शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

लोकसहभागामुळे पाचोराबारीला मिळाले गतवैभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 11:25 IST

पाचोराबारी दुर्घटना : दोन वर्षानंतरही जुन्या आठवणींनी अंगावर उभा राहतो काटा

संतोष सूर्यवंशी ।नंदुरबार : गेल्या दोन वर्षापूर्वी नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी येथे झालेल्या अतिवृष्टीने माजलेल्या हाहाकाराला बुधवारी दोन वर्ष पूर्ण होताहेत़ अवघ्या दोन तासात होत्याचे नव्हते झाले होत़े 396 मि़मी पडलेल्या पावसाने सर्वच उद्ध्वस्त झाले होत़े गावाला पुन्हा पूर्व पदावर आणणे प्रशासन व स्वता ग्रामस्थांसमोर मोठे आव्हान होत़े परंतु ग्रामस्थ व प्रशासनाने दाखविलेल्या आत्मविश्वासामुळेच पाचोराबारीचे गतवैभव पुन्हा प्राप्त झाल्याचे अनुभव येथील पीडितांकडून कथन केले जाताय़11 जुलै 2016 ची मध्यरात्र आठवली की पाचोराबारीकरांचा अजूनही अंगाचा थरकाप उडतो़ मुसळधार पाऊसाला सोबत सुसाट वा:याची जोड़ यामुळे मध्यरात्री एकाच्याही डोळ्याला डोळा लागला  नाही़ तब्बल दोन तासात 396 मि़मी़ इतका प्रचंड पाऊस झाल्याने अनेकांची घरे, पशुधन, शेती साहित्ये, संसार यात वाहून गेला़ उद्याचा सूर्याेदय बघण्यास मिळतोय की नाही? अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली होती़ परंतु शेवटी ज्याची भिती होती तेच झाल़े दोन तासांच्या मुसळधार पावसाने येथील ग्रामस्थांचे स्वप्नच जणू वाहून नेल़े पाचोराबारी गाव एका रात्रीच केवळ एक सपाट मैदान म्हणून उरले होत़े घटना इतकी गंभीर होती की, पाचोराबारीला भेट द्यायला येणा:या प्रत्येक जणाला विश्वासच होईना, की येथे एकेकाळी गाव वसलेले होत़े परंतु ग्रामस्थ व प्रशासनाच्या मनात असलेल्या आत्मविश्वासामुळे अवघ्या आठ ते नऊ महिन्यात येथील 141 पीडितांचे पुर्नवसन करण्यात आल़े यासाठी प्रशासनाकडूनही सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आल़ेनैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान ही महाराष्ट्राला नवीन बाब नाही़ मात्र त्या नुकसानीतून सावरुन पूर्वपदावर येण्यासाठी मात्र अनेक गावे आजही वर्षानुवर्षापासून संघर्ष करीत आहेत़ पण पाचोराबारी त्याला अपवाद ठरले आह़े अतिवृष्टीत अख्खी वसाहत वाहून गेल्यानंतर या अतिवृष्टीत जी जिवीत हाणी झाली ती भरुन काढणे कठीण होत़े परंतु घरांचे जे नुकसान झाले, त्याला नवे रुप अवघ्या सहा-आठ महिन्यात देण्यात प्रशासनाला यश आल़े प्रशासन आणि लोकसहभागातून आपत्तीला सामोरे कसे जावे याचे महाराष्ट्रातील आदर्श उदाहरण पाचोराबारी ठरल़े अर्थातच त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ़मल्लिनाथ कलशेट्टी यांचे परिश्रम, प्रयत्न आणि संयोजन वाखाणण्याजोगे आह़े म्हणूनच बाधितांनी गावालाच कलशेट्टी नगर असे नाव दिले आह़े पाचोराबारी ता़ नंदुरबार येथे दोन वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले होत़े त्यामुळे गावातील  पीडितांचे पुन्हा पुर्नवसन करणे एक मोठे आव्हान होत़े  परंतु ग्रामस्थांच्या सहकार्याने व मेहनतीने ते प्रशासनाला शक्य झाल़ेशुन्यातून पुन्हा विश्व निर्माण करायचे होत़े गावातील 141 कुटुंबियांचे पुन्हा नव्याने पुर्नवसन करण्यात आल़े मयतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत करण्यात आली़ सर्वाना नव्याने घरे उभारुन झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात आली़ गावातील ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेल्या आत्मविश्वासामुळे प्रशासनाला बळ मिळाल़े तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक आदी प्रशासकीय अधिका:यांकडून रात्रन्दिवस मेहनत घेण्यात आली़ गावातील रस्ते, इमारती, शाळा आदींची पुन्हा नव्याने निर्मिती करण्यात आली़ आपण स्वतादेखील महिन्यातून दोन वेळा पाचोराबारीला भेट देऊन होत असलेल्या कामाचा पाठपुरावा केला़ अखेरीस पाचोराबारीला                   पुन्हा गतवैभव मिळवून दिल़े           पुर्नवसन कार्यात ग्रामस्थ, विविध संघटना आदींचे मोलाचे सहकार्य मिळाल़े