शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

टंचाईयुक्त भागात जलयुक्तला प्राधान्य

By admin | Updated: February 23, 2017 00:39 IST

कार्यशाळा : गेल्या वर्षाच्या कामांचाही घेतला आढावा

नंदुरबार : ज्या गावांना पुढील काळात पाणी टंचाई जाणवेल, ज्या परिसरात भुगर्भातील पाणी पातळी खोल     गेली असेल अशा गावांना जलयुक्त अंतर्गत लाभ दिला गेला पाहिजे अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी जलयुक्तच्या तालुकास्तरीय आढावा बैठकीत दिल्या.जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तालुकास्तरीय बैठक व कार्यशाळा रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी बोलत होते. जिल्हा परिषेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष नागरे, तहसीलदार नितीन पाटील, पी.टी.बडगुजर, महेश पोतदार  आदी उपस्थित होते.सुरुवातीला गावनिहाय कामांचा आढावा घेण्यात आला. अपुर्ण असलेली कामे तातडीने पुर्ण करण्यासाठी सुचना देण्यात आल्या. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी म्हणाले, यंदा काही भागात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे अशा भागातील गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.  अनेक गावातील सरपंचांकडून     अनेक सुचना आल्या होत्या. त्यामुळे टंचाई कृती आराखडा तयार करतांना त्या बाबींचा,  सुचनांचा आढावा घेण्यास देखील सांगण्यात आले   होते. सर्वांनी वृक्ष संवर्धन, पाणी आडवा-पाणी जिरवा, जल पुनर्रभरण यासारखे प्रयोग राबविले तर परिसराचे नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही. ज्या ठिकाणी टंचाई आहे अशा ठिकाणी कुपनलिका न करता विहिरीच खोदली पाहिजेत असेही मत त्यांनी व्यक्त केले. शिवारफेरी गावातीलच लोकांनी आयोजित केली पाहिजे. ज्या गावांना पाणी टंचाई जाणवणार अशा गावांना आपण   स्वत: भेट देणार असून  उपाययोजनांचा आढावा देखील घेणार आहोत. सुरुवातीला तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांनी तालुक्यात निवडलेल्या गावांविषयी माहिती देत कामे, राबविण्यात येणारी यंत्रणा याविषयी देखील त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. प्रास्ताविक करणसिंग गिरासे यांनी केले.कार्यशाळेत जलयुक्त शिवार योजनेत निवडलेल्या गावांचे सरपंच, उपसरपंच, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी व तालुक्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.