शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागामुळे पाचोराबारीला मिळाले गतवैभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 11:25 IST

पाचोराबारी दुर्घटना : दोन वर्षानंतरही जुन्या आठवणींनी अंगावर उभा राहतो काटा

संतोष सूर्यवंशी ।नंदुरबार : गेल्या दोन वर्षापूर्वी नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी येथे झालेल्या अतिवृष्टीने माजलेल्या हाहाकाराला बुधवारी दोन वर्ष पूर्ण होताहेत़ अवघ्या दोन तासात होत्याचे नव्हते झाले होत़े 396 मि़मी पडलेल्या पावसाने सर्वच उद्ध्वस्त झाले होत़े गावाला पुन्हा पूर्व पदावर आणणे प्रशासन व स्वता ग्रामस्थांसमोर मोठे आव्हान होत़े परंतु ग्रामस्थ व प्रशासनाने दाखविलेल्या आत्मविश्वासामुळेच पाचोराबारीचे गतवैभव पुन्हा प्राप्त झाल्याचे अनुभव येथील पीडितांकडून कथन केले जाताय़11 जुलै 2016 ची मध्यरात्र आठवली की पाचोराबारीकरांचा अजूनही अंगाचा थरकाप उडतो़ मुसळधार पाऊसाला सोबत सुसाट वा:याची जोड़ यामुळे मध्यरात्री एकाच्याही डोळ्याला डोळा लागला  नाही़ तब्बल दोन तासात 396 मि़मी़ इतका प्रचंड पाऊस झाल्याने अनेकांची घरे, पशुधन, शेती साहित्ये, संसार यात वाहून गेला़ उद्याचा सूर्याेदय बघण्यास मिळतोय की नाही? अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली होती़ परंतु शेवटी ज्याची भिती होती तेच झाल़े दोन तासांच्या मुसळधार पावसाने येथील ग्रामस्थांचे स्वप्नच जणू वाहून नेल़े पाचोराबारी गाव एका रात्रीच केवळ एक सपाट मैदान म्हणून उरले होत़े घटना इतकी गंभीर होती की, पाचोराबारीला भेट द्यायला येणा:या प्रत्येक जणाला विश्वासच होईना, की येथे एकेकाळी गाव वसलेले होत़े परंतु ग्रामस्थ व प्रशासनाच्या मनात असलेल्या आत्मविश्वासामुळे अवघ्या आठ ते नऊ महिन्यात येथील 141 पीडितांचे पुर्नवसन करण्यात आल़े यासाठी प्रशासनाकडूनही सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आल़ेनैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान ही महाराष्ट्राला नवीन बाब नाही़ मात्र त्या नुकसानीतून सावरुन पूर्वपदावर येण्यासाठी मात्र अनेक गावे आजही वर्षानुवर्षापासून संघर्ष करीत आहेत़ पण पाचोराबारी त्याला अपवाद ठरले आह़े अतिवृष्टीत अख्खी वसाहत वाहून गेल्यानंतर या अतिवृष्टीत जी जिवीत हाणी झाली ती भरुन काढणे कठीण होत़े परंतु घरांचे जे नुकसान झाले, त्याला नवे रुप अवघ्या सहा-आठ महिन्यात देण्यात प्रशासनाला यश आल़े प्रशासन आणि लोकसहभागातून आपत्तीला सामोरे कसे जावे याचे महाराष्ट्रातील आदर्श उदाहरण पाचोराबारी ठरल़े अर्थातच त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ़मल्लिनाथ कलशेट्टी यांचे परिश्रम, प्रयत्न आणि संयोजन वाखाणण्याजोगे आह़े म्हणूनच बाधितांनी गावालाच कलशेट्टी नगर असे नाव दिले आह़े पाचोराबारी ता़ नंदुरबार येथे दोन वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले होत़े त्यामुळे गावातील  पीडितांचे पुन्हा पुर्नवसन करणे एक मोठे आव्हान होत़े  परंतु ग्रामस्थांच्या सहकार्याने व मेहनतीने ते प्रशासनाला शक्य झाल़ेशुन्यातून पुन्हा विश्व निर्माण करायचे होत़े गावातील 141 कुटुंबियांचे पुन्हा नव्याने पुर्नवसन करण्यात आल़े मयतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत करण्यात आली़ सर्वाना नव्याने घरे उभारुन झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात आली़ गावातील ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेल्या आत्मविश्वासामुळे प्रशासनाला बळ मिळाल़े तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक आदी प्रशासकीय अधिका:यांकडून रात्रन्दिवस मेहनत घेण्यात आली़ गावातील रस्ते, इमारती, शाळा आदींची पुन्हा नव्याने निर्मिती करण्यात आली़ आपण स्वतादेखील महिन्यातून दोन वेळा पाचोराबारीला भेट देऊन होत असलेल्या कामाचा पाठपुरावा केला़ अखेरीस पाचोराबारीला                   पुन्हा गतवैभव मिळवून दिल़े           पुर्नवसन कार्यात ग्रामस्थ, विविध संघटना आदींचे मोलाचे सहकार्य मिळाल़े