शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

प्रतापपूरात पिके करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 11:39 IST

प्रतापपूर परिसर : सोयाबीन, कापूस, पपई पिकांना फटका, पाण्याची पातळी खालावली

प्रतापपूर : तळोदा तालुक्यातील प्रतापपूरसह लगतच्या परिसरात कमी पजर्न्यमान व परतीच्या पावसानेही निराशा केल्याने  सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी, तूर, उडिद आदी पिकांच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट होण्याची शक्यता आह़े बोअरवेलच्या पाण्याची पातळी  खालावली आह़े त्यामुळे पिकाला लागलेला खर्चही काढणे कठीण झाले आह़ेया वर्षी सरासरीपेक्षा अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आह़े याचा फटका पिकांना बसताना दिसून येत आह़े सोयाबीन पिक ऐन बहरात असताना पाऊस न झाल्याने या पिकाचे नुकसान झाले आह़े परिणामी उत्पन्नात घट झालेली आह़े पिकांवरील खर्च काढणेही शक्य होत नसल्याचे उत्पादक शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े तसेच सप्टेंबर महिन्यात पाऊस नसल्याने कापूस पिकाला बोंडअळीमुळे नुकसान सहन करावे लागले आह़े पिकांची पाने लाल पडत असून यामुळे कापसाचा दर्जा खालावत आह़े या परिसरात सोयाबीन व कापूस हे पिक मोठय़ा प्रमाणात घेतले जात़े ज्वारी, उडीद, तुर या कोरडवाहू पिकांनाही पाणीटंचाईचा फटका बसत आह़ेप्रतापपूर परिसर सातपुडय़ाच्या पायथ्याशी असून या भागात पाण्याची पातळी गेल्या अनेक वर्षापासून तग धरुन होती़ मात्र या वर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने पावसाळा संपला तरीदेखील पाणी लागले नाही़ त्यात, भाद्रपद महिन्यात तापमानाचा पारा वाढल्याने  पिकांचे अधिकच नुकसान होत आह़े आधीच पाण्याची कमतरता त्यात, तापमान यामुळे पिके करपू लागली आहेत़ पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत असून शेतकरी ऊस व केळी पिके वाचविण्यासाठी कसरत करीत आहेत़ बारमाही पिकांवर  महागडी रसायने, खते, किटकनाशक, ठिबक सिंचन आदींचा खर्च करावा लागत असतो़ त्यामुळे निदान तेवढा खर्चही निघाला तरी बरे होईल अशी अपेक्षा शेतक:यांकडून व्यक्त केली जात आह़े दरम्यान, केळी पिकाला जास्त पाणी लागत असत़े या भागात कांदे बाग प्रकारात केळीची लागवड केली जात़े हे पिक उन्हाळ्यात एप्रिल व मे महिन्याच्या अखेरीस निघेल, मात्र तोर्पयत बोअरवेल चालणे अवघड असल्याने शेतकरी पाण्याच्या विवंचनेत आहेत़ प्रतापपूर परिसर सातपुडय़ाच्या पायथ्याशी असल्याने या भागात पर्वत रांगेत गुरांना मुबलक प्रमाणात चारा मिळतो़ मात्र या वर्षी कमी पावसामुळे गवत करपू लागले आहेत़ त्यामुळे चा:याचाही तुटवडा जाणवत आह़े तसेच चा:याचे पिक म्हणून ओळखल्या जाणा:या ज्वारी, मका या पिकांच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट आल्याने पशुपालकांना चा:याचा प्रश्न सतावत आह़े  परिसरात पशुपालकांकडे बैल, गाई, म्हशी, शेळ्या मोठय़ा प्रमाणात असून त्यामानाने चा:याचे पिके कमी असल्याने चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आह़े परिसरात खरिपाच्या पिकांना कमी पजर्न्यमानामुळे फटका  बसत आह़े यातून उत्पन्नात घट होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आह़े त्यामुळे शासनाने त्वरीत दुष्काळ जाहीर करावा अशी  अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े