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तालुकास्तरीय बैठक व कार्यशाळा रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी बोलत होते. जिल्हा परिषेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष नागरे, तहसीलदार नितीन पाटील, पी.टी.बडगुजर, महेश पोतदार  आदी उपस्थित होते.सुरुवातीला गावनिहाय कामांचा आढावा घेण्यात आला. अपुर्ण असलेली कामे तातडीने पुर्ण करण्यासाठी सुचना देण्यात आल्या. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी म्हणाले, यंदा काही भागात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे अशा भागातील गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.  अनेक गावातील सरपंचांकडून     अनेक सुचना आल्या होत्या. त्यामुळे टंचाई कृती आराखडा तयार करतांना त्या बाबींचा,  सुचनांचा आढावा घेण्यास देखील सांगण्यात आले   होते. सर्वांनी वृक्ष संवर्धन, पाणी आडवा-पाणी जिरवा, जल पुनर्रभरण यासारखे प्रयोग राबविले तर परिसराचे नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही. ज्या ठिकाणी टंचाई आहे अशा ठिकाणी कुपनलिका न करता विहिरीच खोदली पाहिजेत असेही मत त्यांनी व्यक्त केले. शिवारफेरी गावातीलच लोकांनी आयोजित केली पाहिजे. ज्या गावांना पाणी टंचाई जाणवणार अशा गावांना आपण   स्वत: भेट देणार असून  उपाययोजनांचा आढावा देखील घेणार आहोत. सुरुवातीला तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांनी तालुक्यात निवडलेल्या गावांविषयी माहिती देत कामे, राबविण्यात येणारी यंत्रणा याविषयी देखील त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. प्रास्ताविक करणसिंग गिरासे यांनी केले.कार्यशाळेत जलयुक्त शिवार योजनेत निवडलेल्या गावांचे सरपंच, उपसरपंच, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी व तालुक्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.