शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

मिरची उद्योगावर आले दुहेरी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:29 IST

नंदुरबार : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनने मिरची उद्योगालाही फटका बसला आहे. आधीच अवकाळी पावसाने मिरचीचे नुकसान झालेले असताना पुन्हा ...

नंदुरबार : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनने मिरची उद्योगालाही फटका बसला आहे. आधीच अवकाळी पावसाने मिरचीचे नुकसान झालेले असताना पुन्हा यंदा कोरोनाच्या लॉकडाऊनच्या रूपाने दुहेरी संकट ओढवले आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यातच कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले. मिरची व्यावसायिकांचा व्यवसाय वर्षभरात केवळ तीन-चार महिन्यांचाच असतो. गेल्या वषी मजूर निघायला तयार नव्हते. कोरोनाच्या भीतीमुळे म्हणा किंवा कितीतरी लोक बाधितपण झाले. यामुळे व्यवसायावर परिणाम झाला. जो कोट्यवधींचा व्यवसाय असतो तो आता कोरोनामुळे लाखोंवर येऊन थांबला आहे.

फेब्रुवारी-मार्च ते मे असे तीन-चार महिना मिरची व्यवसाय चालतो. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे आधीच अवकाळीचा फटका बसला आहे. यामुळे दक्षिणेकडून लाल मिरची जादा भावाने मागवावी लागली. त्यात परवडत नसताना पुन्हा गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. जिल्हा प्रशासनाने काही अटी-शर्तींवर मिरची कारखाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु मजूर येण्यासच तयार नसल्याचे विदारक चित्र आहे. मजुरांना अक्षरश: विनवण्या करून आणावे लागत आहे. त्यातील बोटावर मोजण्याएवढेच मजूर येतात. यामुळे व्यवसाय कसा करावा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

-चेतन शहा,

मिरची उद्योजक, नंदुरबार