शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शहा विद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:34 IST

कै. विश्रामकाका पाटील शैक्षणिक संकुलाच्या आवारात झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सत्कार समारंभास महाविद्यालयाचे प्राचार्य आय.डी. पाटील, उपप्राचार्य एस.जे. पटेल, उपमुख्याध्यापक ...

कै. विश्रामकाका पाटील शैक्षणिक संकुलाच्या आवारात झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सत्कार समारंभास महाविद्यालयाचे प्राचार्य आय.डी. पाटील, उपप्राचार्य एस.जे. पटेल, उपमुख्याध्यापक एस.डी. भोई, पर्यवेक्षिका यू.एस. खैरनार व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. दहावीच्या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून प्रथम भावना अनिल वसावे (९७.०३ टक्के), द्वितीय क्रमांक ईश्‍वर पाटील (९७.०७ टक्के) याने पटकावला. शाळेचा बारावीचा निकालही १०० टक्के लागला असून यात महाविद्यालयात प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात विज्ञान शाखेत तेजस नेत्रदीपक कुवर यास (९६.३३ टक्के) प्रथम व नंदुरबारे तेजस विजय (९६ टक्के) द्वितीय, कला शाखेत प्रीती विजय अहिरे (८२.८३ टक्के) प्रथम व दिव्यानी युवराज सूर्यवंशी (८२ टक्के) द्वितीय तर वाणिज्य शाखेत भूमिका राजेंद्र संगारे (९२.६६ टक्के) प्रथम व मेघा नरेंद्र प्रजापती (९२.०५ टक्के) द्वितीय, तसेच किमान कौशल्य विभागातून विशाल मधुकर (८४.६७ टक्के) प्रथम व आकाश रवींद्र पावरा व गौरव भिला माळी या दोघा विद्यार्थ्यांना समान गुण (७९.५० टक्के) मिळाल्याने त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. गुणवंत झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, शिल्ड व विद्यालयाची बॅग भेट देण्यात आली. शेठ व्ही.के. शहा माध्यमिक विद्यालयातून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षेत समर्थ प्रदीप क्षीरसागर व रायसिंग साकऱ्या पाडवी हे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यार्थ्यांना वार्षिक १० हजार रुपये शिष्यवृत्ती राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे. त्यांचाही गौरव यावेळी करण्यात आला.

यावेळी मोतीलाल पाटील म्हणाले की, कोरोनामुळे अनेक दिवसांपासून शाळेशी, महाविद्यालयाशी विद्यार्थ्यांचा संपर्क तुटला होता. याच काळात ऑनलाइन अभ्यासक्रमातून शिक्षणात सातत्य ठेवले. गेल्या दीड-दोन वर्षात काय झाले काय नाही झाले हे विसरून विद्यार्थ्यांनी आता पुन्हा क्षितिजापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा. संस्थेचे अनेक गुणवंत विद्यार्थी हे राज्याच्या बाहेर तसेच परदेशात उच्च शिक्षणासाठी पोहोचले आहे. त्यांचा आदर्श घ्यावा, असे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. एस. एस. पाटील यांनी केले.