लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊन असल्याने प्रेमवीरांना केवळ विरह सहन करुन जगावे लागत आहे़ परंतू या विरहावर मात करत थेट राज्याच्या सीमा ओलांडून जात तेथे विवाह करुन परत येणाऱ्या ‘सज्ञान’ जोडप्याला पोलीसांनी लॉकडाऊन मोडल्याचा रंग दाखवत मास्क न लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे़ सोमवारी शहर पोलीस ठाण्यात हे जोडपे आले होते़शहरातील नवनाथ नगर भागात २१ व १८ वर्षीय युवतीत गेल्या काही दिवसांपासून प्रेम बहरले होते़ यातून मग तुझ्याशिवाय जगूच शकत नाही़ ही भावना अधिक वाढत गेल्याने १५ मे चा मुहूर्त साधून दोघांनीही घरातून पलायन केले़ मोटारसायकलने आधी घराबाहेर आणि नंतर नंदुरबार शहराबाहेर पडलेल्या दोघांनी गुजरात राज्याचा रस्ता धरत निझरकडे जाणे पसंत केले़ ग्रामीण भागातील विविध रस्ते धुंडाळून अवघ्या काही अंतरावर असलेल्या निझर पोहोचल्यानंतर दोघांनी तेथे ‘जुगाड’ करुन विवाह सोहळा उरकून घेतला होता़ लॉकडाऊनमुळे तेथे राहणे शक्य नसल्याने दोघेही अवघ्या तीन तासातच परतही आले़ घरी आल्यानंतर दोघांच्या कुटूंबियांना ही माहिती समजल्यानंतर त्यांनी दोघांना दूर सारण्याचा प्रयत्नही करुन पाहिला़ परंतू ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने दोन्ही कुटूंबांनी अखेर पोलीस ठाणे गाठून दाद मागितली़ परंतू दोघेही सज्ञान असल्याचा निर्वाळा देत पोलीसांनी कारवाईबाबत असमर्थता दर्शवली़ परंतू लॉकडाऊनकाळात मोटारसायकलने महाराष्ट्र ते गुजरात असा दोन वेळा विनापरवाना प्रवास करुन कायद्याचे उल्लंघन करणे आणि पोलीस ठाण्यात मास्कविना फिरताना प्रियकर आणि प्रेयसी आढळून आल्याने त्यांच्यावर कलम २६८, २६९ व २९० प्रमाणे गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली आहे़ याबाबत पोलीस नाईक नरेंद्र देवराज यांनी फिर्याद दिली असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बिºहाडे करत आहेत़कायद्याने दोघांवर गुन्हा दाखल झाल्यानंतरही यातही प्रेमाची जीत म्हणून दोघेही सोबत राहणार या हट्टावर अडून बसल्याने कुटूंबियांनीही आवरते घेत दोघांना मोकळे केले़
प्रेमामुळे ‘जीना मरना तेरे संग’ सांगून पळालेल्यांना पोलीसांनी दाखवला रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 11:38 IST