शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धावती रेल्वे पकडतांना हात सटकल्याने प्रवासी कापला गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 11:36 IST

नंदुरबार स्थानक : रुग्णवाहिकेअभावी दोन तास मृतदेह पडून

नंदुरबार : धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवाशाचा हात सटकून रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास नंदुरबार रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर घडली़ याबाबत नंदुरबार लोहमार्ग पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़लोहमार्ग पोलीस ठाण्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीची अज्ञात म्हणून नोंद करण्यात आली असली तरी, संबंधिताकडे पद्मशाली शंकर या नावाचे आधारकार्ड मिळाले आहे़ त्यामुळे मृत्यू झालेला व्यक्ती हा तोच असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे़ मृताकडे असलेल्या दस्ताऐवजावरुन त्याच्या नातेवाईकांना सूरत येथे फोन करण्यात आला असून मृताची बहिण मृतदेह ओळखण्यासाठी नंदुरबारात रात्री उशिरा दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली़ दरम्यान, नावावरुन मृत व्यक्ती दाक्षिणात्य असून कामानिमित्त सूरत येथे स्थायिक झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे़ आधार कार्डवरदेखील गोविंद नगर, लिंबायत, सूरत़ असा पत्ता असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे़मृतदेह झाला चेंदामेंदाप्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह रेल्वेखाली आल्याने संपूर्णपणे चेंदामेंदा झालेला होता़रेल्वेच्या चाकात मृतदेह अडकल्याने रेल्वेला रिव्हर्स घेऊन अस्ताव्यस्त पसरलेला मृतदेह व अवशेष लोहमार्ग पोलिसांकडून बाहेर काढण्यात आला होता़ दरम्यान, मृतदेहाला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलविण्यात आली होती़ परंतु प्रत्यक्षात दोन तासानंतर रुग्णावाहिका आल्याने संबंधित मृतदेह बराच वेळ घटनास्थळी पडून होता़दरम्यान, एपीआय चिंतामन आहेर, पीएसआय माधव जिव्हारे, एएसआय गोविंद काळे, हवालदार आऱआऱ पाटील, शुभम देशमुख आदींच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला होता़ उपस्थित सर्वच प्रवासी मृतदेहाचा फोटो तसेच व्हिडीओ काढण्यात मग्न होते़ परंतु कुणीही मृतदेह बाहेर काढण्यास पोलीस कर्मचाऱ्यांना मदत केली नसल्याचे सांगण्यात आले़ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्त ही रेल्वे बराच वेळ नंदुरबार स्थानकावर थांबत असल्याने जेवन करीत होती़ कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक रेल्वे सुरु झाल्याने हातातच जेवनाचे ताट घेऊन धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती आहे़ जर रेल्वे सुरु होत असल्याची पूर्व सूचना मिळाली असती तर कदाचीत हा अपघात टाळता आला असता अशी माहिती आता समोर येत आहे़