शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

शहाद्यात डेंग्यूसदृश्य रुग्णांनी खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 10:42 IST

स्वच्छतेचा प्रश्न : सहा बालकांवर उपचार, विविध आजारांचीही लागण

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील मध्यवर्ती भागात अस्वच्छतेमुळे साथीच्या रोगांची लागण होत असून, तूपबाजार व परिसरातील बालकांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या बालकांवर शहरातील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असून या घटनेने शहरवासीयात खळबळ उडाली आहे. परिसरातील युवकांनी पालिका कार्यालयात जावून संबंधित अधिका:यांची भेट घेऊन या परिसरात तातडीने स्वच्छता करण्याची मागणी केली आहे.शहरातील तूपबाजार, क्रांती चौक, तांबोळी गल्ली, मारवाडी गल्ली, भोई गल्ली, विठ्ठल मंदिर, खोलगल्ली आदी भागातील सांडपाणी वाहून नेणा:या गटारी तुंबल्या असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. याबाबत पालिका आरोग्य विभागाकडे वारंवार मागणी करूनही स्वच्छतेची कार्यवाही होत नसल्याने डास-मच्छरांचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. 15 दिवसांपासून या भागातील बालके हिवताप, सर्दी, खोकला आदी आजारांनी त्रस्त झाले आहेत. काही बालकांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून, रोहित गौरीशंकर बोरसे (नऊ), चेतन सुरेश पाटील (पाच), साई विनोद गुरव (आठ), प्राची भावसार (16), जाणवी मनोज गुरव (सात), आदित्य जैन (आठ) यांना डेंग्यूसदृश्य आजाराची लागण झाल्याचे निदान झाले आहे.या बालकांवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असून, पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नियमित साफसफाई होत नसल्याने रोगराई पसरून बालकांना साथीच्या आजारांची लागण होत आहे.शहरातील ज्या भागात अस्वच्छता आहे त्या परिसरात स्वच्छतेसाठी आरोग्य विभागाने त्वरित कारवाई करावी या मागणीसाठी परिसरातील युवक पालिकेत दाखले झाले असता त्याठिकाणी कोणीही जबाबदार अधिकारी, पदाधिकारी त्यांना भेटला नाही. पालिकेचे मुख्याधिकारी गेल्या 10 दिवसांपासून कार्यालयात आलेले नसून, स्वच्छता व आरोग्य विभागातील अधिकारी जागेवर उपलब्ध होत नाहीत. परिसर सफाईच्या बाबतीत दुर्लक्ष केले जात असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेकडे फॉगींग मशीन असूनही धुरळणी केली जात नसल्याने डास, मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असल्याचा आरोप युवकांनी केला असून, औषध व धुरळीची बिले आरोग्य विभागातर्फे काढली जात असल्याचा खळबळजनक आरोपही करण्यात आला आहे. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी या गंभीर विषयाची दखल घेवून शहर स्वच्छता व आरोग्य अबाधीत राखण्यासाठी संबंधीतांना कार्यवाहीचे आदेश द्यावेत, अशी मागणी पालकांच्या वतीने केली जात आहे.