शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम सुरक्षा दलासह पोलीस मित्र करणार गावांच्या सिमेचे रक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी तंत्रज्ञानाचादेखील वापर करण्यात येत असून जिल्हाधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी तंत्रज्ञानाचादेखील वापर करण्यात येत असून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गावात पोलीस मित्र व ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून विशेष दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.परराज्य आणि पर जिल्ह्यातून होणारी वाहतूक व नागरिकांची ये-जा यामुळे कोरोनाच्या उपाययोजनांवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. यावर मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी सांगितले, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी सीमेवरील गावांची यादी तयार करावी. या गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात यावे.या दलात गावातील कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामसेवक, शासकीय कर्मचारी, एनएसएस किंवा एनसीसीचे विद्यार्थी, उपक्रमशील युवकांचा समावेश करण्यात यावा.जिल्ह्यातील विविध रुग्णालयात संशयित व्यक्तींच्या उपचारासाठी वापरण्यात आलेल्या औषधांची वेष्टणे व इतर अनपयुक्त साहित्य पिवळ्या रंगाच्या वेगळ्या पिशवीत एकत्रित करण्यात यावे. बाहेरील जिल्ह्यातून वैद्यकीय कारणासाठी पास घेऊन आलेल्या व्यक्तीला क्वारंटाईन करण्यात यावे.रेशन दुकानदारांमार्फत अन्नधान्याचे योग्य प्रमाणात व नियमानुसार वितरण व्हावे यासाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी दुकाननिहाय एका कर्मचाºयाची नियुक्ती करावी. गावातील प्रतिनिधी आणि नियुक्त कर्मचाºयासमोर धान्य वाटप होईल याची दक्षता घ्यावी.गैरप्रकार आढळल्यास चौकशी करून त्वरीत कारवाई करावी. पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरूस्तीची कामे करण्यासाठी परवानगी देण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात येणार असून ही कामे वेळेत होतील याकडे संबधित यंत्रणेने लक्ष द्यावे. स्थानिक कामगार निवडण्यावर अधिक भर द्यावा. कामगारांची फारशी वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. पाणी पुरवठा, गटारीची कामे, महत्वाचे रस्ते आदी कामांचा यात समावेश असेल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.पोलीस मित्र व ग्राम सुरक्षा दलामार्फत ८ तासाच्या तीन पाळ्यांमध्ये गावात येणाºया व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात यावे. शेजारील जिल्ह्यातील कोणतीही व्यक्ती गावात येणार नाही किंवा गावातील कोणतीही व्यक्ती शेजारील जिल्ह्यात जाणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. नागरिकांसोबत वाद टाळावेत व ग्राम सुरक्षा दलाने कोणताही बळाचा वापर करू नये, आवश्यकता असल्यास पोलिसांची मदत घेता येणार आहे.