शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

झाडांची कत्तल केली, पण पर्यायी वृक्ष लागवड कधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:29 IST

महामार्गाचे नूतनीकरण : काम सुरू असतानाच वृक्ष लागवडीची मोहीमही राबवावी

नंदुरबार : विसरवाडी ते सेंधवा महामार्गाच्या नूतनीकरणासाठी अडीच हजारावर वृक्षांची कत्तल करण्यात आली. परंतु त्या मोबदल्यात राबवायची वृक्ष लागवड मोहीम संबंधित ठेकेदाराने अद्यापही सुरू न केल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नव्हे तर यंदाच्या दुष्काळी स्थितीला काहीअंशी ही घटनाही जबाबदार असल्याचे बोलले जात असून आतापासूनच वृक्ष लागवड मोहीम सुरू करण्याचा सूर व्यक्त होत आहे.जिल्ह्यातून विसरवाडी-सेंधवा हा महामार्ग जात असून त्यासाठी रस्त्यावर असलेल्या वृक्षांची मोठय़ा प्रमाणावर कत्तल करण्यात आली. अगदी 50 वर्षाहून जास्त वयाची मोठमोठे वृक्षही तोडली गेली. वास्तविक मुळासकट वृक्ष काढून तो जसाच्या तसा दुस:या ठिकाणी लागवड करण्याचे तंत्र विकसीत झाले असले तरी तो पर्याय न वापरता या महामार्गाच्या कामासाठी झाडे तोडण्यात आली. आज या घटनेला दोन वर्षे झाली. महामार्गाचे कामही अतिशय संथगतीने सुरू            आहे. सद्यस्थितीत या महामार्गावर कोळदा ते कोरीट फाटार्पयत काम झाले आहे. त्यातही मध्ये लहान शहादेजवळ जवळपास एक किलोमीटर व कोरीट फाटय़ाच्या अलिकडे अर्धा किलोमीटर काम अपूर्णच आहे. पुढे प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान दोन किलोमीटर  काम झाले आहे. शहाद्यापासून पुढे टप्प्याटप्प्यात कामे सुरू असल्याने हा रस्ताच रहदारीसाठी अडथळ्याचा ठरला आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी सर्वात त्रासदायक रस्ता झाला आहे. याबाबत लोकांमध्ये संताप व्यक्त होत असतानाच दुसरीकडे वृक्ष लागवडीबाबतही बेपर्वाई केली             जात आहे. ज्या भागात रस्ता झाला किंवा ज्याठिकाणी जमीन संपादीत झाली अशा भागात वृक्ष लागवड वेळीच सुरू होणे आवश्यक आहे. एका झाडाच्या बदल्यात पाच           वृक्ष लागवड करण्याचे बंधन आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने आताच मोठे रोप आणून त्याची लागवड        केली तर सध्या रस्त्यावर पाणी मारण्याची कामे सुरू असल्याने झाडांनाही वेळेवर पाणी दिले जाईल. शिवाय त्याची काळजी घेतली जाईल. त्यामुळे वृक्षांचे संगोपनही होईल, अशा प्रतिक्रिया लोकांमध्ये व्यक्त होत आहेत.परंतु याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींनीही बेफिकीरीची भूमिका घेतल्याने या रस्त्यावरील वृक्षतोड झालेल्या वृक्षांच्या बदल्यात पर्यायी वृक्षारोपण होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. आज या रस्त्यावर सावलीसाठीही वृक्ष सापडणे दुर्मीळ झाल्याने त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.