शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
4
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
5
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
6
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
7
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
8
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
9
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
10
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
11
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
12
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
13
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
14
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
15
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
16
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
18
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
19
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
20
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले

अतिदुर्गम भागातील द:याखो:यात उतरुन पाण्यासाठी करावी लागतेय कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सातपुडय़ाच्या अतिदुर्गम द:याखो:याचा भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर ग्रामपंचायत अंतर्गत केवडीचा पाताईपाडा, कुईसापाडा अरेढी ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : सातपुडय़ाच्या अतिदुर्गम द:याखो:याचा भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर ग्रामपंचायत अंतर्गत केवडीचा पाताईपाडा, कुईसापाडा अरेढी कुबाईपाडा, बोरविहीपाडा, पाटीलपाडा या पाडय़ांवर महिनाभरापासून पाण्याची पातळी खाली गेल्याने हातपंप बंद पडले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना दीड-दोन किलोमीटर भटकंती करीत झ:यातून पाणी गाळून पिण्यासाठी आणावे लागत आहे.केवडीचा कुईसापाडा येथील ग्रामस्थ भटकंती करीत एक किलोमीटर अंतरावरील नाल्याच्या झ:यात तासन्तास थांबून हंडाभर पाणी गोळा झाल्यावर पाणी गाळून पिण्यासाठी आणतात. अरेढीचा बोरविहीपाडा येथे एक हातपंप असून महिनाभरापासून तो बंद असल्याने दोन किलोमीटर अंतरावरून केवडी अरेढी गावाच्या मध्यठिकाणी असलेल्या नाल्यातून पाणी आणावे लागत आहे. अरेढी येथे चार हातपंप असून एप्रिल महिन्यापासून हातपंप आटल्याने दीड किलोमीटर अंतरावरून भटकंती करीत चढउतारच्या दरीत खाली उतरून तयार केलेल्या नाल्यातून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. पाटीलपाडा येथे दोन हातपंपाची पाण्याची पातळी एक महिन्यापासून खाली गेल्याने पाण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दरीत एका नाल्यातून पाणी आणावे लागते. मात्र याठिकाणी पाणी कमी असल्याने या पाडय़ांवरील नागरिकांना दोन किलोमीटर अंतरावर खोगदी नाल्यातील विहीरीवर गुराढोरांना पाणी पाजण्यासाठी तसेच स्वत: आंघोळीसाठी जावे लागत आहे. कुकडीपादरच्या तुरईपाडा येथे दोन्ही हातपंप आटल्याने तीन किलोमीटर अंतरावरून बारीपाडा येथील झ:यातून पाणी आणून तेथेच गुराढोरानांही पाणी पिण्यासाठी आणावे लागते.अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर व त्याअंतर्गत येणारे पाडे हे अतिदुर्गम भागात आहेत. या पाडय़ांवर पाणीपुरवठय़ासाठी असलेले हातपंप पाणी पातळी खोल गेल्याने महिनाभरापासून बंद पडले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना नदी-नाल्यात ङिारे तयार करून पाणी मिळवावे लागत आहे. त्यासाठी एक ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते. हा भाग डोंगराळ असल्याने रस्ते नाहीत. परिणामी द:याखो:यात उतरुन चढउताराच्या रस्त्यावरून कसरत करीत पाणी आणावे लागते. तसेच आंघोळही याचठिकाणी करावी लागते. इतक्या लांबवरुन पाणी आणून गुराढोरांना पाणी पाजणे शक्य नसल्याने सोबत पाळीव जनावरांनाही पाणी पाजण्यासाठी न्यावे लागते.