शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

झाडांची कत्तल केली, पण पर्यायी वृक्ष लागवड कधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:29 IST

महामार्गाचे नूतनीकरण : काम सुरू असतानाच वृक्ष लागवडीची मोहीमही राबवावी

नंदुरबार : विसरवाडी ते सेंधवा महामार्गाच्या नूतनीकरणासाठी अडीच हजारावर वृक्षांची कत्तल करण्यात आली. परंतु त्या मोबदल्यात राबवायची वृक्ष लागवड मोहीम संबंधित ठेकेदाराने अद्यापही सुरू न केल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नव्हे तर यंदाच्या दुष्काळी स्थितीला काहीअंशी ही घटनाही जबाबदार असल्याचे बोलले जात असून आतापासूनच वृक्ष लागवड मोहीम सुरू करण्याचा सूर व्यक्त होत आहे.जिल्ह्यातून विसरवाडी-सेंधवा हा महामार्ग जात असून त्यासाठी रस्त्यावर असलेल्या वृक्षांची मोठय़ा प्रमाणावर कत्तल करण्यात आली. अगदी 50 वर्षाहून जास्त वयाची मोठमोठे वृक्षही तोडली गेली. वास्तविक मुळासकट वृक्ष काढून तो जसाच्या तसा दुस:या ठिकाणी लागवड करण्याचे तंत्र विकसीत झाले असले तरी तो पर्याय न वापरता या महामार्गाच्या कामासाठी झाडे तोडण्यात आली. आज या घटनेला दोन वर्षे झाली. महामार्गाचे कामही अतिशय संथगतीने सुरू            आहे. सद्यस्थितीत या महामार्गावर कोळदा ते कोरीट फाटार्पयत काम झाले आहे. त्यातही मध्ये लहान शहादेजवळ जवळपास एक किलोमीटर व कोरीट फाटय़ाच्या अलिकडे अर्धा किलोमीटर काम अपूर्णच आहे. पुढे प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान दोन किलोमीटर  काम झाले आहे. शहाद्यापासून पुढे टप्प्याटप्प्यात कामे सुरू असल्याने हा रस्ताच रहदारीसाठी अडथळ्याचा ठरला आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी सर्वात त्रासदायक रस्ता झाला आहे. याबाबत लोकांमध्ये संताप व्यक्त होत असतानाच दुसरीकडे वृक्ष लागवडीबाबतही बेपर्वाई केली             जात आहे. ज्या भागात रस्ता झाला किंवा ज्याठिकाणी जमीन संपादीत झाली अशा भागात वृक्ष लागवड वेळीच सुरू होणे आवश्यक आहे. एका झाडाच्या बदल्यात पाच           वृक्ष लागवड करण्याचे बंधन आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने आताच मोठे रोप आणून त्याची लागवड        केली तर सध्या रस्त्यावर पाणी मारण्याची कामे सुरू असल्याने झाडांनाही वेळेवर पाणी दिले जाईल. शिवाय त्याची काळजी घेतली जाईल. त्यामुळे वृक्षांचे संगोपनही होईल, अशा प्रतिक्रिया लोकांमध्ये व्यक्त होत आहेत.परंतु याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींनीही बेफिकीरीची भूमिका घेतल्याने या रस्त्यावरील वृक्षतोड झालेल्या वृक्षांच्या बदल्यात पर्यायी वृक्षारोपण होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. आज या रस्त्यावर सावलीसाठीही वृक्ष सापडणे दुर्मीळ झाल्याने त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.