शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

झाडांची कत्तल केली, पण पर्यायी वृक्ष लागवड कधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:29 IST

महामार्गाचे नूतनीकरण : काम सुरू असतानाच वृक्ष लागवडीची मोहीमही राबवावी

नंदुरबार : विसरवाडी ते सेंधवा महामार्गाच्या नूतनीकरणासाठी अडीच हजारावर वृक्षांची कत्तल करण्यात आली. परंतु त्या मोबदल्यात राबवायची वृक्ष लागवड मोहीम संबंधित ठेकेदाराने अद्यापही सुरू न केल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नव्हे तर यंदाच्या दुष्काळी स्थितीला काहीअंशी ही घटनाही जबाबदार असल्याचे बोलले जात असून आतापासूनच वृक्ष लागवड मोहीम सुरू करण्याचा सूर व्यक्त होत आहे.जिल्ह्यातून विसरवाडी-सेंधवा हा महामार्ग जात असून त्यासाठी रस्त्यावर असलेल्या वृक्षांची मोठय़ा प्रमाणावर कत्तल करण्यात आली. अगदी 50 वर्षाहून जास्त वयाची मोठमोठे वृक्षही तोडली गेली. वास्तविक मुळासकट वृक्ष काढून तो जसाच्या तसा दुस:या ठिकाणी लागवड करण्याचे तंत्र विकसीत झाले असले तरी तो पर्याय न वापरता या महामार्गाच्या कामासाठी झाडे तोडण्यात आली. आज या घटनेला दोन वर्षे झाली. महामार्गाचे कामही अतिशय संथगतीने सुरू            आहे. सद्यस्थितीत या महामार्गावर कोळदा ते कोरीट फाटार्पयत काम झाले आहे. त्यातही मध्ये लहान शहादेजवळ जवळपास एक किलोमीटर व कोरीट फाटय़ाच्या अलिकडे अर्धा किलोमीटर काम अपूर्णच आहे. पुढे प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान दोन किलोमीटर  काम झाले आहे. शहाद्यापासून पुढे टप्प्याटप्प्यात कामे सुरू असल्याने हा रस्ताच रहदारीसाठी अडथळ्याचा ठरला आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी सर्वात त्रासदायक रस्ता झाला आहे. याबाबत लोकांमध्ये संताप व्यक्त होत असतानाच दुसरीकडे वृक्ष लागवडीबाबतही बेपर्वाई केली             जात आहे. ज्या भागात रस्ता झाला किंवा ज्याठिकाणी जमीन संपादीत झाली अशा भागात वृक्ष लागवड वेळीच सुरू होणे आवश्यक आहे. एका झाडाच्या बदल्यात पाच           वृक्ष लागवड करण्याचे बंधन आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने आताच मोठे रोप आणून त्याची लागवड        केली तर सध्या रस्त्यावर पाणी मारण्याची कामे सुरू असल्याने झाडांनाही वेळेवर पाणी दिले जाईल. शिवाय त्याची काळजी घेतली जाईल. त्यामुळे वृक्षांचे संगोपनही होईल, अशा प्रतिक्रिया लोकांमध्ये व्यक्त होत आहेत.परंतु याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींनीही बेफिकीरीची भूमिका घेतल्याने या रस्त्यावरील वृक्षतोड झालेल्या वृक्षांच्या बदल्यात पर्यायी वृक्षारोपण होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. आज या रस्त्यावर सावलीसाठीही वृक्ष सापडणे दुर्मीळ झाल्याने त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.